मित्राचं घरचं ज्वारीचं दळण टाकायला शेजारच्या ‘कागनरी’ गावात गेलो होतो. गाव ४ किमी.अंतरावर! (शहरी लोकांनी हा फरक ध्यानात घ्यावा).संध्याकाळी कोरड्या माळरानावर गाडी पळू लागली. मी गार,बोचरं वारं अंगावर घ्यायला लागलो. १५ मिनटात गाडी गावात शिरली.
आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर करावी. 24 अवर्स सेन्टरलाईज्ड एसी ऑफिसच्या लिफ्टमध्ये शिरावं. मध्येच भेटलेल्या ऑफिसबडीजच्या " ओ ! लिटिल अर्ली लिव्हिंग टुडे ? " खोचक प्रश्नाला हॅ हॅ हॅ करत " सडनली , आय चेंज माय प्लॅन टू होम टुडे " असं कूल (!) उत्तर द्यावं. लोकलच्या प्लॅटफॉर्मवर पोचताच शिंग फुंकले रणी पवित्रा घ्यावा आणि तितक्याच उत्साहाने सज्ज होऊन लोकलमध्ये घुसावं.
विटांवर उभा राहून येतो अरूण उगवण्यासाठी
इटानगरला जाऊन येऊ अरूणाचलप्रदेश साठी
.
कोय खाऊनी नाग झोपला काय करावे त्याचे
कोहीमाला जाऊन येऊ नागालॅंडच्या साठी
.
पूर मण्यांचा इथे फालतू मणी फार ते झाले
इंफालला जाऊन येऊ मणीपूरच्या साठी
.
एकच सवाल तुझा राम की माझा राम म्हणावे
ऐझवालला जाऊन येऊ मिझोरामच्या साठी
.
मगर तलावामधे खातसे तीन पुऱ्यांची पार्टी
अगरतलाला जाऊन येऊ त्रिपुराच्या साठी
.
मेघ दाटले लय लय आता वाटे लवंग खावीशी
शिलॉंगला चल जाऊन येऊ मेघालयच्या साठी
.
घर सोडून आता तब्बल अठ्ठावीस तास उलटले होते. तीन लांबलचक विमानप्रवास आणि वीट आणणारे त्यातले स्टॉप ओव्हर्स सोसून हातपाय दगड झाले होते. अडीच-तीन तासांचा बस प्रवास अजूनही शिल्लक होता. पुराणकाळात नारद-मुनिंना अवगत असलेल्या टेलीपोर्टेशनचा शोध अजून का बरं कुणाला लावता येऊ नये. “नारायण-नारायण!!!” म्हणत अगदी तिन्ही लोकांत नाही तरी निदान पृथ्वीलोकांत कुठेही लीलया जाऊ शकण्याची किमया विज्ञानाला लवकरच साधता यायला हवी.

दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.