लेखन

कहां गए वो लोग

Submitted by पशुपत on 20 May, 2026 - 07:56

साधारण पंधरा-सोळा वर्षांपासून मी मायबोलीचा नियमित वाचक आहे . वेळ मिळेल तसा आणि मूड लागेल तसा इथल्या साहित्याचा आस्वाद मी घेत आलो आहे. फक्त त्यात सलगता राहिलेली नाही.
म्हणजे असं की नेहमी किंवा रोज इथे येऊन नवीन लेखन कोणी केले आहे याचा धांडोळा घेऊन वाचत राहिलो तर नियमित लिखाण करणाऱ्या लेखकांची मनात एक प्रतिमा तयार होते . आपल्याला कोणाचे लेखन आवडत आहे याचे ठोकताळे तयार होतात आणि मग आपण त्यांचं नवीन लेखन कधी येते याची वाट पाहू लागतो.

विषय: 

विश्वरचना (भाग 5 आणि भाग 6)

Submitted by अविनाश जोशी on 16 May, 2026 - 06:36

भाग - 5
सर्व महत्वाच्या राष्ट्रांच्या प्रमुखांची आणि त्यांच्या सोबतच्या अशा इतर पन्नास राष्ट्रांची एक बैठक चीन मध्ये शांघाय इथे भरली होती. गेल्या वर्षभरात पृथ्वीवर असंख्य बदल झाले होते. कुठल्यातरी शक्तीने पृथ्वीवरचे जीवनच ढवळून टाकले होते. ही शक्ती दैवी होती, का अतिमानवी होती, हे सर्व नियंत्रण दुसऱ्या बुद्धी असलेल्या प्राण्याकडून चालले होते हे सांगणे खरोखरच अवघड होते. एक निश्चित होते की कुठल्याही देशात सामान्य जनतेचे काहीही नुकसान झालेले नव्हते. पंधरा देशात त्यांनी आपली कार्यालये स्थापन केली होती. आणि आता काही वर्षातच मानवजातीचे असंख्य प्रगती होण्याची चिन्हे दिसू लागली होती.

विषय: 

बहावा

Submitted by vasant_20 on 14 May, 2026 - 14:47

काही गोष्टींकडे मनात नसतानाही लक्ष जातं, त्या गोष्टी डोळ्यात भरतात आणि नंतर मनात घर करून राहतात.
रोजच्या धावपळीत शहरात बहावा दिसला तर नशीबवान आहात, नाहीतर रानात किंवा घाटात, रस्त्याच्या कडेला तो हमखास दिसतो.
तसं ते एक सामान्य झाड!
पण वर्षभर सामान्य दिसणारा हा राजवृक्ष त्याचं खरं ऐश्वर्य दाखवतो उन्हाच्या झळा लागताना.. ऐन उन्हाळ्यात!

शब्दखुणा: 

विश्वरचना

Submitted by अविनाश जोशी on 14 May, 2026 - 07:18

विश्वरचना
भाग - 1
पुलम सचिंत मुद्रेने अवकाशात विहारत होता. त्याने अंबरला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला,
अरे हे पृथ्वीवर काय चालले आहे ? एक तर आपल्याला सर्व जगाची व्यवस्था लावायला पाहिजे किंवा संपूर्ण मानवजात नष्ट करायला पाहिजे.

विषय: 

खरडवही भाग ८:- मला भेटलेले कलाकार.

Submitted by अतरंगी on 13 May, 2026 - 07:43

ही एका सामान्य माणसाची डायरी आहे. साधं सुधं ममव, नोकरदार आयुष्य जगता जगता वाट्याला आलेले काही बरे वाईट क्षण, त्या क्षणी मनात आलेले विचार, उमटलेल्या भावना, त्या क्षणांच्या मनात कोरलेल्या आठवणी. तसे बघायला गेले तर त्याही काही जणांसाठी माझ्यासारख्याच सामान्य, पण माझ्यासाठी त्या अनमोल आहेत. अशाच क्षणांच्या, आठवणींच्या, भावनांच्या ह्या नोंदी…….

माझी डायरी, माझी खरडवही.

विषय: 

कथा कादंबऱ्यांचा यंत्रमानवी कारखाना

Submitted by हेमंतकुमार on 13 May, 2026 - 06:43

AI मुळे पोटार्थी लेखक आणि अन्य काही कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी वास्तव भीती आज घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच. सुरुवातीस हे प्रकरण विज्ञान तंत्रज्ञानापुरते सीमित राहील अशी एक वेडी आशा सामान्य माणसाला होती. परंतु त्यानंतर या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसतो. लेखन आणि कलाक्षेत्रही या आक्रमणापासून बचावलेले नाहीत.

विषय: 

सोनार बांगला

Submitted by अविनाश जोशी on 11 May, 2026 - 03:42

सोनार बांगला
७ मे हा महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा दिवस आहे. “गीतांजली” मध्ये त्यांनी निर्भयपणे आणि ताठ मानेने जगण्याचा संदेश दिला होता. त्या काळातील बंगालचे वर्णन त्यांनी केले होते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन