चोराची आक्रांतवाडीतल्या नव्या पिढीकडे आता मोबाईल आले होते. तरी त्यांचा डीएनए काही बदललेला नव्हता.
पुण्या मुंबईत काही खुट्टं झालं कि आपलं गाव मागं राहू नये ही इच्छा तशी स्वाभाविकच होती.
कालच हाणबा मगरनं पिल्लू सोडून दिलं होतं.
हाणबानं जयसिंगराव देशमुखांच्या वाड्यावर जायला सुरूवात केल्यापासनं आपल्याला गावात मान मिळतोय असं त्याला वाटत होतं. म्हणून माझा उल्लेख आता हाणबा असं न करता हनुमंतराव असा करावा असं तो ज्याला त्याला सांगत सुटला होता.
१९३७ सालची गोष्ट. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झाली आणि पुण्यातल्या मुळा - मुठा नद्यांना पूर आला. लकडीपूल आणि संगम पूल यांचे स्तंभ पाण्यात बुडले. पूर बघायला स्त्रीपुरुष बाहेर पडले. २५ जुलैला लकडीपुलावर विशेष झुंबड उडाली. सकाळी आठ वाजल्यापासून शेकडो स्त्रीपुरुष पुलावर आणि जवळ उभे होते. घड्याळात दहा वाजले आणि पन्नासेक मुलांनी - पुरुषांनी एका मागोमाग पाण्यात उड्या टाकल्या. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कुमार किशा गाडगीळ आणि हरी दीक्षित या अनुक्रमे अकरा आणि बारा वर्षांच्या मुलांसाठी विशेष टाळ्या पडल्या.
यंदा म्हणजेच २०२५मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. कालाचे अर्धशतक हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. त्यापैकी काहींचा त्रोटक उल्लेख आठवणींच्या या धाग्यावर विस्कळीत स्वरूपात पूर्वी केलेला आहे. आता त्या घटना विस्ताराने घेतल्यात आणि काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही या लेखात समावेश केला आहे.

काल फेसबुकावर भागीरथीबाई आष्टीकर यांच्याविषयी एक टिपण लिहिलं होतं. तेच इथे पुन्हा लिहितोय. हेतू हा की, कुणाला त्यांच्याविषयी काही माहिती असेलत्यांती मिळेल.
भागीरथीबाई आष्टीकर या स्वत:चा फोटो स्टुडिओ सुरू करणार्या पहिला महाराष्ट्रीय स्त्री होत्या. म्हणजे त्या पहिल्या महाराष्ट्रीय व्यावसायिक स्त्री फोटोग्राफर होत्या. पुण्यात बुधवारात त्यांचा स्टुडिओ होता. १९३० सालच्या दिवाळीत त्यांनी तो सुरू केला.
संत तुकाराम महाराजांची दुर्लक्षीत बाजू
बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर
प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून
जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी
बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
मला भुलवी गारूड
आज २ जून २०२५, तेलंगाणा दिन. तेलंगाणात असलेल्या मायबोलीकरांना तेलंगणा राज्य स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तेलंगाणा राज्याच्या स्थापनेला आज अकरा वर्षे पूर्ण झाली!