मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.
हल्ली ए आयचं आणि त्यातल्या त्यात चॅट जीपीटीचं फॅड भलतंच वाढत चालललं आहे. कोडींग, मैत्री, शिक्षण, चित्रकारी कोणतंही क्षेत्र या बाबाने सोडलेलं नाही. पण "भविष्यात हे चॅट जीपीटी किंवा तत्सम कोणतंही ए आय टूल लेखन क्षेत्रातसुद्धा घुसखोरी करून आपणा लेखकांच्या पोटावर पाय आणू शकेल काय?" अशी बसल्याबसल्या उगाचच धास्ती वाटली. शेवटी या बोचऱ्या शंकेचा सोक्षमोक्ष लावायचा म्हणून एक चाचणी घ्यायची असा बेत मनात आखला आणि एक अर्धवट लेख लिहून चॅट जीपीटीला तो पूर्ण करायला सांगितला. सदरच्या रामायणानंतर या चाचणीचा आऊटपुट इथे शेअर करून माझ्या शंकेचा अंतिम निकाल मी मायबोलीवरील समस्त महारथी लेखकांवर सोपवत आहे.
सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? ही कल्पना खरी का? जंगलात खरोखरच कोणी राजा असतो का?
.
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? परंपरेने एखादे गृहितक चालत आलेले असेल तर ते तसेच स्वीकारायचे की त्यावर स्वतंत्रपणे विचार करायचा. आपण असे समजू शकतो की जे मागच्या पिढ्यांनी सांगितले ते सगळे बरोबरच आहे आणि त्यामुळे त्याला तसेच ग्रहण करायचे आणि अवलंबत जायचे.
.
आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती गॅसलाईटींग करते अशी काही उदाहरणे देखील मनात असतात. आपणही तसे करत असू याची आपल्याला कधी कल्पना येत नाही किंबहुना आपण तसे कधी करूच शकत नाही याची खात्री पण काही लोकांना वाटू शकते.
.
गॅसलाईटींग म्हणजे थोडक्यात समोरच्या व्यक्तीला वाटलेल्या भावना नाकारणे किंवा ती व्यक्ती जे म्हणतेय ते झालेलेच नाहीये असे समजून ते ठासून मांडणे कबूल करून घेणे.
.
काही साधारण संवाद पाहुया:
.
मित्रांमधला एक संवाद:
कार्यालयातील टॉक्सिक वातावरण म्हणजे काय?
कार्यालयातील टॉक्सिक (विषारी) वातावरण म्हणजे असे कार्यस्थळ जेथे कर्मचारी मानसिक, भावनिक किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून त्रास अनुभवतात. यामध्ये असुरक्षितता, अनावश्यक तणाव, गैरवर्तन, पक्षपात, कामाचा अतिरेक, आणि संवादाचा अभाव असतो.
टॉक्सिक वातावरण ओळखायचे कसे?
जर कार्यालयात खालील गोष्टी वारंवार घडत असतील तर ते टॉक्सिक वातावरण आहे:
खाली दिलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून नेहेमी सावध रहावे, कारण आपल्याला त्यांच्याशी वागण्याचे धोरण ठरवणे कठीण जाते. अशा
लोकांना शक्यतो प्रत्युत्तर देऊ नये.
संसदेत जर एका विशिष्ठ वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती सभासद असेल तर अश्या संसदेच्या कामकाजात त्या वर्गाचे बद्दल व्यक्त केली जाणारी भावना शब्द आणि निर्णय आपोआपच तपासले जातात आणि त्यांच्या हक्कांची पायमल्ली होणे टाळता येते. ही कल्पना मला पटते, याच कल्पनेला रोजच्या आयुष्यातल्या विचार प्रक्रियेसाठी अमलात आणण्यासाठी एक वैचारिक प्रयोग मला करावासा वाटतो.
.
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
.
या प्रश्नाचे एक मला पटणारे एक उत्तर वाचायला मिळाले, ते पुढे सांगतोय.
.
मला हा प्रश्न नेहमी पडायचा की उदाहरणार्थ लॉगॅरिदम, कॅलकुलस सारखे विषय अभ्यासात का शिकवले जातात. जर रोजच्या आयुष्यात जगतांना या गोष्टी लागणारच नाहीयेत तर हे शिकण्यासाठी वेळ का वाया घालवायचा? शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का?
.
विज्ञानाचे शोध लागण्या आधी आसपासच्या गोष्टींचा मानवाने जमेल तसा तार्किक अर्थ लावून ते काय आहे आणि कसे चालत असेल याचा अंदाज आणि ठोकताळा घेतला आणि त्यावेळेस जे तर्काला पटेल आणि उपलब्ध माहितीवरून अधिक बरोबर वाटेल अशी उत्तरे तयार केली.
.
बरेचदा ही उत्तरे ज्यांना सुचली त्यांना ती कशी सुचली सांगता आले नसेल तेव्हा ती मला स्फुरली, किंवा मला स्वप्नात दिसली, किंवा सरळ मला देवाने सांगितली असे सांगणे सर्वात सोपे असेल म्हणून तसे सांगितले गेले. काही ग्रंथांमध्ये देखील ते लिहिले गेले. तेच मग सिद्धांत्त म्हणून सांगतिले जाऊ लागले शिकवले जाऊ लागले असे आपल्याला दिसते.
.
स्वतःला उपयोगी पडेल असे काही निर्माण केलेले किंवा शोधून काढलेले, पद्धती तयार केलेले आणि त्याचा उपयोग होतो आहे हे अनुभवास आलेले असले की त्या निर्मिती च्या बाबतीत दोन विचार करता येतात. पहिला असा की अश्या निर्मितीला बौद्धिक संपदा म्हणून पेटंट मिळवता येऊ शकतात ज्यानंतर त्या संपदेचा कुणी वापर केला तरी तुम्हाला त्याचा मोबदला मिळत रहावा. दुसरे असे की ती निर्मिती जगाला तशीच मुक्तपणे उपलब्ध करून देता येऊ शकते, जे जनहिताचे एक धोरण म्हटता येईल, आणि सॉफ्टवेयर क्षेत्रात असे जेव्हा सुरू झाले त्याला मुक्तस्रोत निर्मिती म्हटले जाऊ लागले.
.