शहरात कॉलेजला शिकायला गेलो त्यानंतर ग्रामीण भागात आपणच राहत असलेल्या मित्रांच्या जुन्या वाड्यांचे महत्त्व समजलं आणि सौंदर्यदृष्टी आली. चौसोपी, दगडी, मराठी वाडे आवडू लागले आणि शहरांमधील त्याचवेळी वाढणारी सिमेंटच्या ठोकळ्यांची गर्दी बघून मन विषण्ण होऊ लागले. तेव्हाच बालमित्राबरोबर असा एक छोटासा संकल्पही करून झाला की, पैसे मिळतील तेव्हा दगडी, चौक असणारा, मस्त वाडा बांधायचा.
या संकल्पानंतर माझ्या जुन्या वाड्यांबद्दलच्या मतांमध्ये प्रचंड फरक पडत गेला. कालांतराने समजलं, वास्तुमध्ये आनंद नसतो तर तो राहणाऱ्या व्यक्तींच्या मनात असावा लागतो.
द्वे्ष : एक भय गूढकथा
भाग १२
तिचं किळसवाणं, अंगावर काटा आणणारं हास्य सुरूच होतं. एव्हाना घडलेल्या अघटीत प्रकाराची सोनाली अन् राजाभाऊंना चांगली कल्पना आली होती, अन् ते, विशेषतः सोनाली गर्भगळीत होऊन गेली होती. श्री स्थिर नजरेने, शांतपणे तिच्याकडे बघत होता. मग एकदम त्याच्या तोंडून जरबेच्या, खणखणीत आवाजातले शब्द बाहेर पडले.
" बास... हे पहा. तुम्ही कोण आहात याची मला चांगलीच कल्पना आहे ; पण काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. ज्यांची उत्तरे मला तुम्ही द्यायची आहेत. समजलात ? "
अनेक महिन्यांपूर्वी लिहून अर्धवट सोडून दिला होता. आज थोडी डागडुजी करून प्रकाशित केला. फक्त करमणूकीसाठी लिहिला आहे, चूभूदेघे.
----------------
कोंदण
हिरा तर देणारच नाहीस कधी
मग कोंदण तरी कशाला...?
माझी चिडचिड अन माझीच तक्रार...
कधीतरी आठवलं तटकन
दुःख कपड्यातलं चांगल्या
ही तर माझीच
कधीकाळची प्रार्थना
मागितल्यावर मिळतं ह्यावर
विश्वास होता बहुतेक अपार
पण ओंजळीत तर
होती ढीगभर लाज
सुख अन रेशमी कपडे
दोन्ही मागणं जमलंच नाही
फाटक्या आयुष्यात सुख असतं
हेही कधी पटलंच नाही.
आता सांभाळतेय मी
माझं भकास सोनेरी कोंदण
कुणाला कळू नं देता
त्याचं रिकामपण ||
कैरीचं आंबट गोड पन्हं
चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.
शाल्मली: थँक्यू! तुम्ही एवढ आलात भेटायला. अगदी अचानक ग! आम्ही दोघंही घरात नव्हतो. मी नीलच्या शाळेतल्या फंक्शनला गेले होते, आणि शेखर जर्मनीत. शेजाऱ्यांचा फोन आला, मग लगेच शाळेतून तशीच गेले ना हॉस्पिटलमध्ये. पण डॉक्टर म्हणाले काही नाही करता येणार. खूपच मोठा अटॅक! आणि कल्पनाच नाही ग. आई होती तशी; दोघंही होते. पण काय ग, गाडी चालवता येत नाही ना दोघांना. तसे बाबा चालवायचे, मुंबईत काय, इंग्लंडमध्ये काय. पण इथे त्यांना जरा भिती वाटायची. म्हणायचे, 'तुम्ही एकतर उलट्या बाजूनी चालवता गाड्या, आणि वरती एवढ्या वेगानी.' आई ना? सावरतेय थोडी; नाही म्हटलं तरी एवढ्या वर्षांचा संसार ना.
दुसऱ्या दिवशी साडेचारच्या ठोक्याला हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचा फोन, 'मिस्टार अँड मीसेश गूहो टू शी यू'. 'पाठव त्यांना वर', मोठं ऐटीत सांगितलं मी. बेल वाजल्यावर दार उघडलं. वयाच्या मानाने वजन भलतंच आटोक्यात, किंबहुना कमीच झालेलं असावं असं वाटलं; थकल्यासारखीही दिसत होती. पण चेहऱ्यावरचा मिश्किल भाव आणि चैतन्य मात्र तेच होतं. तेच खट्याळ डोळे, तशाच दोन्ही गालांवरच्या खळ्या! पूर्वीं केसांचं पोनीटेल असे, आता चांगला अस्सल बंगाली बौदी सारखा केसांचा चापूनचोपून घातलेला खोपा होता. अजूनही एवढे भरगच्च केस बघून माझा हात नकळत माझ्या डोक्याकडे जाणार होता - झाकून घ्यायला. 'ओरी बाब्बा!
माबोवर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
बरोबर तीस वर्षांनी पुन्हा कलकत्याला आलो होतो - आठ दिवसांच्या बिझनेस ट्रीपसाठी. आयुष्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा वाटलंही नव्हतं ह्या शहरात कधी पाऊल पडेल. आठवडाभर राहिल्यावर वाटलं होतं पुन्हा कद्धी इथे पाऊल टाकणार नाही... आणि दोनच वर्षात परत आलो, पुढची दोन वर्ष राहिलो, प्रेमात पडलो - कलकत्त्याच्या, बंगाली भाषेच्या, संस्कृतीच्या... तेव्हा सोडतांना वाटलं होतं, आता मात्र शंभर टक्के खात्रीने परत काही येत नाही मी! म्हणतात ना, पुरुषस्य भाग्यं!
निवळशंख....
Life is simple, just add water हे वाक्य वाचलं आणि आत काहीतरी हललं.
गेल्या वर्षभरात "उदंड पाहिले पाणी" हा योग आला.आधी नर्मदामाई, मग गंगामाता,त्रिवेणी संगमावर गंगा, यमुना, सरस्वती आणि मधल्या काळात चमचमता अरबी समुद्र..आणि परत आता नर्मदामैय्या!
सगळ्यांच्या अविरल प्रवाहामुळे डोळे आणि मन सुखावलं, तृप्त झालं खरं तरी परत दर्शनाची ओढ ठेवून!