महाराष्ट्र

कविता -आयुष्याचा ताळेबंद

Submitted by रजनी भागवत on 30 May, 2020 - 15:45

असेच एकदा बसल्या बसल्या
विचार आला मनी
मनुष्यजन्माच्या प्रवासाची करू
गोळाबेरीज या क्षणी..

बेरीज ,वजाबाकी,गुणाकार नी भागाकार
याचा ताळेबंद बसता बसेना
आणि आयुष्याचे गणित माझ्या
काहीकेल्या सुटेना...

बेरीज म्हणजे अधिक
तर वजा म्हणजे उणे
अधिक क्षणां पेक्षा जास्त
उण्यानेच भरले माझे रकाने......

सुखाचा गुणाकार जमेना
आणि दुःखाचा भागाकार येईना
आणखी काय सांगू मैत्रिणींनो
आयुष्याचे गणित माझे
मला काही उमजेना
मला काही उमजेना........

रजनी भागवत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

गाऊलीच्या पावलांत सांज भरा आली..

Submitted by संजय कुळकर्णी on 25 May, 2020 - 02:44

बी. रघुनाथ यांची आणखी एक काव्यरचना मला खुप आवडते.. ज्याला सुप्रसिद्ध भावगीत गायक कै. श्री गजानन राव वाटवे यांनी गायले व चालरचना दिली होती. व माझे भाग्य असे की त्यावेळी त्यांच्या सोबत रहात होतो . त्या वेळी वाटवेआण्णा बरोबर पुणे येथील नवी पेठ फाटक बागेतील "त्रिदल" सोसायटीत राहत होते

विषय: 
प्रांत/गाव: 

मी यात राहतो

Submitted by मयुर j on 19 May, 2020 - 05:03

येतय यश अवश्य हस, फसू नको
येतय अपयश अवश्य रड, कोसळू नको
येतोय अडथळा अवश्य भिड , माघार नको
दमलास बिट्या विसावा घे, थांबू नको.
यशात मानकरी हजार.. येऊ दे
अपयशात एकटा उभा राहा..कोणी नसुदे
पाठीवरच्या घावाची किंमत कसली
छातीवरच्या वणांचा गर्व असुदे ...
मयुर

गावाकडच्या वाटा

Submitted by डी मृणालिनी on 11 May, 2020 - 13:53

गावाकडच्या वाटा
https://www.youtube.com/watch?v=r4NgI0RMTkM

नवीनच चॅनल बनवले आहे युट्युबवर .. जरूर बघा . आवडलं तर subscribe करा , like करा.

विषय: 
प्रांत/गाव: 

निर्वाणीचा इशारा

Submitted by रूपाली विशे - पाटील on 28 April, 2020 - 10:51

निर्वाणीचा इशारा

निसर्ग म्हणेआम्हांस तुम्हा साठी
रचिले मी सृष्टीचे मनमोहक चित्र.
परंतु मानवा तू नाही बनू
शकलास माझा सच्चा मित्र...

वेद- पुराणात शिकलास तू
वसुंधरा असे आमची माय.
परंतु तिला कुरुप बनविण्यास
रोविलेस तू तूझे पाय...

कारुण्याची झालर लेवूनी
जीवन कंठती अन्य सजीव.
भूतदयेचा धर्म विसरलास जर
तर तूच होशिल रे निर्जिव...

चंद्रावरती पाऊल तुझे पडे
किती असे तुझं त्याचा अभिमान.
पण... पण... आज तुझ्या त्याच
पावलांना उंबरठा ना देई मान...

प्रांत/गाव: 

रामायण (DD National )

Submitted by पूर्वी on 20 April, 2020 - 12:27

1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

चटका..

Submitted by ketu83 on 16 February, 2020 - 00:23

एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

wetlands - आपल्या किडनीज

Submitted by डी मृणालिनी on 9 February, 2020 - 11:36

कोकण सारखे ठिकाण , जिथे ३००० mm पाऊस पडतो. यावरून सगळ्यांनाच असं वाटतं कि कोकणात पाणी भरभरून असेल. पण तरीही मे महिन्यात इथल्या काही गावांमध्ये टँकर का लागतो ? मुळात कोकणातल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता ०% आहे . महाराष्ट्राला पश्चिम घाट लाभल्यामुळे पावसाचे पाणी थेट या डोंगरांवरून थेट समुद्रात जात नाही . का ?? फक्त wetlands अर्थात पाणथळ जागा यांच्यामुळे . wetlands हे पर्यावरणात स्पंज सारखे काम करतात . जास्तीत जास्त पाणी शोषतात आणि गरज असताना release करतात . त्यामुळेच कोकणाला पाणी मिळते. झाडे जर आपली फुफ्फुसे आहेत तर wetlands आपली किडनी आहे.

प्रांत/गाव: 

Milky Way (आकाशगंगा)

Submitted by बग्स बनी on 31 January, 2020 - 11:11

"आशा नाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला,
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तीष्ठाती पंगुवत"

एखाद स्वप्नं बघणं, त्या स्वप्नासाठी झुरण, तळमळण, आणि ते स्वप्नं कधी ना कधी पूर्ण होईल या एका आशेवर वेड्या सारख त्या गोष्टीच्या मागे लागण, त्या साठी धडपडण, आणि शेवटी त्या गोष्टीला यश मिळण, अत्यंत सुखदायक असतं. लहानपणापासून आयुष्याच्या या प्रवासात कोणती ना कोणती गोष्ट असामान्य घडत गेली किंवा घडवली गेली. आणि या सगळ्यातूनच आपल्यातल असामान्य व्यक्तिमत्त्व विकसित होत असतं अस मला वाटतं.

प्रांत/गाव: 

घरची परी (बायकोसाठी)

Submitted by Dr Raju Kasambe on 22 January, 2020 - 01:28

घरची परी

ती तशी परिच असते
सदा ती आपल्या घरीच असते

बघायला ती बरीच असते
स्वतःसाठी मात्र परिच असते

जळवायला एखादी शेजारीच असते
तशी तीही देखणी भारीच असते

खुणावत जीन्समधली छोरीच असते
सौंदर्य खुलते नेसून नऊवारीच असते

वाचवत आपल्याला खबरदारीच असते
नाहीतर मानेवर आडवी सुरीच असते

झीरो फिगर मिरवणारी गुलछडीच असते
संसाराची गोडी जाडजूड पुरणपोळीच असते

मायावी दुनियेपासून रोखणारी दोरीच असते
सुखी संसाराची ती अखंड शिदोरीच असते

जरी ती आपल्या घरीच असते
तरी ती आपली परिच असते

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र