यंदा म्हणजेच २०२५मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. कालाचे अर्धशतक हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. त्यापैकी काहींचा त्रोटक उल्लेख आठवणींच्या या धाग्यावर विस्कळीत स्वरूपात पूर्वी केलेला आहे. आता त्या घटना विस्ताराने घेतल्यात आणि काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही या लेखात समावेश केला आहे.

काल फेसबुकावर भागीरथीबाई आष्टीकर यांच्याविषयी एक टिपण लिहिलं होतं. तेच इथे पुन्हा लिहितोय. हेतू हा की, कुणाला त्यांच्याविषयी काही माहिती असेलत्यांती मिळेल.
भागीरथीबाई आष्टीकर या स्वत:चा फोटो स्टुडिओ सुरू करणार्या पहिला महाराष्ट्रीय स्त्री होत्या. म्हणजे त्या पहिल्या महाराष्ट्रीय व्यावसायिक स्त्री फोटोग्राफर होत्या. पुण्यात बुधवारात त्यांचा स्टुडिओ होता. १९३० सालच्या दिवाळीत त्यांनी तो सुरू केला.
संत तुकाराम महाराजांची दुर्लक्षीत बाजू
बखरीच्या पानाआड
पाहिले मी क्षणभर
दडपल्या वास्तवाचे
छिन्नभिन्न कलेवर
प्रचलित इतिहास
तुझ्या माझ्या मेंदूतून
अज्ञाताच्या शक्यतांना
टाके पुरता पुसून
जेत्यांचाच इतिहास
रुळे मग माझ्या मुखी
पराजितांचा ठरतो
इतिहास अनोळखी
बखरीच्या पानाआड
वास्तवाचा भग्न गड
त्याच्या झाकल्या गूढाचे
मला भुलवी गारूड
आज २ जून २०२५, तेलंगाणा दिन. तेलंगाणात असलेल्या मायबोलीकरांना तेलंगणा राज्य स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तेलंगाणा राज्याच्या स्थापनेला आज अकरा वर्षे पूर्ण झाली!
आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही
पण मी लहान असल्यापासून ती माझी क्रश आहे. दक्खनची राणी. डेक्कन क्वीन. मी तिला कधी पहिल्यांदा पाहिले ते लक्षात नाही. पण ती लहानपणी अप्राप्य वाटायची. आम्ही जायचो नेहमी कर्जत व कल्याणला. दोन्हीकडे ती थांबत नसे, निदान मुंबईला जाताना. त्यामुळे आम्ही नेहमी सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस व नंतर इंद्रायणी. कधी कोयना.
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
कान्यकुब्ज, मगध, गौड व वंग देशावर राज्य करणाऱ्या यशोवर्माच्या राज्याची पश्चिम उत्तर सीमा जालंधरजवळ होती. आणि त्याचा तळ हिस्सारजवळ स्थानेश्वर येथे पडला होता. स्थानेश्वर पूर्वापार काश्मीरच्या अधिपत्याखाली होते. कदाचित या सीमांवरून वाद होऊन ललितादित्य व यशोवर्मनमध्ये वादाची ठिणगी पडली व दिग्विजयासाठी ललितादित्याने आता यशोवर्मनच्या राज्याकडे नजर वळविली.
यशोवर्मनच्या पराभवाने त्याची अंकित सर्व राज्ये ललितादित्याच्या प्रभावाखाली आली. वंग देशानंतर ललितादित्याने आपला मोर्चा कलिंग देशाकडे वळवला व तो ही अंकित करून घेतला. तत्कालीन भारतातले हे सर्वात मोठे साम्राज्य बनले.
सिंध परिसरातला अरबांचा उपद्रव कमी झाला असला तरी तोखारिस्तानात बुध्दविहार, बौद्ध प्रतिमा नष्ट करणे, जबरदस्तीने
धर्मांतरे करवणे इत्यादी अरबी दहशत सुरु होती. त्यामुळे ललितादित्याने तोखारिस्तानवर हल्ला करून अरबांचा पाडाव केला.

(तोखारिस्तान - आत्ताचे बल्ख, अफगाणिस्तान)