"अरे नुसता बसलायस काय आतमधे. जरा बाहेर येऊन धक्का मार" अजय वैतागत म्हणाला.
"काय..." कानामध्ये हेडफोन्स घातलेले असल्याने टोनीला नीट ऐकू गेलं नाही.
अजयच्या ते लक्षात आलं. तसं त्याने गाडीच्या मागून चालत येत पुढे बसलेल्या टोनीच्या कानातले हेडफोन्स काढून ते मागच्या सीटवर फेकले.
"गधड्या खाली उतर आणि धक्का मार. त्या दोघीच धक्का मारत आहेत" अजय जरा नरमाईत बोलत गाडीच्या मागे धक्का मारायला गेला. नाईलाजानेच टोनी गाडीमधून उतरला आणि गाडीला धक्का मारायला मागे गेला.
साल २०१२.. युवा महोत्सवची तयारी सुरु होती, लिखाणात बरा हात असल्याने नाटुकली बसवत होतो, एकपात्री प्रयोगासाठी एका जुनियरला, एका सिनियरने माझ्याकडे पाठवलं. एक सावळीशी, कुरळ्या केसांची अगदी चारचौघांसारखी दिसणारी ती जुनियर आली. पण, आल्याबरोबर माझी नजर खिळली ती तिच्या शांत, काळ्याशार डोहासारख्या डोळ्यात आणि तिच्या निर्व्याज, आत्मविश्वासपूर्ण लाघवी स्मितहास्यात.. मी पाहिलं आणि पाहतच राहिलो, नजर हटेना. सिनियर काय बोलत होती त्याकडे लक्षच गेलं नाही. एवढी साधी असूनही कुणी इतकी सुंदर कशी असू शकते? तिच्या डोळ्यात मी हरवलो, मिताने आवाज दिला आणि भानावर आलो.
शीर्षक अपुरं आहे. पण ते फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी आहे. डिजिटल थकवा ही समस्या आहे, पण विषय खोल आहे. सगळे पैलू मांडले तर पुढे चर्चा होत नाही असा अनुभव आहे.
एक पन्नाशीचे गृहस्थ आहेत. त्यांचं नाव रमेशचंद्र. त्यांनी आयुष्याच्या तिशीपर्यंत मोबाईल फोन टाळला होता. पण नंतर ते एकटे पडू लागले. त्यांनी जगाच्या रेट्याने फोन घेतला तो फीचर फोन होता. जोपर्यंत ते फोन घेत नच्व्हते तोपर्यंत त्यांना सल्ले मिळायचे कि टेक सॅव्ही असायला हवं. तंत्रज्ञानाच्या बरोबरीने रहायला हवं. सल्ल्याचं रूपांतर टोमण्यात झालं. नंतर तिरस्काराची भावना जाणवू लागली. त्यांनी मग नाईलाजाने मोबाईल फोन घेतला.
आपला एक टुमदार बंगला असावा, दारात एक मोटर कार असं छोटसं स्वप्न प्रत्येकाने रंगवलेलं असतं. पण नशिबात काय लिहून ठेवलंय हे कोणालाच माहीत नसतं. शहरीकरणाच्या शर्यतीमध्ये उंच उंच इमारतींमध्ये खुराड्या इतकी जागा मिळवून आयुष्य काढावे लागते. अशा उंच इमारतींचा एक अविभाज्य घटक म्हणजे लिफ्ट!
राघव चड्डा!
मी माझ्या आयुष्यात हे नाव कधीच विसरणार नाही.
हे नाव माझ्या कानावर आले ते काही महिन्यांपूर्वीच. कारण मी राजकारणात फार रस घेणारा माणूस नाही. आजकालच्या राजकारणात तर बिलकुल नाही. सगळेच चोर आहेत आणि सगळीच नकारात्मकता भरली आहे असे वाटते. राजकीय घडामोडी आणि बातम्यांपासून दूर राहिलो तर आपले आयुष्य आनंदी राहील असा माझा समज आहे.
नाही म्हणायला परिणीती चोप्रा या अभिनेत्रीने एका राजकीय नेत्यासोबत लग्न केले हे मागे कानावर आलेले. पण तेव्हाही तो कोण हे बघायला गेलो नव्हतो. कारण फिल्मी तारकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि पेज थ्री गॉसिपमध्येही फार रस नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
दरवाजाच्या फ़टीतून डोळे लावून ती बाहेर पाहत होती. अंधार पडायला सुरुवात झालेली होती. जसजसा अंधार वाढत होता. तशी तिच्या जीवाची घालमेल देखील वाढत होती. दरवाजाच्या फटीमधून बाहेरचं जेवढं शक्यं असेल तेवढं ती पाहत होती. बाहेरची कोणतीही हलचाल अथवा कोणताही आवाज तिला न पाहता आणि ऐकता सोडायचा नव्हता.
"आई.." अचानक तिच्या मागून आवाज आला तशी ती गर्रकन मागे वळली.
"सोनू तू... अगं किती दचकले मी. तू इथे काय करतेयस. तुला मी आतल्या खोलीत जाऊन बसायला सांगितलं होतं ना" तिने दटावणीच्या सुरात विचारलं.
महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) पासून मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांचे परवाने (License/Permit) रद्द केले जातील, अशी घोषणा परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे.