पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार
..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...

नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'
मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल.
हडप्पन, मेसोपोटॅमिअन, सुमेरिअन, मायन..
सिव्हिलायजेशन्स... संस्कृती....
अवशेष गाडले जातात जमिनीत..
काहीच राहत नाही कालातीत...
सगळे जीव भाग बनून राहतात एका संस्कृतीचा..
स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी धडपडणारे,
संस्कृतीचा भाग म्हणून अस्तित्व जपणारे,
काहीच न जाणता जगत जाणारे...
जाणिवपूर्वक संस्कृती जोपासणारे,
आणि तितक्याच जाणिवपूर्वक ती नाकारणारे..
संस्कृतीने पोळलेली आयुष्यं..
संस्कृतीने उजळलेली आयुष्यं..
सगळी तोलली जातात एकाच तराजूत..
तिला नाकारणारे,
झिडकारणारे..
विद्रोही,
त्रासलेले..
अट्टहासाने स्वतःला वेगळे केलेले..
सगळेच नष्ट होतात काळासोबत..
आणि आपण सगळ्यांना ओळखतो
गोव्यातल्या कलंगुट बीचवर आले आणि मनात हाSS गोंधळ. इतक्या गर्दीच्या ठिकाणी एकदम कसे आलो आपण..काही कळेचना. सगळीकडे माणसेच माणसे..त्यांचे लहाने,मोठे घोळके, ट्राफिक, गाड्यांचे भोंगे, कचऱ्याचे ढीग, दुकानातली गर्दी, त्यात परत सोबतच्या मैत्रिणीचे “इथे वळ... पुढच्या चौकात राईट .. पार्किंग कडे बघ... अर्रर्र चुकला नं टर्न!!” गाडी जरा थांबली कि.. “ कित्याक जायचो? फोटो काढायचा का? पन्नास रुपयाला दोन... bedded plates चाहिये क्या?” एकदम लक्ष्यात येईना कुठे चाललो आपण? किती दिवस गेले मध्ये? ही सगळी माणसे कोण आहेत?
आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.
तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.
पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.