रात्री साधारण दोन-अडीज वाजलेले. डाव्या कुशीवर खिडकीकडे तोंड करून झोपलेलो मी. थंडीचे दिवस. अंगावर रजई ओढलेली. कुशी बदलण्यापुरती जाग आली. या कुशीवरचा त्या कुशीवर झालो. उबदार रजईत अंग आकसून पुन्हा झोपायच्या बेतात आणि कानावर काहीतरी खसखसल्याचा आवाज. आंतरमनाला जाग आली. ‘हे काये?,’ असं मनातच म्हटलं पण डोळे अजून मिटलेलेच. कपाळाखालच्या खोबणीत रुतलेले डोळे सैल करत कसेबसे पण अर्धवटच उघडले. बाहेरचा पुरेल असा अंधूक प्रकाश खिडकीतून आत येऊन पसरलेला. डोळ्यासमोर पलंगाचा विस्तार संपताच पडद्याने अर्धी झाकलेली खिडकी आणि तिच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा नजरेचा टप्पा.
अर्थातच आईही तितकीच दमते. पण इथं दमण्याचा विषय वेगळाच आहे.
आमच्या शेतात संकरित गायी आल्या त्या काळाची आठवण झाली. त्यांना आम्ही इंजेक्शनच्या गायी म्हणायचो. एकदा आईने वसुबारसेला इंजेक्शनच्या गायीचे पूजन केले. मला प्रश्न पडला की या गायी काही आपल्या भारतीय नाहीत. हे तर परदेशी प्रकरण आहे. मग या असल्या गायीची पूजा केलेली धर्माला कशी चालते? माझ्यासाठी तो सांस्कृतिक धक्का होता. पुढे पुढे बाजरी ज्वारी गहू उस सगळच संकरित बियाण सर्रास यायला लागल अन त्यानंतर तर जीवनच संकरित झाले. तसेच या मीम्सच्या म्हणजे अभिव्यक्तिच्या संकारातून निर्माण झालेल्या गोष्टी काहींसाठी सांस्कृतिक धक्का असू शकतो. हे मी स्वानुभवावरुन सांगतो.
सुंदर असं पिवळं सोनारी पुरण, त्यात मस्त वेलची जायफळ पूड, ८-९ केशराच्या काड्या, त्यांचा मंद सुवास, छान तिंबलेली कणिक.. मोठा पुरणाचा गोळा त्या कणकेच्या पारित भरून हळुवार लाटलेली पोळी नाजुक हाताने तापलेल्या तव्यावर अलगद ठेवायची, जसजशी पोळी भाजली जाते एक अप्रतीम खरपूस सुवास अख्ख्या घरभर दरवळतो, दोन्ही बाजूंनी छान भाजलेली गरम गरम भरलेली पोळी अलगद आई पेपर किंवा जाळी वर ठेवते. त्यावर भरपूर तुपाची धार, लागलंच तर थोडं दूध. अहाहा मला सांगा स्वर्गाची व्याख्या ह्याहून वेगळी असेल का? पुरण पोळी करणे हे कोणा सोम्या गोम्याचे काम नव्हेच. पुरणाचे परफेक्ट प्रकरण जमायला हवे.
मुंबईकर असल्याने मुंबईबद्दल थोडीफार माहीत आहे. इथल्या घडामोडींबद्दलची माहिती आणि बातम्या सतत डोळ्यांसमोर येत असतात. त्या वाचताना काही प्रश्न पडले.
मुद्देसूद लिहिणं कठीण आहे इतके वेगवेगळे विषय यात गुंतले आहेत. तसंच विषयाशी संबंधित नेहमी वापरात येणार्या इंग्रजी
संज्ञांची मराठी रूपे मला कृत्रिम वाटतात म्हणून इथे वापरली नाहीत.
आज कित्येक वर्षांनी त्याला गुणगुणताना ऐकले. खुप बरं वाटलं.
कॉलेजमध्ये असताना तो बरेचदा गायचा. अर्थात तो काही गायक नव्हता.
घोटुन तयार केलेली १०- १२ गाणी आलटुन पालटुन म्हणायचा.
पाण त्यावरही मी फिदा होते.
लग्नानन्तर आग्रह केला तरच मित्रांसोबत पार्टीत १-२ दा गाणं म्हटलं होतं.
त्यानन्तर आज इतक्या वर्षांनी....
त्यात गाणं कोणतं, तर
"दिल मे एक लहर सी उठी है अभी...."
आमच्या कॉलेजच्या टुर मध्ये रात्री बॉन फायर जवळ खास माझ्यासाठी म्हटलेली गझल....
पण आज इतक्या वर्षांनी....?
कारच्या खिडकीतून वेगानं मागे जाणारे दिवे दिसत होते. मी मागच्या सिटावर मान टाकून पडले होते. शेजारीच हर्षद होता. तोही शांत, क्लांत, विक्लांत. काजव्या गाडी चालवत होता, आणि हर्षदसाठीचा मामा पुढे. हा मामा होता, म्हणून काजव्या शांत होता, नाही तर त्याच्या टकळीला खंड नसता. कदाचित हा पार्टीचाही प्रभाव असावा. चांगली झाली नै पार्टी? बहुतेक सगळे बोलावलेले आले. खर्च झाला, पण पन्नाशी काय पुन्हा पुन्हा येणारे?
(भाग ३ - https://www.maayboli.com/node/87634)
निःस्वार्थ भाव ठेवून दुसऱ्याला मदत करता आली तर माणसाच्या मनाला बरं वाटतं. फक्त ती मदत योग्य व्यक्तीला मिळायला हवी हा माझा अट्टाहास. कारण नवीनच नोकरीला लागल्यानंतर मी भांडुप स्टेशनजवळ गावाहून आलेल्या, सामान चोरीला गेलेल्या कुटुंबाला शंभर रुपये आणि चार वडापाव घेऊन दिले होते. आणि आपण किती किती छान काम केलं या आनंदात दोन दिवस होते. मग तिसऱ्या दिवशी कळलं की अशी सामान, पैसे चोरीला गेलेली कुटुंबं संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या एका गावातल्या लोकांचा हाच व्यवसाय आहे. काही वर्षांनी त्यांचेच एक दुसरे भाऊबंद मला गुवाहाटीलाही भेटले. असो.