संस्कृती
मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.
आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort
✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक
✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का?
✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू?
✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर?
✪ आपत्ती येणारच आहेत
✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो?
मैत्र जिवांचे
पसायदान हे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्व नियंत्याला केलेली फक्त प्रार्थनाच नाही आहे तर त्यामधून त्यांनी विश्व कल्याणासाठी मागणे देखील मागितलेले आहे, हे आपण सगळेच जण जाणतो. पण आज इथे मला त्यामधील या फक्त दोनच शब्दांनी साद घातली आणि मग मला त्यांचा अर्थ नव्याने उमगला, जो मला इथे सगळ्यांना सांगावासा वाटतोय.
वरील दोनच शब्द आणि ते शब्द असलेली ओळ म्हणजे,
“भुता परस्परे जडो, मैत्र जीवांचे.”
भाग ७ - दिग्विजय
कान्यकुब्ज, मगध, गौड व वंग देशावर राज्य करणाऱ्या यशोवर्माच्या राज्याची पश्चिम उत्तर सीमा जालंधरजवळ होती. आणि त्याचा तळ हिस्सारजवळ स्थानेश्वर येथे पडला होता. स्थानेश्वर पूर्वापार काश्मीरच्या अधिपत्याखाली होते. कदाचित या सीमांवरून वाद होऊन ललितादित्य व यशोवर्मनमध्ये वादाची ठिणगी पडली व दिग्विजयासाठी ललितादित्याने आता यशोवर्मनच्या राज्याकडे नजर वळविली.
यशोवर्मनच्या पराभवाने त्याची अंकित सर्व राज्ये ललितादित्याच्या प्रभावाखाली आली. वंग देशानंतर ललितादित्याने आपला मोर्चा कलिंग देशाकडे वळवला व तो ही अंकित करून घेतला. तत्कालीन भारतातले हे सर्वात मोठे साम्राज्य बनले.
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
सिंध परिसरातला अरबांचा उपद्रव कमी झाला असला तरी तोखारिस्तानात बुध्दविहार, बौद्ध प्रतिमा नष्ट करणे, जबरदस्तीने
धर्मांतरे करवणे इत्यादी अरबी दहशत सुरु होती. त्यामुळे ललितादित्याने तोखारिस्तानवर हल्ला करून अरबांचा पाडाव केला.
(तोखारिस्तान - आत्ताचे बल्ख, अफगाणिस्तान)
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
मुक्तापीड सत्तेवर आला तोवर हिंदू आणि बौद्ध प्रभाव असला तरी काबूल, झाबूल तुर्कांच्या सत्तेखाली गेले होते. तोखारिस्थान (बल्ख) प्रांतांवर अरबी वर्चस्व निर्माण झाले होते. बिन कासीम मेला असला तरी अरबांनी सिंधमध्ये भक्कम पाय रोवला होता.
काश्मीरच्या आश्रयाला आलेल्या जयसिंहाने परतल्यावर खलिफाचे वर्चस्व स्वीकारून धर्मांतर केले होते व तो सिंधवर राज्य करत होता. चीनपासून काबुलकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर असणारी काश्मिरी सत्ता खिळखिळी झाली होती.
भाग ४ - चंद्रापीड
प्रतापदित्याच्या मृत्यूनंतर चंद्रापीड सत्तेवर आला.
चंद्रापीडच्याच काळात मोहम्मद बिन कासीमने सिंधवर स्वारी केली.
सिंध पडले. दाहीरचा मृत्यू झाला. लाडी राणीने जोहर केला. राणी बाईशी बिन कासिमने जबरदस्तीने निकाह केला. सूर्या व परिमला कुमारीला खलिफाला भेट म्हणून पाठ्वण्यात आले. दाहीर पुत्र जयसिंह मात्र जीव वाचवून काश्मीरच्या आश्रयाला आला.
बिन कासिमने जयसिंहाला आपल्याकडे सोपवण्याचा व आपले मांडलिकत्व पत्करण्याचा निरोप काश्मीरला पाठवला. चंद्रापीडाने तो अर्थातच धुडकावून लावला व काश्मीरकडे मोर्चा वळवलेल्या बिन कासिमशी जालंधरजवळ युद्ध करून चंद्रापीडाने त्याचा पराभव केला.
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग २ - नागभूमी
ही गोष्ट सुरु होते समुद्र मंथनापासून. म्हणजे असं पुराणकथेत लिहिलं आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या रत्नांपैकी एक रत्न -
अश्व उच्चैःश्रवा. कश्यप ऋषींच्या २ पत्नींमधे त्याच्या शेपटीचा रंग कोणता यावरून वाद झाला. विनता म्हणे त्याची शेपटी पांढरी
आहे तर कद्रू म्हणे ती काळी आहे. बहिणी असल्या म्हणून सवतीमत्सर नसतो असं थोडंच आहे. शेवटी त्यांनी पैज लावली.
जी पैज हरेल तिने दुसरीची दासी व्हायचं.
Pages
