पुण्याहून दिल्लीपर्यंत विमानाने गेलं तर दीड तासाचा प्रवास आहे. ट्रेनने गेलं तर +/- चोवीस तास. दुरांतो एक्सप्रेससारख्या आधुनिक-गतिमान ट्रेन चोवीस तासांच्या आत पोचवतात. पुणे-दिल्ली प्रवासाची आद्य ट्रेन झेलम एक्सप्रेस निवांत पोचते. आम्ही दुरान्तोने जाणार होतो. त्यामुळे सुखाचा, सुरक्षित प्रवास होता. अगदी थोड्या स्टेशनवर थांबत असल्याने आणि पूर्ण ट्रेन फक्त रिझर्वेशनच्या डब्यांची असल्याने अधेमधे चढून त्रास देणारे प्रवासी नव्हते. जेवण मिळत असल्याने डबे न्यायचा व्याप नव्हता.
७."जीवनास अर्थ येता ..
अर्थाला अर्थ येतो!!
...हेमंत नाईक
प्रवास जसा सुरु असला की आनंद देतो तसच लिखाणही प्रवाही असावं लागत नाहीतर तेही कंटाळवाण वाटत. त्यात विविधताही हवी.
न्यूझीलंडमध्ये अगदी कोणत्याही बाजूला कॅमेरा वळवला की तो सुंदर वॉलपेपरच वाटतो...इथं आल्यावर सर्वात बिझी असतो तो आपला कॅमेरा !! आज त्यास थोडी विश्राती देऊ या.
आता तिन दिवस येणाऱ्या सुटीचा फायदा घेऊन नॉर्थ आयलन्डवरचे प्रेक्षणीय व सुंदर शहर रोटोरूआ या ठिकाणी जाण्याचे आमचे नियोजन आहे. तेव्हा परत या देशाच्या सुंदरतेकडे आपण वळणार आहोच.
१. श्रीगणेशा..
कालच हेमंत आजोबा दोन नातवाबरोबर खेळण्यासाठी सुमारे दोन महिन्याकरता ऑकलंडला सुखरूप पोहचला. यावेळी या सुंदर देशाच्या ट्रिपचे शब्दांकन करण्याचा विचार आहे.
खरंतर आता पर्यत कधीही रोजनिशी मी लिहिली नाही. या वेळी मात्र लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे...डायरीत जे काही त्या दिवशी घडते ते लिहिले जाते पण माझी डायरी ही पु. लं. नी वर्णन केलेल्या पानवाला या कथेतील पानवाल्याच्या दुकानातील देखाव्याप्रमाणे असणार आहे अगदी,
"भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचे वर्णन करणारी, कोणतेही बंधन नसणारी अगदी निर्बंध अशी.."
सातवीत शिकणारा राहुलला यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची खूप उत्सुकतेने वाट बघत होता. कारणही तसंच होतं म्हणा! यंदा दिवाळीच्या भाऊबीजेला तो त्याच्या आईबाबांबरोबर नागपूरजवळच्या, वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा जंगलातील अभयारण्यात सफारीसाठी जाणार होता. त्याची आत्या नागपूरला रहात होती. आत्याचे कुटुंबपण ताडोबाला येणार होते त्यामुळे यंदाची भाऊबीज अगदी वेगळी आणि मजेची जाणार होती. शिवाय राहुलच्या बाबांनी घेतलेल्या नवीन कारमधून, नव्यानेच बनलेल्या मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गावरून ते ताडोबासाठीचा प्रवास जाणार होते त्यामुळे राहुल प्रवासासाठी आणखीनच उल्हसित झाला होता.
मित्राचं घरचं ज्वारीचं दळण टाकायला शेजारच्या ‘कागनरी’ गावात गेलो होतो. गाव ४ किमी.अंतरावर! (शहरी लोकांनी हा फरक ध्यानात घ्यावा).संध्याकाळी कोरड्या माळरानावर गाडी पळू लागली. मी गार,बोचरं वारं अंगावर घ्यायला लागलो. १५ मिनटात गाडी गावात शिरली.