सातवीत शिकणारा राहुलला यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची खूप उत्सुकतेने वाट बघत होता. कारणही तसंच होतं म्हणा! यंदा दिवाळीच्या भाऊबीजेला तो त्याच्या आईबाबांबरोबर नागपूरजवळच्या, वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा जंगलातील अभयारण्यात सफारीसाठी जाणार होता. त्याची आत्या नागपूरला रहात होती. आत्याचे कुटुंबपण ताडोबाला येणार होते त्यामुळे यंदाची भाऊबीज अगदी वेगळी आणि मजेची जाणार होती. शिवाय राहुलच्या बाबांनी घेतलेल्या नवीन कारमधून, नव्यानेच बनलेल्या मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गावरून ते ताडोबासाठीचा प्रवास जाणार होते त्यामुळे राहुल प्रवासासाठी आणखीनच उल्हसित झाला होता.
मित्राचं घरचं ज्वारीचं दळण टाकायला शेजारच्या ‘कागनरी’ गावात गेलो होतो. गाव ४ किमी.अंतरावर! (शहरी लोकांनी हा फरक ध्यानात घ्यावा).संध्याकाळी कोरड्या माळरानावर गाडी पळू लागली. मी गार,बोचरं वारं अंगावर घ्यायला लागलो. १५ मिनटात गाडी गावात शिरली.
आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर करावी. 24 अवर्स सेन्टरलाईज्ड एसी ऑफिसच्या लिफ्टमध्ये शिरावं. मध्येच भेटलेल्या ऑफिसबडीजच्या " ओ ! लिटिल अर्ली लिव्हिंग टुडे ? " खोचक प्रश्नाला हॅ हॅ हॅ करत " सडनली , आय चेंज माय प्लॅन टू होम टुडे " असं कूल (!) उत्तर द्यावं. लोकलच्या प्लॅटफॉर्मवर पोचताच शिंग फुंकले रणी पवित्रा घ्यावा आणि तितक्याच उत्साहाने सज्ज होऊन लोकलमध्ये घुसावं.
विटांवर उभा राहून येतो अरूण उगवण्यासाठी
इटानगरला जाऊन येऊ अरूणाचलप्रदेश साठी
.
कोय खाऊनी नाग झोपला काय करावे त्याचे
कोहीमाला जाऊन येऊ नागालॅंडच्या साठी
.
पूर मण्यांचा इथे फालतू मणी फार ते झाले
इंफालला जाऊन येऊ मणीपूरच्या साठी
.
एकच सवाल तुझा राम की माझा राम म्हणावे
ऐझवालला जाऊन येऊ मिझोरामच्या साठी
.
मगर तलावामधे खातसे तीन पुऱ्यांची पार्टी
अगरतलाला जाऊन येऊ त्रिपुराच्या साठी
.
मेघ दाटले लय लय आता वाटे लवंग खावीशी
शिलॉंगला चल जाऊन येऊ मेघालयच्या साठी
.
घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.