"स्वयम , हे बघ आता तू हा धडा नीट वाचलास किनई, मग आता मला सांग या प्रश्नाचे उत्तर, की नदीशी आपण काय बोललो असतो.. "माझ्या चौथी मधल्या मुलाचा मी अभ्यास घेत होते, पण माझे मन भूतकाळात गेले होते. ते पोचले होते, अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या काळामध्ये.
सात -आठ वर्षांची मी पुस्तक वाचत होते आणि माझे पपा तेव्हाच्या मला सांगत होते, "तायडे, आज मी संध्याकाळी जेव्हा घरी येईन ना, तेव्हा मला तू ही गोष्ट सांगायची बरंका, नीट वाचून ठेव. "
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
एक काळ होता तेव्हा मी "मनोगत" वर पडीक असायचो. आयटी मधील नवी नोकरी आणि इंटरनेटची सुविधा. ऑनलाईन वाचन हि संकल्पना माझ्यासाठी नवीन होती. मला मजा यायची ऑनलाईन वाचायला. सतत काही छान वाचायला मिळतंय का ते बघायचं.
छान म्हणज, जे मला छान वाटतं ते.
असंच एकदा चाळत असताना तुझी 'कॉफी' दिसली. म्हटलं बघूया कशी वाटतीये !
कॉफी हा प्रकारच वेगळा आहे. कॉफी म्हंटलं कि येतं प्रेम आणि सोबतच विरह सुद्धा !
कॉफीचा कडवटपणा जितका जास्ती, तितकी तिची नशा जास्ती !
तुझी 'कॉफी' वाचताना अगदी असंच काहीसं वाटलं.
हो मला हा प्रश्न कधी पासून विचारायचा होता. म्हणजे जाणून घेण्याची उत्सुकता होती . तशी मी गेल्या दोन तीन वर्षांपासून जास्त प्रवास करतेय . किव्वा प्रवास करायला सुरवात केली . त्याच्या आधी खूप कमी प्रवास करत होते . त्यामुळे त्यावेळी सरधोपट ड्रेस च्या घड्या करून टॉप्स चा घड्या करून थोडक्यात सगळे कपडे घड्या करून एकावर एक ठेऊन सगळ्या बॅगा भरत होते. त्याव्यतिरिक्त ज्वेलरी ठेवण्याकरता , कॉस्मेटिक्स/ प्रसाधन साहित्य ठेवण्याकरता दोन वेगवेगळे ट्रान्सपरंट पाऊच वापरले कि झालं .
अरुणराव मागच्या वर्षीच सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते. जवळपास ३० वर्षांची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर अचानक मिळालेला प्रचंड मोकळा वेळ कसा घालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु लौकरच त्यांनी आपला मार्ग शोधला. रोज दुपारी चार वाजल्याच्या सुमारास टिळक रस्त्यापासून त्यांची सायंफेरी सुरु व्हायची आणि ती पार फर्ग्युसन विद्यालय रस्ता संपेपर्यंत चालू राहायची. तिथून मग नेहेमीची बस पकडून घरी परत यायचे. अश्याप्रकारे रोजचे सुमारे तीन ते चार तास किंवा काही जास्तीच सहज चालले जायचे.
नवलेखक होण्यासाठीची नवसूत्रे
प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले
मायबोली वासीयांना नमस्कार ,
मी सौ स्वामिनी चौगुले ,
मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .
गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
फोनची रिंग वाजली, रियाने फोन उचलला पलीकडून हाय रिया शब्द ऐकले आणि रियाचे मन भूतकाळात गेले.अमित, कसे विसरू शकेन हा आवाज. कॉलेज ची सगळी वर्षे मित्र होता, त्याच्या डोळ्यातून कळायचे की त्याला मी किती आवडायचे ते.मलाही तो आवडायला लागला होता. दिसायला देखणा, हुशार आणि कमावलेले शरीर. कोणाला नाही आवडणार. दिवसच असे होते, कोणीच पुढाकार घेतला नाही. नंतर माझे लग्न झाले आणि संपर्कच तुटला.आज इतक्या दिवसांनी फोन?
हॅलो.. आहेस का.. या वाक्यांनी ती परत वर्तमान काळात आली.
हो अमित, आहे मी. आज इतक्या दिवसांनी, मी थोडी शॉक झाले आवाज ऐकून.