संस्कृती

अतृप्ती-एक चिरंतना

Submitted by अत्रुप्त आत्मा on 9 December, 2013 - 06:39

अतृप्त असावे सारे
मन तृप्तीतूनच पाही
तृप्ती'ही असते क्षणिका
अतृप्ती चिरंतना'ही

मानवास जन्मी एका
नीज सांगे ति ही काही
मन क्षणात चाखे तिजला
अन् क्षणात काही नाही

सारा हा जन्म तरिही
का धावे तिच्याच पाठी
मरणाही भेटी येता
अतृप्ती उरते गाठी

ऐश्या या अतृप्ती'ला
मी देतो एक सलाम
मन तृप्तीचे ना वैरी
अतृप्तीचे न गुलाम
==०==०==०==०
*************
अत्रुप्त
*************

शब्दखुणा: 

वीज बचतीचे उपाय

Submitted by चायवाला on 5 December, 2013 - 00:41

वीजटंचाई आणि लोड शेडिंग व इतर कारणांनी वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. त्यासंबंधातली परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल.

पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याची चर्चा आपण इथे करुया. अगदी आपल्या मोबाईल पासून ते घरातल्या इतर जड उपकरणे वापरताना वीज बचत कशी करता येईल याची चर्चा आणि उपाय सुचवणे हे इथे करुया.

उदाहरणादाखल काही अगदी छोटी उदाहरणे:

इंद्रायणी तीरी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 December, 2013 - 06:04

इंद्रायणी तीरी.....

इंद्रायणीच्या लाटांवरती
अवचित उठली अनाम खळखळ
सुवर्ण पिंपळ स्तब्ध शांतसा
अजानवृक्षी अपूर्व सळसळ

म्लान पाहता श्रीहरिचे मुख
ध्यान सोडिती गिरीजाशंकर
शिष्य निघाला स्वस्थानासी
श्रीसद्गुरुंना फुटला गहिवर

इंद्रायणीच्या तीरावरती
भागवतांचे मेळे निश्चळ
ज्ञानोबाचा गजर अंतरी
नयनी उरले अश्रु व्याकुळ

टाकून बिरुदे देवपणाची
भक्तासोबत श्रीहरि पाऊल
चिरा लोटता समाधीवरी
मागे उरला तुळसी दरवळ......

(कार्तिक वद्य त्रयोदशी - संजीवनसमाधी सोहळा - श्रीक्षेत्र आळंदी)

मला आवडते वाट (आड)वळणाची...

Submitted by Discoverसह्याद्री on 16 November, 2013 - 10:52

पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार

..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
01Vajantri_KaulyaDhar_DiscoverSahyadri.jpg

नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'

फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 16 November, 2013 - 05:50

नवे व्यवसाय

Submitted by नरेंद्र गोळे on 13 November, 2013 - 23:41

शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

शब्दखुणा: 

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

Submitted by संजिव पिल्ले on 9 November, 2013 - 09:09

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

अजुनही?

Submitted by विजय देशमुख on 9 November, 2013 - 08:20

"हाय विजय"
"हॅलो निमिष, कसा आहेस?"
"ठिक. बरेच दिवस झाले तुला भेटायचं होत"
"मलासुद्धा. खरं तर आपल्या बायका भेटतात, बोलतात, त्यावरुन तुझ्याबद्दल माहीति होती, पण भेटीचा योग आज आला."
"खरय"
"काय रे थकला आहेस की काय?"
"नाही, का रे?"
"नाही चेहर्‍यावर फ्रेशनेस वाटत नाही, बरं आहे ना?"
"मी ठिक आहे रे..."
"कमॉन यार, xxxxxx सारख्या जगप्रसिद्ध कंपनीत आहेस, आमच्यासारखं नाही तुझं. कित्येक भारतीय रोजच भेटत असतील तुला, की कोरियन लोकांचा कंटाळा आला?"
"कोरिअन नाही, भारतीयांचाच कंटाळा आला?"
"म्हणजे, पॉलिटिक्स...?"
"नाही ते ही चाललं असतं, पण माझ्याच ऑफिसमध्ये मी वेगळा पडलोय..."
"का रे?"

पारसी बावा 'दानू'

Submitted by आशयगुणे on 5 November, 2013 - 10:31

मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.

Pages

Subscribe to RSS - संस्कृती