भाषा
मडक्यात पाणी नाही दुपार पासून.....
उत्तर: उद्या माठ घासते.
हे रोजच चाललंय गार पाणी नसत घरात.
झाली बडबड चालु चालले तोंड घेऊन.
नीट बोल.
फ्रिजचं पाणी प्या.
मला नको.
रोजची नाटक तुमची......
व्यक्तिमत्व
मडक्यात पाणी नाही दुपार पासून.....
उत्तर: उद्या माठ घासते.
हे रोजच चाललंय गार पाणी नसत घरात.
झाली बडबड चालु चालले तोंड घेऊन.
नीट बोल.
फ्रिजचं पाणी प्या.
मला नको.
रोजची नाटक तुमची......
कॉलेज मधे असताना एका मित्राच्या शेअर मार्केट च्या फर्म मधे बसलो होतो. गर्दी वगैरे नव्हती. तेवढ्यात काळी टोपी, धोतर व कोट घातलेला एक भटका ज्योतिषी तिथे आला. त्याने अल्पावधीतच तिथल्या लोकांवर गारुड घातले. कुंडली पाहून तो ज्योतिष सांगे. मित्राने, त्याच्या भावाने आपापली पत्रिका दाखवून स्वत:ची करमणूक कम उत्सुकता शमवून घेतली. मी तेव्हा नुकतेच व.दा.भटांचे कुंडली तंत्र आणि मंत्र हे पुस्तक वाचून ज्योतिष शिकलो होतो.मला ही वाटले गंमत म्हणुन याला आपली पत्रिका दाखवावी.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते!
मनोज मोहिते
एक हा असा पेंटिंगचा...
तो बिहारमधल्या मुझफ्फरपूरनजीकच्या एका गावचा. चैनपूरचा. ‘शहर से सटा हुआ है यह गांव. शहरी परिवेश और ग्रामीण परिवेश दोनो दिखता है यहां...’ तो सांगत होता. या गावात फर्दो नदी आहे. तिचे नाव नारायणीही आहे. ओळखली जाते, फर्दो म्हणूनच. तो ज्या शाळेत शिकला, त्या शाळेत डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रकवी दिनकर शिकले आहेत. गुरुजींमुळे तो चित्रकलेशी जुळला. जवळचा झाला. मधुबनी चित्रशैली शिकला. चित्रे करता करता एक दिवस अचानक घर सोडले. गावातून निघायचेच होते त्याला. जिद्द! आणि तो नागपूरला आला.
Maternity leave वरून परत कामावर रुजू झाल्यापासून सगळंच बदलून गेलंय.
म्हणजे, काम बरचसं तसंच आहे , पण लोक बदलल्यासारखे वाटतायत . कामाच्या ठिकाणी एखादी situation येते , पूर्वीसारखीच, पण आता माझा अंदाज आणि प्रतिक्रिया वेगळ्या असतात.
आणि वेगळ्या म्हणजे अगदी 'ऑंटी type '. Aunty आपल्या सर्वांच्या ऑफिसेस मध्ये एखादी तरी असतेच ना, तशी. जी नेहमी उशीरा कामावर येते पण संध्याकाळी सर्वात आधी निघते, तशी. जिला उशीरा थांबून काम करणं अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही आणि जेव्हा नाईलाज होतो तेव्हा जिची प्रचंड चिडचिड आणि संताप होतो, तशी aunty .
आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती गॅसलाईटींग करते अशी काही उदाहरणे देखील मनात असतात. आपणही तसे करत असू याची आपल्याला कधी कल्पना येत नाही किंबहुना आपण तसे कधी करूच शकत नाही याची खात्री पण काही लोकांना वाटू शकते.
.
गॅसलाईटींग म्हणजे थोडक्यात समोरच्या व्यक्तीला वाटलेल्या भावना नाकारणे किंवा ती व्यक्ती जे म्हणतेय ते झालेलेच नाहीये असे समजून ते ठासून मांडणे कबूल करून घेणे.
.
काही साधारण संवाद पाहुया:
.
मित्रांमधला एक संवाद:
MMBA च्या संक्रांतीच्या कार्यक्रमात त्यांनी एका तरुणाला स्टेज वर बोलावलं. नितीन सोनावणे, शिक्षणाने इंजिनिअर आणि काय करतात - चालतात.. पडलात ना बुचकळ्यात!
हा माणूस गेली सात-आठ वर्ष चालतोय, म्हणजे त्याने अनेक देशा-विदेशात हजारो मैल पदभ्रमंती केली आहे. आणि आता तो सॅन फ्रान्सिसको ते वॉशिंग्टन डीसी, तीन ते साडेतीन हजार मैल, ही यात्रा पायी करणार आहे.
“अगं तू सुयश ला घ्यायला लवकरच येशील का, अगं काही नाही कुणाशी बोलतच नाहीये तो?” असा फोन आला आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मित्राच्या वाढदिवसासाठी दोन तास तरी लागतील म्हणून त्यानंतर घ्यायला जायचे ठरले होते.
आपल्याला बाबा नाही याबद्दल तो कधीही उघड बोललेला नव्हता. तिनेही कधी बाबाची उणीव भासू नये म्हणून कोणतीच कसर राहू दिली नव्हती. पाचवीतच होता कोवळेच वय त्याचे.
मत्सर मैत्रीतही काय घडवेल सांगता येत नाही. बाबा नसण्यावरून तर चिडवले नसेल?
त्याचे डबडबलेले डोळे पाहून तिच्या मनात अनुकंपा झरू लागली.
दोन दिवसांनी पेपर आहे.
आजचा सुटीचा दिवस निट अभ्यास करण्यात घालवायचा,
तिने मनात ठरवले होते.
“आज तरी अभ्यास करणार आहेस का?”, या आईच्या वाक्याने दिवसाची सुरवात झाली.
तिने काय ठरवले आहे न विचारता, ती काय करणार आहे हे गृहित धरून असलेले आईचे वाक्य ऐकताच तिचे डोके सटकले.
अभ्यास करण्याची कोणतीच कृती करायची इच्छा किंवा विचाराला तिच्या डोक्यात आता जागाच उरलेली नव्हती.
सगळी जागा रागाने भरलेली.
.
लिहिण्याची इच्छा आहे पण लेख लिहिण्यासाठी विषय कुठून आणायचे? असा प्रश्न लेखकाच्या मनात येऊ शकतो. एखादा विषय मनात आला तर तो आधीही लिहिला गेला आहे आणि आपण त्यावर लिहिले तर ते काहीच नवे नसेल असे देखील बरेचदा वाटू शकते.
.