एखादी गझल ऐकल्यावर ती मनाला इतकं वेड लावते हे मी माझ्या खरंतर नकळत्या किंवा अडनाडी वयात अनुभवलं. आठवीत असेन जेव्हा मी ही गझल पहिल्यांदाच मुंबईत ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर एका नवोदित गायिकेच्या (जसपिंदर नरूला) तोंडून ऐकली. तेंव्हा किती शब्द कळले, किती अर्थ समजला अलाहिदा, पण मनात घर केलं या गझलने इतकं नक्की! कोकणात तेंव्हा टीव्ही वगैरे अजून आले नव्हते त्यामुळे त्यानंतर बरेच महिने मला ती गझल परत ऐकता नाही आली! आत्ता सारखं गुगलवर जाऊन शोधून काढून ऐकणं ही तेंव्हा कविकल्पना म्हणून सुद्धा मान्य झाली नसती.
लॉर्ड्स क्रिकेट मैदान ही क्रिकेटची पंढरी आहे हे सर्वश्रुतच आहे. दर वर्षी हजारो पर्यटक भक्तिभावाने फक्त हे मैदान बघायला येतात. त्यात भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे हे तिथे काम करणार्या माणसानेच मला सांगितलं. अर्थात भारतीयांचे एकूण क्रिकेट वेड बघता यात नवल वाटण्यासारखं काही नाही म्हणा! मी पण त्यातलाच एक! पण क्रिकेटचं अति वेड असलं तरी क्रिकेटच्या एकूण इतिहासाबद्दल मी तरी अनभिज्ञ आहे.
मालिनी, इन्स्पेक्टरच्या मागोमाग त्या अर्धप्रकाशित, दमट खोलीत शिरली. एका स्ट्रेचर समोर ते येऊन थांबले. जवळ उभ्या असलेल्या नर्सला, इन्स्पेक्टरने नजरेने खूण केली. ती स्ट्रेचरवरील देहावर पांघरलेली पांढरीशुभ्र चादर दूर करू लागली. आधीच विलक्षण अस्वस्थ असलेल्या मालिनीच्या शरीराला कंप सुटला. श्वास जोरजोराने येऊ लागला.
"मिसेस राऊत.." इन्स्पेक्टर म्हणाले. "सावरा स्वतःला." तिने हळूवारपणे होकारार्थी मान हलवली. नर्सने, त्या देहावरची चादर जराशी दूर केली. एक क्षणभर शांतता..
एकदा एक राजा आपल्या तेवीस सरदारांबरोबर प्रवास करत होता. प्रवास करता करता ते एका पर्वताजवळ आले. तो पर्वत एका यक्षाचा होता. आपल्या हद्दीत हे लोक आलेले पाहून यक्ष संतापला आणि आपली मायावी शक्ती वापरून त्याने सर्व सरदारांना आपल्या पर्वतातील गुहेत कैद केले. राजाला एका वेगळ्या दालनात कैद केले.
मग तो यक्ष गुहेत आला आणि त्याने सर्व सरदारांना एका गोलात उभे केलं. आणि आपली जादू वापरून त्याने सर्व सरदारांच्या डोक्यावर पगड्या चढवल्या. प्रत्येक सरदाराला गोलातील आपल्या बाकी सर्व साथीदारांच्या डोक्यावरील पगड्या दिसत होत्या पण स्वतःच्या डोक्यावरील पगडी दिसत नव्हती.
ना "त्यात" तु
ना "त्यात" मी
नात्यात "आम्ही" ते नाते
ना त्यात "तुझे"
ना त्यात "माझे"
नात्यात "आपले" ते नाते
ना त्यात "हरवणे"
ना त्यात "सापडणे"
नात्यात "सांभाळणे" ते नाते
शॉर्टकट
मुंबईचा पाऊस. नवी मुंबई झाली म्हणून काय झाले, पाऊस जुन्या मुंबईसारखाच होता.
खरं म्हणजे इतक्या उशिरा घराबाहेर . पडायलाच नको होते. पण बायकोची कटकट आणि पावसाची रपरप ह्यात पाऊसच परवडला . निदान आडोसा तरी घेता येतो.
काम तिच्या मामेबहिणीच्या चुलतभावाच्या भाच्याचे असल्यामुळे तिच्या दृष्टीने अति महत्वाचे होते. आमच्या घरापासून अंतर बरेच दूर होते, पण नवीन पूल झाल्यामुळे ते ४-५ किलोमीटरवर वर आले होते. पण रात्री तशी वर्दळ कमीच असायची. पूल बांधताना ३ कामगारांना बळी दिले होते म्हणे.
आठवणींची सुगंधी कुपी... बकुळी
रंग , रूप, आकार ह्या पैकी काही ही देवाकडून मिळालेलं नसताना ही आपल्या सुगंधाने लहान , थोर, रसिक, कवी , लेखक सगळयांनाच आवडणारी बकुळ अर्थात माझी ही आवडती आहेच.
आपलं बालपण सिद्धांतच्या डोळ्यांसमोर तरळलं. त्याची एक मैत्रिण होती. अगदी जिवाभावाची. सगळे तिला पिंकी म्हणायचे. अगदी लहान वयातच, अचानकपणे ती हे जग सोडून गेली होती. नक्की काय झालं होतं, हे कुणालाच समजू शकलं नाही. ती आता आपल्याला भेटणार नाही, असं आईकडून समजलं, तेव्हा सहाजिकच त्याला अतोनात दुःख झालेलं.
आणि आता, ती पिंकी त्याला दिसली होती. अशा स्वरूपात. हा एक अनपेक्षित धक्काच होता ; पण ते खरं होतं.
-------
सिद्धांतनं गावातल्या एका म्हातारीशी बोलताना पिंकीचा विषय काढला ; पण स्वतःला आलेल्या अनुभवांचा उल्लेख त्याने टाळला.
जुन्नर तालुक्यातलं 'मोहाळे,' हे छोटंसं गाव. हलक्याशा शिडकाव्याने, पावसाळा आगमनाची चाहूल देऊ लागला होता. झाडं न्हाऊन निघून, हिरवीगार झाली होती. आकाश कायम धुक्यानं झाकलेलं असे. गावाच्या टोकावर ते जुनं, कौलारू घर होतं.
ज्याला गावकरी 'बाहेरचं पडकं घर' म्हणायचे. त्या घराबद्दल बऱ्याच वदंता होत्या. आणि त्या चांगल्या नव्हत्या.