....
मराठी भाषा दिनानिमित्त या मायबोलीचा आजपर्यंत चा प्रवास कसा झाला हे पाहूया.
माणसाला रूप,रस, गंध, स्पर्श या प्रमाणेच अजून एक महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे वाणी
या वाणीचा उपयोग करून एकमेकांशी त्यांनी संवाद साधला, देवाणघेवाण केली. त्यातून हळूहळू भाषेची निर्मिती झाली. भाषेमुळे मेंदूची जास्त प्रगति झाली असे म्हणतात.
मराठी भाषा दिनानिमित्त या मायबोलीचा आजपर्यंत चा प्रवास कसा झाला हे पाहूया.
माणसाला रूप,रस, गंध, स्पर्श या प्रमाणेच अजून एक महत्वाची गोष्ट मिळाली ती म्हणजे वाणी
या वाणीचा उपयोग करून एकमेकांशी त्यांनी संवाद साधला, देवाणघेवाण केली. त्यातून हळूहळू भाषेची निर्मिती झाली. भाषेमुळे मेंदूची जास्त प्रगति झाली असे म्हणतात.
बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का?
भाषावार प्रांतरचना करताना जर एखाद्या गावातल्या लोकसंख्येपैकी ५०% हून अधिक लोक जी भाषा बोलतात ती भाषा ज्या राज्याची त्या राज्यामधे ते गाव सामील केलं गेलंय का? की काही वेगळी पद्धत होती?
समजा मी लिहिली तीच पद्धत होती तर मग महाराष्ट्रातल्या विदर्भात आज हिंदीचा इतका बोलबाला का? इतके हिंदीभाषिक विदर्भात कसे काय? गोंदियासारखा जिल्हा तर आज पक्का हिंदीभाषिक झालाय.
विदर्भातल्या जिल्हा न्यायालयांमधे आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात इंग्रजीसोबतच हिंदीतही खटला चालवता येतो पण मराठीत चालवता नाही असे मला विदर्भातल्या एका व्यक्तीने सांगितले.हे खरे आहे का?
बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.
आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.
भाषेशी खेळू नका
************
भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी
कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी
भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे
तिला लोळवू नका कुणी
एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी
आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
गेल्या चार वर्षांत बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि त्यासह एकंदर जगही बदलतंय, आपण कुठे आहोत, मायबोलीवर शाळेचे लेख टाकून आता १० वर्ष झाली असं काहीसं झालं.
मायबोलीवर, विशेषतः माझ्या समर स्कुलच्या प्रश्नांची आणि एकंदर "आता पुढे काय" या संदर्भात इथे भरपूर माहिती मिळाली! एका मावशीने युएसहुन इमेल संपर्क करून खूप मदत केली, इतके छान वाटले होते तेव्हा. नंतर काही आराखडे बदलले, जे ठरवले करायचे ते नकोसे झाले, पण मी आजही त्यांची ऋणी आहे.
आज मी इथे आलेय, जे मी ह्या वर्षात शिकले, समजले, ते तुम्हाला द्यायला!