सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.
“काल तू प्रॉन्झ खायला गेला होतास ?”
“ हो , तुला कसं कळलं ? “
“That is not important ..रिया बरोबर गेला होतास ? ”
“ ए नाही ए , काहीही काय , मी ताईकडे जेवायला गेलो होतो , तिचा फोन आलेला मला “
“हो ? ताईला काय अचानक स्वप्न पडलं होतं का ? तुला प्रॉन्झ खायचे आहेत म्हणून ? “
“अगं नाही , तिला माहितीये मला आवडतात .तुला खोटं वाटत असेल तर ताईला फोन लावून देतो हे बघ आत्ता लगेच बोल ”
“काही नको , तुला माहितीये मी ताईला अजुन भेटले नाहीये , आणि असलं काही मी चुकूनही विचारणार नाही , “
“अगं पण मी नाही गेलो रिया बरोबर “
“खुळा आहेस का तू अभ्या ? “ माझा कलीग विभव मला वेड्यात काढत होता , आम्ही दोघेही एका नामवंत रिअल इस्टेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करायचो ,कुठं आहे माहितीये का आमची साईट? एका जंगलात,..जंगल म्हणजे प्रॉपर जंगल बरं का ? भोर च्या पुढे साधारण ४० एक कि.मी. वर , जवळ जवळ २०० एकरांचं जंगल आहे , पण develop केलेलं, शहराच्या जंजाळात राहून पकलेल्या ज्या लोकांना सुरक्षित राहून काहीतरी थ्रिल्लिंग करावं असं वाटतं त्यांच्यासाठी इथे फार्म हाऊस आणि मचाण बांधलेले .
शिवधनुष्य !!!!
( प्रास्ताविक -वाचकहो हि एक सत्यकथा आहे , अगदी १००% सत्य कथा , यात थ्रिलर किंवा हॉरर असं काही नाही पण चकीत करणारं वास्तव जरूर आहे , पात्रांची नावं सोडली तर कथेत काहीही बदल केलेला नाही . )
रात्रीच्या काळोखात लांबलचक चकचकीत दिसणाऱ्या नागमोडी डांबरी रस्त्यांकडे पाहत वारणा बसून होती , खरं तर रात्र असली तरी म्युनिसीपालटीचे दिवे रस्त्यावर सर्वत्र लुकलुकत होते , पण त्याच्या प्रकाशात ते शांत लांबवर पसरलेले अरुंद डांबरी रस्ते जास्त गूढ दिसत होते .
“काही काही गोष्टीच अशा असतात की कधी कधी आयुष्य संपत आलं तरी त्याचा अर्थ लागत नाही “
कशाबद्दल बोलतोयस तू गोट्या..?बाळ आणि तू अशी विचार बिचार केव्हापासून करायला लागलीस ?" गोटी म्हणजे अक्कांची लाड़की नात, वय वर्षे तेरा .
"काही नाही ग अक्का , तुला काय कळणार ?,तु आपली बस ताक़ घुसळत आणि लोणी काढ़त .”पुढे ती एक लांबलचक सुस्कारा टाकून म्हणाली “दुसरं तुम्ही घरगुती बायका करणार तरी काय म्हणा ?”
जमतच नाही कविता करणं
जस जमतच नाही आठवणी विसरण.
माते कडून पान्ह्याची
गुरु कडून ज्ञानाची
विधात्या कडून प्राणाची
अन विंदांच्या गाण्याची
अशी गुंफण केली दानाची
पण जमेनाच ते फेर धरन.
त्याच्या कडून चांगुलपणाची
तुझ्या कडून हळवेपणाची
तिच्या कडून सौंदर्याची
अन कृतज्ञतेच्या जाणिवांची
अशी गुंफण केली भावनांची
पण जमेनाच ते फेर धरन.
कल्पने कडून शब्दांची
स्मृतीं कडून भावनांची
तिमिरा कडून सरन्याची
अन उष:कालाच्या किरणांची
अशी गुंफण केली प्रारब्धाची
पण जमेनाच ते फेर धरन .
नसतेस घरी तू जेव्हा
नसतेस घरी तू जेव्हा
मज आनंद खूप होतो
मी बोलावूनि घरी मित्रांना
मांचुरीअन बनवून खातो
ती आणली बघ कोबी
बिटरूट हि घेतले
मिरची थोडीशी चिरली
तिखट मिठ हि टाकले
नसतेस घरी तू जेव्हा---
मळून छान मैद्याने
मक्याचे पिठ मी टाकले
मग गोल करून पीस
तेलात तळून घेतले
नसतेस घरी तू जेव्हा---
ग्रेव्ही कशी बनवावी
मज प्रश्न हाच उद्भवतो
मग रेडिमिक्स अनुनी
मी ग्रेव्ही चा बेत जमवतो