त्याच्याकडे गुलाम अलीसारखी अस्सल गझल गायकी नव्हती. जगजीत सारखा दर्दभरा आवाज नव्हता. त्याच्याकडे वेगळ्याच गोष्टी होत्या ज्या गझल रसिकांसाठी नाविन्यपूर्ण व स्वागतार्ह होत्या. मखमली आवाज, तुलनेने सहज समजतील अश्या उर्दू गझलांची निवड, संस्मरणीय चाली, वैविध्यपूर्ण संगीत आणि गझल गायनावर स्वतः हावी न होण्याचा दुर्मीळ गुण!
कविता लिहायच्या, आपणच खर्च करून कवितासंग्रह काढायचा आणि पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकायला ठेवा म्हणून विचारायला गेलं तर “कवितेची पुस्तक कुणी घेत नाहीत म्हणून,” उत्तर मिळणार, मग आपली पुस्तकं आपणच लोकपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा. काही जण विकत घेतातही काही अशीच ज्यांना आपण पुस्तक देतो ते तरी वाचतात की नाही हा प्रश्न? जर लोकं आपल्या कविता वाचणार नसतील तर का लिहायच्या कविता? हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घोळत होता, त्यापेक्षा आपण गद्य लेखन केलेलं बरं. गद्य लेखन जरा बऱ्यापैकी जमायला लागलं, लोकांना आवडत ही होतं.
अत्यत सृजनशील आणि सुरेल गायकी आज पोरकी झाली आहे.
आजे विदुषी प्रभा अत्रे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन.
माझी पिढी प्रभाजींच्या जागू मै सारी रैना ने अभिजात मारु बिहाग ऐकत वाढली .हा आज देखील लॅंडमार्क समजला जातो.
सदा स्मित हास्य आणि विवेकी बोलणे, अभ्यासपूर्ण शैली आणि उत्साहाने भरलेल्या प्रभाजींनी अनेक मैफिली गाजवल्या.
त्यांची अनुपस्थिती जाणवेल.
इथे जुन्या हिंदी गीत संगीतावर अनेक सुरेख लेख , चर्चा झाल्या आहेत .. त्यातलं थोडंफार वाचलं आहे ..
दुर्दैवाने असं म्हणण्याचं फारसं कारण नाही पण आमच्या घरात हिंदी संगीताची आवड कुणाला नव्हती त्यामुळे ते लहान वयात किंवा टीनेज मध्ये कानावर पडलं नाही .. टीव्हीवर जुने हिंदी सिनेमे लागत नव्हते असं नाही पण प्रमाण कमी असावं आणि फास्ट रंगीत सिनेमांच्या ऐवजी ते ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे बघावेत , गाणी ऐकावीत अशी काही आवड नाही उपजली त्यावेळी ...
कोणत्याही प्रकारच्या प्रवासाशी संबंधित गाणी इथे लिहा.
उदा.
(जीप) मेरे सपनोंकी रानी
(ट्रेन) हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
(मोटरसायकल) रोते हुए आते हैं सब
(सायकल) डाकिया डाक लाया
(होडी) गोमू माहेराला जाते हो नाखवा
(विमान) ओ चांद जहाँ वो जाये
(जहाज) माय हार्ट विल गो ऑन
व्हा तर सुरू...
अवल यांनी तलत वर धागा काढा असे माझे मन यांना सांगितले -- आणि माझे मन (म्हणजे खरेखुरे माझे चंचल मन) लगेच इकडे तिकडे बहकायला लागले, आणि धागा काढायचा मोह आवरला नाही म्हणून हा प्रपंच. @माझे मन, जर काढायचा असेल तर जरूर काढा; आपण दोन्ही धागे एकत्र बांधूयात.
असो. मला इथे तलतचा मखमली आवाज वगैरे याबद्दल बोलायचे नाही. असे आहे, समोर छान रसमलाईची चांदीची वाटी असेल तर ती कशी चविष्ट असेल वगैरे चर्चा कशाला करायची? छानपैकी वाटी उचलून खायला लागावे ना. म्हणून आता त्याच्या गाण्याच्या काही लिंक्स टाकते.
Part 1
( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )
१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.
कुमारांच्या गायकीचे वेगळेपण त्यांच्या षड्जा च्या स्वरापासूनच सुरू होते. पुरुषांचा स्वर काळी एक - काळी दोन, स्त्रियांचा स्वर काळी चार - काळी पाच ! कुमार गंधर्व गायचे पांढरी चार मध्ये. हे सांगण्या मागचा उद्देश असा आहे की रागाकडे स्वरांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन एका स्त्री गायिकेचा किंवा एका पुरुष गायकाचा कसा असतो आपण वेळोवेळी ऐकत आलेलो आहोत, अनुभवत आलेलो आहोत. कुमारांचा स्वरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात पुरुष आणि स्त्री या वर्गवारीच्या वैचारिकतेच्या पलीकडचा आहे आणि तो त्यांच्या आवाजापासूनच व्यक्त व्हायला सुरुवात होते.