ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ८
पूर्वभाग
आरव देशमुख, समीर नायर आणि विनायक राऊत यांना “TIDE WINDOW - 10:17” मागचं खरं रहस्य समजायला लागतं लक्ष्य बंदर नव्हे, तर योग्य वेळ साधून निर्माण केलेली घबराट आहे.
JNPT नेव्हिगेशन अॅडव्हायझरी आणि समुद्राच्या खोलीतील तफावतीमुळे जहाजांची हालचाल मंदावते, आणि Black Ember ने आखलेली विलंबाची साखळी प्रत्यक्षात सुरू झाल्याचं स्पष्ट होतं.
बापूची अंगठी
सकाळी लवकरच एक्याला जाग आली. त्याला उठलेलं बघून सखूनं लगबगीनं गरमागरम चहाचा एक प्याला त्याच्यासमोर ठेवला. विचारात मग्न झालेल्या एक्याने तो दोन-तीन घोटात संपवला आणि सखूशी काही न बोलता तो घराबाहेर पडला. सखूनंही त्याला हटकलं नाही. तो कोणत्या विवंचनेत आहे, याची तिला कल्पना होती.
ही कथा काढून टाकली आहे.
इतर सर्व लिखाण कृपया काढून टाका.
सतत ड्युआयडी द्वारे त्रास सहन करण्याची क्षमता संपली.
शिल्पवेध - भाग १
पूर्वार्ध
आदित्य हा एक यशस्वी पण अंतर्मुख शिल्पकार आहे, ज्याच्या कलेत सौंदर्य असले तरी त्याला त्यात 'प्राण' नसल्याची खंत आहे.
शहराच्या गोंगाटापासून दूर, तो आपल्या एकांत वाड्यात येतो, एक अशी अप्सरेची मूर्ती घडवण्यासाठी, जी केवळ सुंदर नसून जिवंत वाटेल. मात्र, महिनाभर प्रयत्न करूनही त्याला त्या दगडावर पहिला स्पर्श करता येत नाही.
भाग १ - रत्नदुर्ग आणि शिल्पकार
कोकणच्या त्या दुर्गम भागात पावसाळा फक्त ऋतू म्हणून येत नसे, तर तो जणू एखाद्या आवेगासारखा, उन्मत्त भावनेप्रमाणे अवतरत असे. समुद्रावरून उसळून येणारे काळे ढग सह्याद्रीच्या कड्यांवर आदळत आणि मग आभाळ जणू फुटल्यासारखे कोसळत असे.
पावसाच्या त्या अखंड पडद्यामागे संपूर्ण परिसर धूसर होऊन जात असे—झाडांची टोके, दूरवरचे डोंगर, अगदी आकाशही.
पावसाच्या थेंबांचा आवाज इतका दाट आणि अखंड असे की, जणू संपूर्ण निसर्ग एकाच वेळी श्वास घेत आहे असे वाटावे.
त्या धूसर, पावसाळी जगाच्या मध्यभागी रत्नदुर्ग नावाचा तो प्रचंड वाडा उभा होता.
पूर्वभाग- सावल्यांच्या जाळ्यात - भाग १
आर्यन मेहताने रिया मोईत्रा तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार खार पोलिस ठाण्यात नोंदवली.
इन्स्पेक्टर देशमुख यांच्या प्राथमिक तपासात रियाचा शेवटचा कॉल तिच्या आई इरा मोईत्राला झाल्याचे समोर आले.
आईच्या विधानातील विसंगतींमुळे ही साधी मिसिंग केस नसून संशयास्पद प्रकरण असल्याची देशमुखांना खात्री पटते.
*************************************************************************************************************************
कविता : ती शिकवता येईलही कदाचित, पण खरे सांगायचे तर ती जगावी ! जोखावी, अनुभवावी , गुंतून जावे तिच्यात. पाझरु द्यावे आतवर तिला आणि देउन टाकावी मुभा, आयुष्य बदलायची!
*अकल्पित*
“दोन मिनिट फोन करू का? वेळ आहे का बोलायला?” माझ्या whatsappवर मेसेज आलेला मला दिसला. मेसेज सुश्याचा होता. सुशील- माझ्या मित्रांच्या भल्या मोठ्या गोतावळ्यातला एक मित्र. कितीही महत्वाचं काम असलं, तरी आधी मेसेज करून विचारून नंतर फोन करायचा त्याचा स्वभाव आम्हा सर्व मित्रांना आता अनुभवाने माहीत झाला होता.
मला वेळ होता. मीच लगेच त्याला फोन लावला.
“बोल, काय रे?” मी त्याला विचारलं. त्यापूर्वी त्याचा मेसेज वाचताना मला त्याचा नुकताच बदललेला dp दिसला होता. त्याचा आणि त्याच्या वडिलांचा, एकत्र असा तो फोटो होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच होती.
"कॅट कॉन्सलर?"
"म्हणजे?"
"कॅट म्हणजे मांजर आणि कॉन्सलर म्हणजे आपले ते.." मी ए.आय. ला विचारत म्हणालो
"ते मांजरींची कॉन्सलिंग करतात" नीरव त्याची मांजर कुरवाळत म्हणाला.
मांजराच कॉन्सलिंग?
बाशिंग, लगीन, मग कॉन्सलिंग हे माहित होतं. मांजराचं कॉन्सलिंग??
माझ्या छातीत एकदम धसिंग झालं.