"देखिए, जाने अनजाने मुझसे एक बदतमीज़ी हो गई है। मैं कोई गीतकार तो नहीं हूं। लेकिन मैंने इस गाने का मुखड़ा लिख दिया है।"
विजय आनंद उर्फ गोल्डीचे ते विधान ऐकून गीतकार राजेंद्र कृष्णजी हळूच हसले आणि त्याच्याकडे एकटक बघत राहिले...
..............
१९७३ सालची गोष्ट. दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांना सांगितले होते, "हे गाणं मला असं असायला हवंय, की जे बघताना, ऐकताना असे वाटेल की जणु काही पत्रं (letters) बोलत आहेत."
“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला” हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी १९२७ साली लिहिलेल्या रणदुंदुभि या नाटकातील हे नाट्यगीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे.
*संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट*
(कदाचित, एक टर्निंग पॉईंट …)
माझा मित्र विनायक रानडे…
हा माणूस म्हणजे भन्नाट कल्पनांच्या खजिन्याचा मालक. त्याच्या डोक्यात कल्पना जन्म घेतात, त्या मोठ्या होतात आणि क्षणात एखाद्या आनंदी धबधब्यासारख्या बाहेरही पडतात. आमच्या नाशिकमध्ये दरवर्षी होणाऱ्या अष्टौप्रहर स्वरहोत्र या संगीत महोत्सवात तो भन्नाट कल्पनेची एखादी नवी खिडकी अशी काही उघडतो की त्यातून काहीतरी नवीन फंडा शिकायला मिळतो … यंदाच्या वर्षी त्याने उघडलेली खिडकी होती—
*“संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट.”*
हुस्ना
काही काही गाणी अशी असतात की ती ऐकण्याची आपल्याला काही काळासाठी तरी चटक लागते. 'हुस्ना' हे गाणं ऐकण्याची मला गेले अनेक दिवस चटक लागली आहे असं म्हणायला हरकत नाही! 
साधारणपणे १९९० साली मुंबई दुरदर्शन वर स्मरणयात्रा हा मराठी गीत गायनाचा सुरेख कार्यक्रम सादर झाला होता . त्या कार्यक्रमाची CD VCD कुठे मिळू शकेल .
Cनाटक, चित्रपट, मुलाखती , वेब सिरीज यांवर धागे आहेत.
हा एक धागा नाटक/ चित्रपट / मुलाखती सोडून इतर मराठी कार्यक्रमांची ओळख/ परीक्षण करून देण्यासाठी.
सध्या ललितलेखनात टाकला आहे कारण मला कुठे ठेवावा हे उमगलं नाही. कोणाला जास्त योग्य कॅटेगरी/ गट सुचल्या जरूर कळवावे. धन्यवाद!
***
अपूर्वाई, काव्य-स्वर-सुरांचा त्रिवेणी संगम!
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
भारतीय संगीत मैफ़िलीत प्रमुख कलाकाराबरोबर साथीचे कलाकार असतात हे आपल्याला ठाऊक आहे. जसे गायकाबरोबर तानपुरा, संवादिनी, व्हायोलीन, तबला इ.इ. सादरकर्त्या कलाकारांच्या एकमेकांना पूरक अशा केलेल्या साथसंगतीमुळे मैफ़िलीतील रसिकांना अनेक अपूर्व, अविस्मरणीय असे क्षण लाभतात. भारतीय संगीतातली साथसंगत हा या लेखातला पहिला मुद्दा.
तानसेनाच्या काळातले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत होते. इथे शब्द बापुडवाणे होत. संगीताच्या या दरबारात देखणे, रुबाबदार शब्द देखील गरीब बिचारे होऊन सेवकाच्या भूमिकेत जाऊन नतमस्तक होऊन जवळजवळ मूक होतात.
कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे!
वैसे तो तेरी ना में भी मैने ढूँढ ली अपनी खुशी,
तू जो गर हाँ कहे तो बात होगी और ही!
दिल ही रखने को कभी ऊपर ऊपर से सही,
कह देना हाँ... कहे देना हाँ... यूँ ही...
.
काय हळवी कल्पना आहे ही सुद्धा. की तुझा नकार पचवूनही मी जगात आनंद मिळवत राहीलो. आणि त्यात जर तू 'हो' म्हणालीस तर चार चांद लागतील माझ्या प्रेमाला. अगं इतकी देखील कठोर सत्यप्रियता दाखवु नकोस, कधी तरी खोटच बोल की माझं मन ठेवण्याकरता ...
.
स्वयंवर भरले सौंदर्याचे
विजा घेऊनी आले राजे
अंबर वाकून उतरले जिथे
चमचम नटव्या तारकांचे
कुणी पसरली भगवी वाळू
शुभ्र देखण्या वैराग्यावरती
हिर्या माणकांची श्रीमंती
लखलखली अलंकारांची
उमरावी आसमंती कंदील
उजळत गेले उत्तररात्री
त्या रेशमी मैफिलीमधले
सूर विहरले नदीच्या पात्री
त्या नदीतला फकीर कोणसा
एकतारीसवे बेभान गायला
त्यास नुरले भान कोठले
उमटले गाणे शब्दांबरीचे
एकतार्यासंगे नाचे फकिरी
स्वयंवर थबकले महालीचे
खुदकन हासले नटवे चांदवे
चांदणे बरसले अंतरीचे