कधी निसटले धागे
मज कळलेच नाही
कशी उसवली वीण
मज कळलेच नाही
त्या निवांत भेटी
त्या एकांत गाठी
डोळ्यांत हर्षाचे झरे
अन देहांची मिठी
क्षण ते सरले जरी
मन ते भरलेच नाही
ती मधाहूनी गोड
कुठे हरवली ओढ ?
अशी कशी मुक्याने
मोडली माझी खोड
माणसाचे मन ते
मज उमगलेच नाही
येते रात सजुनी
येतो पाऊस अजुनी
शालीन थंडी गुलाबी
मारते मिठी बाजूनी
मग कसा प्रेमाचा
ग्रीष्म गेला विझुनी ?
काय खरं नि खोटं
तू मज वरलेच नाही ?
भारतामध्ये काही राजकारणी का सतत भारतविरोधी किंवा राष्ट्रविरोधी विषयांवर चर्चा करतात? हे प्रश्न चॅनेल्सवरही “ब्रेकिंग न्यूज” म्हणून दाखवले जातात. काही प्रश्न तर गेल्या पंधरा वर्षांपासून पुन्हा पुन्हा विचारले जातात:
1. ईव्हीएम मशीन कशा प्रकारे नियंत्रित केल्या जातात? (निवडणूक हरलात तर)
2. बोगस मते कशी टाकली गेली?
3. पहलगाम हल्लेखोर खरे मुस्लीम होते का?
4. जिंकणाऱ्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले.
काल मी अनेक लोकांना पुढे पाठवलेल्या संदेशांबद्दल आणि गोष्टी व्हायरल करण्यामागे लपलेल्या धोक्यांबद्दल बोललो.
अनेक वेळा अशी प्रकरणे देशाच्या विरोधात तयार केली जातात. दोषारोप करणे हेच आता खेळाचे नाव झाले आहे. फक्त बातमी वाहिन्याच पहिला “बाईट” मिळवण्यासाठी धडपड करत नाहीत, तर अनेकदा त्या खोटी बातमी तयार करतात.
वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर ! अशा तऱ्हेने इंग्लिश साहित्य वाचनाचा ओनामा झाला.
दुबई एअर शोमध्ये भारत निर्मित तेजस फायटर जेटचे अपघातामुळे दुर्दैवी निधन झाले. अनुभवी तेजस पायलट स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांनी दुहेरी लूप स्टंट करताना हा प्रसंग घडला.
पहिला लूप अत्यंत कौशल्याने पूर्ण केला, पण दुसऱ्या लूपदरम्यान विमान जमिनीच्या अगदी जवळ आले आणि कोसळले. या दुर्दैवी अपघातात पायलटचेही प्राण गेले. स्क्वॉड्रन लीडर नमांश स्याल यांनी तेजसवर शेकडो तास उड्डाण केले होते. दोन वर्षांपूर्वी सिंगापूर एअर शोमध्ये त्यांनी याच प्रकारचा स्टंट यशस्वीरीत्या सादर केला होता.
माझी नवीन कादंबरी (बोगोरबुदुर) प्रकाशित झाली आहे.
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू?
ब्लॅंकेट काढ.
पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी.
मग दुलई काढ.
दुलई फार हलकी आहे वजनाला.
मग ब्लॅकेट काढ.
ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का?
मग दुलई काढ.
दुलई थोडी आपरी आहे.
मग ब्लॅंकेट काढ.
ब्लॅंकेट अंगाला टोचते.
मग दुलई काढ.
दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं.
मग ब्लॅंकेट काढ.
ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं.
मग दुलई काढ.
जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.
नका चिंता करू, आयुष्य सुंदर फार आहे.
अता दुःखात जो, तोही पुन्हा हसणार आहे.
खुळे मन व्यर्थ खोटे स्वप्न पाहुन आस हरते.
मनाच्या संयमातच जीवनाचे सार आहे.
उगा हेवा करुन सांगा कुणाला काय मिळते.
जगाला प्रेम द्या, हा चांगला व्यापार आहे.
कुण्या लाचार मित्राचा बना आधार थोडा.
उद्या तोही परत तुमची मदत करणार आहे.
जरी आलेत संकट लाख, खेळा हिम्मतीने.
तरच तो सामना मग चांगला रंगणार आहे.
विनाकारण कशाला मृत्युला या घाबरावे.
तुम्ही कर्तृत्व रूपी या जगी उरणार आहे.
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.