नमस्कार मंडळी!
बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.
अज्ञाताच्या वाटेवरूनी
अवघड चढणे चढता चढता
हात भेटले अदृश्याचे
सोपा झाला सगळा रस्ता
समजत नव्हते मुळीच जेव्हा
भाव भावना शब्दही दुस्तर
हात घेऊनी हातामध्ये
शिकवत गेले अक्षर अक्षर
कधी हरवलो वाटेमध्ये
कधी दाटली मनात भीती
लढण्याचे बळ दिले तयांनी
हात ठेऊनी पाठीवरती
पार जाहली अवघड वळणे
आयुष्याला दिशा मिळाली
जगण्याचाही अर्थ गवसला
कृतज्ञतेने भरली झोळी
ऋणात आहे सदैव त्यांच्या
नतमस्तक मी त्यांच्यापुढती
अदृश्याचे हात आजही
"गुरु" होऊनी सदैव पाठी
गोठ्याची वाडी - भाग ११ : काळोखाची नाडी आणि राखेतले गूढ
पावसाचा जोर आता ओसरला होता, पण हवेतला तो कोंदट, गंधकाचा दर्प श्वास कोंडत होता. आकाशातल्या त्या अवाढव्य, काळ्या सावल्यांमधून झिरपणाऱ्या निळसर प्रकाशाने वाडीवरचा अंधार एका मृत, आजारी रंगात बदलला होता. तो घुमणारा नाद आता कानांना ऐकू येत नव्हता; तो थेट हाडांमध्ये आणि छातीच्या पिंजऱ्यात स्पंदने निर्माण करत होता.
खिडकीतून डोंगराकडे पाहताना शेखरच्या पायाखालची जमीन सरकली.
(पहिलाच प्रयत्न आहे, मतकरींच्या कथा कधी काळी वाचलेल्या असल्याने प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.)
दिगंबरपंतांना जुन्या आणि दुर्मिळ वस्तू गोळा करायचा भयंकर छंद होता.
निवृत्त बँक कॅशियर असलेले पंत तसे अत्यंत व्यवहारचतुर, पण दुर्मिळ वस्तूंच्या बाजारात मात्र ते एखाद्या लहान मुलासारखे बावळट बनायचे.
घेतलं पेन आणि लिहून काढलं
होत नसतं असं कधी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी
सुरुवातीला सुचते एकच ओळ, तीही अर्धी
डोक्यामध्ये झालेली असते शब्दांची नुसतीच गर्दी
नेमका शब्द नेमक्या वेळी सापडतच नाही कधी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी
सुंदर डायरी, नाजूक पेन जामानिमा सारा
छंद, वृत्त, मात्रा, अलंकार याचाच नुसता पसारा
मग शब्द लागतच नाहीत भावनांच्या नादी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी
२५ सप्टेंबरची संध्याकाळ होती. मी आखेनच्या एका छोट्या ट्रेन स्टेशनवर उतरलो. आयुष्याच्या तेवीस वर्षात मी पुणे, बेळगाव आणि गोवा सोडून इतर कुठे क्वचितच गेलो होतो - आणि एकटा तर अजिबातच नाही. असं असताना मी उच्चशिक्षणासाठी जर्मनीला यायचं ठरवलं. इथे कुणाला ओळखत नव्हतो, घरापासून कधी दूर गेलो नव्हतो, अगदी विमान प्रवासही कधी केला नव्हता. असं असताना माझ्या दोन बॅग घेऊन मी जेव्हा स्टेशनवर उतरलो, तेव्हा मनात मोठा प्रश्न आला - जी व्यक्ती मला घ्यायला येणार होती, ती आलीच नाही तर? जर्मनीला यायच्या आधी जर्मनीतील एकाशी ईमेल व्यवहार झालेला. हा त्याचा मित्र होता.