इतिहास

पुणे गटग - १८ मे, रविवार, फोटो आणि वृ सहित

Submitted by किल्ली on 12 May, 2025 - 07:18

पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004

गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे

विषय: 
शब्दखुणा: 

भाग ७ - दिग्विजय

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 10:02

कान्यकुब्ज, मगध, गौड व वंग देशावर राज्य करणाऱ्या यशोवर्माच्या राज्याची पश्चिम उत्तर सीमा जालंधरजवळ होती. आणि त्याचा तळ हिस्सारजवळ स्थानेश्वर येथे पडला होता. स्थानेश्वर पूर्वापार काश्मीरच्या अधिपत्याखाली होते. कदाचित या सीमांवरून वाद होऊन ललितादित्य व यशोवर्मनमध्ये वादाची ठिणगी पडली व दिग्विजयासाठी ललितादित्याने आता यशोवर्मनच्या राज्याकडे नजर वळविली.

यशोवर्मनच्या पराभवाने त्याची अंकित सर्व राज्ये ललितादित्याच्या प्रभावाखाली आली. वंग देशानंतर ललितादित्याने आपला मोर्चा कलिंग देशाकडे वळवला व तो ही अंकित करून घेतला. तत्कालीन भारतातले हे सर्वात मोठे साम्राज्य बनले.

शब्दखुणा: 

भाग ६ - उत्तर विजय व राज्य

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 09:10

सिंध परिसरातला अरबांचा उपद्रव कमी झाला असला तरी तोखारिस्तानात बुध्दविहार, बौद्ध प्रतिमा नष्ट करणे, जबरदस्तीने
धर्मांतरे करवणे इत्यादी अरबी दहशत सुरु होती. त्यामुळे ललितादित्याने तोखारिस्तानवर हल्ला करून अरबांचा पाडाव केला.

tokharistan.png
(तोखारिस्तान - आत्ताचे बल्ख, अफगाणिस्तान)

शब्दखुणा: 

भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 08:42

मुक्तापीड सत्तेवर आला तोवर हिंदू आणि बौद्ध प्रभाव असला तरी काबूल, झाबूल तुर्कांच्या सत्तेखाली गेले होते. तोखारिस्थान (बल्ख) प्रांतांवर अरबी वर्चस्व निर्माण झाले होते. बिन कासीम मेला असला तरी अरबांनी सिंधमध्ये भक्कम पाय रोवला होता.
काश्मीरच्या आश्रयाला आलेल्या जयसिंहाने परतल्यावर खलिफाचे वर्चस्व स्वीकारून धर्मांतर केले होते व तो सिंधवर राज्य करत होता. चीनपासून काबुलकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर असणारी काश्मिरी सत्ता खिळखिळी झाली होती.

शब्दखुणा: 

भाग ४ - चंद्रापीड

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 08:16

प्रतापदित्याच्या मृत्यूनंतर चंद्रापीड सत्तेवर आला.

चंद्रापीडच्याच काळात मोहम्मद बिन कासीमने सिंधवर स्वारी केली.

सिंध पडले. दाहीरचा मृत्यू झाला. लाडी राणीने जोहर केला. राणी बाईशी बिन कासिमने जबरदस्तीने निकाह केला. सूर्या व परिमला कुमारीला खलिफाला भेट म्हणून पाठ्वण्यात आले. दाहीर पुत्र जयसिंह मात्र जीव वाचवून काश्मीरच्या आश्रयाला आला.

बिन कासिमने जयसिंहाला आपल्याकडे सोपवण्याचा व आपले मांडलिकत्व पत्करण्याचा निरोप काश्मीरला पाठवला. चंद्रापीडाने तो अर्थातच धुडकावून लावला व काश्मीरकडे मोर्चा वळवलेल्या बिन कासिमशी जालंधरजवळ युद्ध करून चंद्रापीडाने त्याचा पराभव केला.

शब्दखुणा: 

भाग ३ - कर्कोटक वंश

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 07:51

काश्मीरचा पुढचा उल्लेख येतो तो नीलमत पुराणातल्या जनमेजय आणि वैशंपायन यांच्या संवादात. महाभारताच्या युद्धात
दूरदूरच्या प्रदेशातील राजे आले पण काश्मीरचा राजा आला नाही.

शब्दखुणा: 

भाग २ - नागभूमी

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 07:42

ही गोष्ट सुरु होते समुद्र मंथनापासून. म्हणजे असं पुराणकथेत लिहिलं आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या रत्नांपैकी एक रत्न -
अश्व उच्चैःश्रवा. कश्यप ऋषींच्या २ पत्नींमधे त्याच्या शेपटीचा रंग कोणता यावरून वाद झाला. विनता म्हणे त्याची शेपटी पांढरी
आहे तर कद्रू म्हणे ती काळी आहे. बहिणी असल्या म्हणून सवतीमत्सर नसतो असं थोडंच आहे. शेवटी त्यांनी पैज लावली.
जी पैज हरेल तिने दुसरीची दासी व्हायचं.

शब्दखुणा: 

भाग १ - एक उपेक्षित सम्राट

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 07:27

काश्मीरमध्ये फिरण्यासाठी थोड्या वेगळया जागा शोधायच्या असतील तर एक नाव हमखास समोर येते 'मार्तंड मंदीर'. त्यासाठी फार प्रवास करायला लागणार नसतो, हैदरमधल्या ‘बिस्मिल’ गाण्यात दाखवलं होतं आणि इन्स्टा रील्स बनवायला चांगली
पार्श्वभूमी मिळते. हटकणारं फारसं कुणी नसतंच. कारण फारसं कुणी इथे येतंच नाही. पाम्पोरवरून श्रीनगरला जाताना रस्त्याच्या कडेला अवंतिपुरचे अवशेष बघितलेले असतात ना.

तर जे कुणी जातं मार्तंड मंदिराकडे, त्याला ASI ची पाटी दिसते. हे मंदिर ललितादित्य मुक्तापीडाने बांधलंय अशी. काश्मीरमधला राजा होता म्हणे.

मग कुणीतरी विचारतं -

शब्दखुणा: 

त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 29 April, 2025 - 11:36

२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!

२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!

२०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!

२०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ,
आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली.

२०१५ – गुरदासपूर, ७ ठार,
पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी !

२०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले,
कडिनिंदा नी निर्बंध….

विषय: 

अन्नं वै प्राणा: (९)

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

१८८०च्या सप्टेंबर महिन्यात पितृपक्षातल्या श्राद्धाच्या निमित्तानं वामनराव आपट्यांच्या [१] घरी विष्णुशास्त्री चिपळूणकर [२], गोपाळ गणेश आगरकर, बळवंतराव टिळक, महादेवराव नामजोशी [३] आणि न्यू इंग्लिश शाळेतले सर्व शिक्षक जमले होते. गप्पा सुरू असताना आपण इंग्रजी आणि मराठी अशी दोन साप्ताहिकं काढावीत, असं विष्णुशास्त्र्यांनी सुचवलं. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा एकाच वर्तमानपत्रांमध्ये वापरण्यापेक्षा दोन स्वतंत्र वर्तमानपत्रं चालवण्याची ही कल्पना टिळक आणि आगरकर या दोघांनीही उचलून धरली. श्री.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास