हा पिक्चर आल्यापासून इंटरनेटवर अक्षय खन्ना आणि त्याचा रेहमान डकैत छा गया है.
अक्षय खन्नाबद्दलचे एव्हढे लेख होतकरूंनी लिहीले आहेत कि लेखक समुदायाचा विस्तार झाल्याचा सुखद अभिमान वाटू लागला आहे. अनुभवावरून सांगतो कि लेखक हा वाचक असेलच असं नाही. वाचक होण्यासाठी लेखकाला कष्ट घ्यावे लागतात. त्याच्याकडे एक शक्ती असते ज्यामुळे वाचन करून लिहीणे अशा फुटकळ आणि सामान्य पद्धतींना फाट्यावर मारून तो लेखक बनू शकतो.
सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता.
श्री. विश्वास भिडे यांच्या एकोहम या ब्लॉगवरती "आदि शंकराचार्यांवरचा कल्याणी विशेषांक" वाचत होते. "सौंदर्यलहरी" या रचनेचे रसग्रहण वाचतेवेळी फार सुरेख उपमा वाचनात आल्या. डॉ प्रमोद ग लाळे यांनी हे रसग्रहण केले आहे. मी केवळ त्या रसग्रहणातील काही भाग मिपाकरांकरता जसाच्यातसा येथे उधृत करत आहे. संपादकांना अयोग्य वाटल्यास हा धागा उडवावा. मला वाटतं ' डिजिटल कल्याणी' अंक आता सर्वांकरता उपलब्ध आहेत.
____________________________________________________
इसवी सन २२५० साली धर्म आणि हिंदू धर्माचे स्वरूप आणि मानवी जीवनातील स्थान काय असेल याबाबत काही विचार मनात आले.... त्याबद्दल आपली मते अपेक्षित आहेत...
१. ह्युंमनोईड रोबोट आणि मानव यांचे संबंध आणि याबाबत तत्कालीन धर्माचे काय मत असेल?
२. अस्ट्रॉइड बेल्ट आणि मंगळ इत्यादी ग्रहावरील वसाहतीतील लोकं कोणता धर्म पाळत असतील व त्यांच्या आयष्यात धर्माचे काही स्थान असेल का व असल्यास काय?
३. मानवी लैंगिक संबंध आणि प्रजोत्पादन याबाबत तत्कालीन धर्म नियम काय असतील? कारण बहुधा सर्व प्रजोत्पादन यांत्रिक असणार...
असे अनेक प्रश्न मनात आले... आपणास काय वाटते???
जय श्रीराम!
मानस - वारी श्रीमहाराजांसोबत (भाग २)
आषाढी एकादशीच्या भल्या पहाटेच २ वाजता श्रीमहाराज चंद्रभागेवर स्नान करून आईसाहेबांसहित विठ्ठल मंदिरात दाखल झालेले आहेत. श्रीमहाराज महाद्वारावर संत नामदेवांच्या पायरीवर डोके टेकतात.
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।।
मानस - वारी श्रीमहाराजांसोबत ( भाग -१)
जय श्रीराम!
आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत दर एकादशीला पंढरपूरची वारी करायचे. महाराजांचे वडील रावजीबाबासुद्धा वारीला जात असत. तोच परिपाठ महाराजांनी सुरू ठेवला होता.
आज आपण महाराजांच्या सोबत मानस- वारी करणार आहोत.
महाराजांच्या आयुष्यातले अखेरचे वर्ष. पंढरपूरच्या बडव्यांचे वाद महाराजांनी सोडवले होते. तेव्हापासून त्यांच्यापैकी एक जण कधीपासून महाराजांना पंढरपुरास चलण्यास आग्रह करत होते. त्याप्रमाणे महाराज जून १९१३ मधे निघाले.
हाच धागा पकडून आता पुढे...
****
मानस - वारी ( भाग १)
"मंदिराला कळस होता सोन्याचा, गाभाऱ्याला घमघमाट होता चंदनाचा, समईच्या वातीला तुप त्यात केशराची धुप, चोहीकडे पुण्य पुण्याचाच उत, कुणी सांगावे या सोगांड्यांना?
गर्भगृहाचा तो दगड सुखला होता दुधाशी, अन पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी."
वाचायला किती भारी वाटतं ना?
सदरची चारोळी एका समाज माध्यमावर वाचनात आली.
ही चारोळी रसात्मक रूपाने उत्तम आहे. मात्रांचा मेळ ही जमला आहे, जो संदेश द्यायचा आहे तो देखील अत्यंत कल्पकतेने दिला आहे ,पण देण्यात आलेला संदेश मात्र चुकीचा आहे.
गांभीर्यपूर्ण हास्य मी
अन् गहन रहस्य मी
कल्लोळपूर्ण शांती मी
अनंताप्रतची भ्रांती मी
थंड शीत ज्वाळ मी
न् सर्वनाशी काळ मी
शास्त्र मी न् शस्त्र मी
अधर्मभेदी अस्त्र मी
जहाल कडवा सर्प मी
मधुर विषारी दर्प मी
तांडवी रूद्र मी
बलिष्ठ वीरभद्र मी
भयाण,रौद्र,शांत मी
न् खल विदीर्ण अंत मी
गूढ, विषण्ण नाद मी
युगांतरीची साद मी
धैर्य मी धारिष्ट्य मी
अनंत अन् वरिष्ठ मी
हृदयप्रकांड भय मी
।। राम कृष्ण हरी।।
" यशापयशाच्या विचारांचा पूर्णपणे त्याग करून हे अर्जुना तू तुझे कर्म कर. या पृथ्वीचे अखंड राज्य मिळवण्यासाठी अथवा सती द्रौपदीला न्याय मिळवून देण्यासाठी अथवा युधिष्ठिराला राजसिंहासनी बसवण्यासाठी हे धर्मयुद्ध लढूच नकोस मुळी, फक्त मी सांगतोय म्हणुन, फक्त माझी आज्ञा आहे म्हणून, हे धनंजया तुझे कर्तव्य निभावण्यासाठी तू हे युद्ध कर अन्यथा हे अनघ अर्जुना तू नाहक अधम गतीला प्राप्त होशील, येणाऱ्या हजारो पिढ्या तुला शौर्यहीन ठरवतील. इंद्रालाही लाजवणारे पराक्रम करणाऱ्या तुझ्या महान धर्मनिष्ठ भरतादी पूर्वजांच्या पुरुषार्थावरचा तू कलंक बनशील.”