लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. मुंबईतील अत्यंत महत्वाचा भाग असलेला मूळ मुंबईचा श्रमजीवी आणि उच्चभ्रू वस्ती असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदार संघ ओळखला जातो. कुलाबा ते शिवडी, वरळी भागापर्यंत मराठी, मुस्लिमबहुल आणि गुजराती मतदार असलेला हा भाग. आतापर्यन्त या मतदारसंघावर शिवसेना कॉग्रेस खासदार म्हणून निवडून आणले आहेत. सध्या अरविंद सावंत गेली दहा वर्षे या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या जागेवर अनेकांचा डोळा असून शिवसेना पुन्हा अरविंद सावंत यांना मैदानात उतरविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
गेल्या आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला. २०१७ मधे जाहिर झालेली आणि पुढे २०१८ मधे प्रत्यक्षांत आणलेली "निवडणूक रोखे योजना “ ( Electoral Bond Scheme EBC) घटनाबाह्य (unconstitutional, arbitrary, and violative of article 14) ठरवून रद्द केली. भाषण स्वातांत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तसेच माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होते असे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रांत म्हटले आहे.
नितिन केरकर.... मुंबई लालबाग काळाचौकी भागातील दिग्विजय चाळीचं साधी राहाणी, उत्तम विचारसरणी, समाजउन्नतीसाठी झटणारे सामान्य व्यक्तिमत्व. माणसाचे मोठेपण ओळखण्यात बराचसा कालावधी जातो, पण नितिन केरकरांच्या मुखाकडे पाहून लागलीच अंदाज येतो. माझ्या लेखन प्रवासातील एक सापडलेली शिदोरी. त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांच्या सभोवताली एक वलय निर्माण झाले आहे ते मित्रांचे. त्यापैकी आम्ही एक भाग्यवंत. ज्याला भक्तीचे वर्म सापडले त्या घरी शांतता प्रस्थापित होते. नितिन सारखा भक्तीभाव जतन करणारा मित्र लाभणे म्हणजे एक सुवर्णयोगच.
पाऊले चालती भाजपाची वाट
काल पासून सततच्या नोटिफिकेशन्स मुळे मोबाईल मधे नोटिफिकेशन सेटींग्ज बंद करून टाकले.
मविआच्या मित्रांच्या पोस्ट्स आहेत ज्यात भाजपाने अशोक चव्हाण भ्रष्टाचारी असल्याचे २०१९ ला म्हटले होते. तर भाजपाकडून अशोक चव्हाण हे कसे कर्तबगार आहेत असे म्हटलेले आहे.
ज्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची स्थापना केली त्या आदरणीय शरदचंद्र पवार यांचा त्यांच्या उतारवयात पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांचे पूतणे श्री अजितदादा पवार यांना देऊ केले. दुसर्याच्या मालावर मिटक्या मारणार्या अजितदादा समर्थकांनी यावर जल्लोष केला. फुगड्या खेळल्या गेल्या. फटाके फोडले. गुलाल उधळून आनंद साजरा केला. त्यांना सोशलमीडियावर ट्रोल करण्यात आले. विविध विपरीत शब्दाने त्यांची अवहेलना करण्यात आली. या निर्णयामुळे शरद पवार डगमगतील, रडतील, माझा पक्ष चोरला म्हणून बोंब ठोकतील, असे वाटले होते. पण डगमगेल ते शरद पवार कसले....
काल पुण्यामधे सभा घेण्यासाठी "निर्भय बनो" चे पत्रकार/सुधारक श्री. निखिल वागळे आणि समविचारी जाणार होते. सभेला जात असणार्या त्यांच्या ताफ्यावर काही भ्याड गुंडांनी अत्यंत सुनियोजीत रितीने प्राणघातक हल्ला केला. बैठकीला जात असणार्या या ताफ्यावर अनेक वेळा हल्ला झाला, त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला, गाडीच्या काचा फोडल्याचे व्हिडिओ सर्वत्र पसरत आहेत. अशा प्रकारच्या सर्वच हल्ल्यांचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे.
सध्या राममंदीराच्या ऊद्घाटनाचा कार्यक्रम भाजप पक्षाने हायजॅकेल्यांचं बोललं जातंय. सदर कार्यक्रम हा हिंदूंचा धार्मिक कार्यक्रम आहे. पण तो धार्मीक न राहता भाजपने हायजॅक करून राजकीय केलाय. ह्या कार्यक्रमावर हिंदूंच्या चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातलाय. तसंच राष्ट्रपतीही येणार नाहीये. १९४८ पासून राममंदिरासाठी लढणारे रामलल्ला समीती, निर्मोहीआखाडा ह्यांनाही कार्यक्रमातून बाजूला फेकल्यासारखं आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवसेना अश्या संघटना ह्या आंदोलनात आघाडीवर होत्या त्यांना व त्यांच्या नेत्यांनाही हा कार्यक्रम बाजूला सारून होतोय.
मायबोली वर "१२थ फेल" या चिरत्रपटावर भरपूर चर्चा झाली. याच चित्रपटात एक सवांद आहे, ज्यात मनोज शर्मा मुलाखतीच्या वेळी एक वाक्य बोलतो कि जर लोक शिक्षित झाले तर राजकारणी लोकांना त्रास होईल आणि त्यांना राजकारण करता येणार नाही.
या अवस्थेचा काँग्रेस सारख्या मोठ्या राजनैतिक पक्षाने पुरेपूर उपयोग करून घेतला. विशेष म्हणजे काँग्रेस मधील सर्वोच्च नेत्यांनी शहरी भागातून निवडणूक न लढवता, ग्रामीण भागाला प्राधान्य दिले. त्यांना शक्य असून शहरी मतदार संघाची निवड न करता ग्रामीण मतदार संघाची निवड केली. त्यांनी असे का केले असावे.