सूर्य डोंगराआड पोचला होता, तिन्हीसांज डोकावत होती, अन् तो भराभर पाय उचलत चालला होता त्याच रुळलेल्या वाटेवरून. कुठे आधार घ्यावा अन् कुठे स्वतःच्याच पावलावर पाऊल ठेवायचे हे त्याच्या हाता-पायांना देखील ठाऊक झालेले होते. चालण्याची गती अतिशय एकसारखी. एकाच तालात त्याची पावले पडत होती. साथीला वारा होताच, तंबोऱ्यावर खर्ज लावल्यासारखा. पण त्याच्या कानांनाही सवयीचे झाले होते हे. मधूनच ओळखीचा रानवेलींचा सुगंध येत होता त्याच्या तीक्ष्ण नाकाला. विचलित न होता तो चालत होता, अंधार पडण्यापूर्वी पोहचायचे होते त्याला तिथे. रातकिडे त्याच्या साथीला येण्याआधी. आज खुशीत होता मात्र तो.
प्रकरण सहावे अगोरा टेकडीवरचे मंदिर
"बाळा, ऊठ लवकर. अजून उशीर केलास तर सकाळचा नाश्ता नाही मिळणार आणि आज तर दुपारचं जेवण यायला सुद्धा जरा उशीरच होईल ! मग नंतर नको म्हणू - 'भूक लागली, काहीतरी खायला दे.' ...
छोट्या राघूची आई त्याला उठवत म्हणाली. आईचा आवाज ऐकून राघूनी हळूच आपले डोळे किलकिले करून बाहेर नजर फिरवली. समोरच्या बाल्कनीचं दार आज चक्क चक्क उघडं होतं- आणि तेही इतक्या सकाळी ! त्यामधून आत येणारी सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप राघूच्या मऊमऊ पिसांच्या गादीला अजूनच ऊबदार बनवत होती. राघूनी आपल्या पंखात चोच खुपसून पुन्हा एकदा डोळे मिटले. किती मस्त वाटत होतं असं कोवळ्या उन्हात लोळत पडायला !
पॉपकॉर्न परत आले
पॉपकॉर्न परत आले -१
जय माता दी
"प्यारसे बोलो जय मातादी"
"मिलके बोलो जय मातादी"
सारा आसमंत देवीआईच्या नाम गजराने गर्जत होता. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी उत्सुक असणारे आणि तिचं दर्शन घेऊन धन्य झालेले - सगळेच भक्तगण एकमेकांना संबोधून मातेच्या नावाचा गजर करत होते.
इतकी अवघड चढण चढून आल्यामुळे काही जणांना शारीरिक थकवा जाणवत असला तरी कोणाच्याही चेहेऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नव्हता. प्रत्येक जण भक्तिरसात न्हाऊन निघाल्यासारखा प्रसन्न दिसत होता.
गावाच्या वेशीवर, जिथे जुन्या वडाच्या झाडाची लांबच लांब मुळं जमिनीतून वर आली होती, तिथे एक विहीर होती. 'विहीर' म्हणण्यापेक्षा ती एक काळीशार, अथांग गर्ताच होती. गावातली जुनी जाणती माणसं म्हणायची, "या विहिरीला तळ नाही." तिच्या खोली मुळे, या विहिरीचं नाव पडलं होतं 'पाताळ विहीर'. सूर्यप्रकाशातही तिचा तळ दिसत नसे, इतकी ती खोल होती. आणि गेल्या कित्येक वर्षांत, एकही माणूस तिच्या पाण्यात उतरला नव्हता, की कोणी तिच्या जवळ थांबलं नव्हतं. रात्री तर तिचा उल्लेखही कोणी करत नसे.
प्रकरण पाचवे ज्ञानगर्भ सभामंडप
प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676
मी अस्मिच्या रोबोटिक्स टीमची मेंटर आहे. गेल्या तीन वर्षांत माझा रोल हळूहळू बदलला आहे. सुरुवातीला "चला रे, आठवड्यातनं चार ते सहा तास तरी काम करायला हवं या प्रोजेक्टवर, आपली छान टूर्नामेंट होईल" वगैरे मोटिवेट करण्यापासून यावर्षी, "तुम्हाला काही मदत हवी असेल तर आधी सांगून ठेवा म्हणजे मी हात मोकळा ठेवीन" इथपर्यंत गाडी आली आहे.