हळूहळू स्मृती पटलावरून तुझा चेहरा पुसट होत आहे !
आई तु केलेला संस्कार मात्र हृदयांत घट्ट मुळ धरुन आहे
तु भरवलेल्या काऊचिऊ च्या घासाची रुच अजुन जिभेवर आहे
तुझ्या हातच्या शेवयांच्या खीरीची चव न कधी परत मिळणार आहे
आजार पणात आमच्या आई तू रात्र रात्र जागवली आहे
आई तुझ्या शुश्रूषे वरच हा पिंड इतका मोठा झाला आहे
घरच्या अंगणांत ले तुलसी वृंदावन नेहमी आठवते मला
आज अंगण नाही, फ्लॅट मध्ये तरीही तुळस हवी मला
देव्हाऱ्यात ला तुझा बाळकृष्ण अजून तसाच दिसतो
मी म्हातारा झालो आई , तरी तो अजून बाळच दिसतो
आई जन्माष्टमी ला आता मी सुद्धा उपवास करतो
मज दुःखा चे वावडे नाही
की सु:खा ची कांक्षा नाही
अंता ची आहे जाणिव
मात्र मृत्यू चे भय नाही
काटे अनेक रुतले मनात
तरी हृदयांत वेदना नाही
जरी दुखावले मन माझे
कोणतीही कटुता नाही
जीवनाची वाट आहे कठिण
मात्र सोबत कुणी ही नाही
रात्र संपत आली तरी ही
या प्राचीस तरी सुर्य नाही
तो जरी म्हणवतो मित्र माझा
पण मज तो ओळखत नाही
फुले वेचली बकुळी ची
का त्यांना सुगंध नाही
आयुष्य चालले पुढे सरकत
दिशा मात्र का अजूनही नाही
देव्हारा हृदयाचा का रिकामा
देवा ची प्रतिष्ठा अजुन ही नाही
पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ
नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु
हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ
येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ
अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM
meghvalli.blogspot.com
आयुष्याच्या या वळणावर मी तुझेच गाणे गातो ।
मी रडत नाही मी झुरत नाही मी प्रेम गाणे गातो।।
जन्मा पासुन आजवरी तुच मला शिकविले ।
तुझ्या च या शिक्षेचे मी आज पोवाडे गातो।।
तु दाखविली सुंदर स्वप्ने अन् मी ती रंगवली।
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावर मी आनंद तराणे गातो।।
सुरवंटांची होताना फुलपाखरें मी रोज पहातो।
सुरवंटांसाठीच त्या बागेत मी किलबिल गाणी गातो।।
शुद्ध निसर्ग तुच निर्मीला,जीव त्यात मस्त रमतो।
मेघ गर्जती श्रावणात पहा ना, मी सरींचे गाणे गातो।।
व्योमरापवायूरतेज अन पृथ्वी चे हे शरीर माझे।
कधी वाटते मी कृष्ण मेघ व्हावे
पाऊस होऊनी बरसत रहावे
कधी कवीच्या त्या लेखणीतून
कविता होऊन बाहेर रिसावे
कधी वाटते मी वारा व्हावे
बेभान होऊन सुसाट वाहावे
मंद तुझा मी स्पर्शुन गंध
धुंद होऊन परत फिरावे
कधी वाटते मी स्वप्न बनावे
आणि अवचित मी तुला पडावे
स्वप्नातुन तुला येताच ग जाग
अंगावर तुझ्या रोमांच शहारावे
कधी वाटते मी चांदणे व्हावे
चकोर होऊन तु मला प्यावे
तृष्णेने न कोणत्या च उरावे
जे वांछीले ,ते कैवल्य मिळावे
शुक्रवार, २२/३/२०२४ , १२:५५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
हसरा चेहरा आणि साफसुथरा वेष त्याचा
वाजवित डंका,
संगे झिंदाबाद बोलणारा तांडा सारा
अंगणी माझ्या हात जोडीत आले
याचक खरा पण अतृप्त बिच्चारा
विनम्रतेचे भाव लोचनी, अगतिक मुद्रा
माना उंचावीत मताची याचना करावया
अंगणी माझ्या हात जोडीत आले
गोठ्यातल्या गायीने हंबरडा फोडीला
कुत्र्याने देखील भू भू चा नारा दिला
परी साथ हवी अस्तित्व सावराया म्हणोंनी
अंगणी माझ्या हात जोडीत आले
कितीतरी वेळा ते आले, विजयी झाले
भ्रष्टाचारी म्हणून मस्तीत जगले...
निवडणूक येता आमची आठवण झाली
दर्शवीत अभाग्याच्या वेदना
शब्दफुलांच्या सुंदर बागेतुन मी शब्द वेचून आणतो।
शब्दांचा एक गुछ गुंफून मी कविता सादर करतो।।
शब्द हे निर्जिव कसे जिवंत होऊन बागडतात जणु ससे।
हृदयाचा ठाव घेऊनी कुठे दडून हे बसतात आणि कसे।।
कधी कधी तिखट शब्द बोचरे होऊन टोचतात जणू काटे।
घालून घाव हृदयावर वाहतात अश्रु होऊन डोळ्यां वाटे।।
शब्द अनोखे नी दुर्मिळ ओवुन बनविले मी अनेक अलंकार।
त्या अलंकारां नी तिज मडवताच तीच्या सौंदर्यास नूरला पार।।
विविध रंगाच्या विविध ढंगांच्या विविध छंदांच्या कविता।
वैविध्याने नटलेले शब्द चित्र बहरले कागदावर लिहिता।।
सांजवेळी अवचित छेडिल्या कुणी सतारीच्या तारा ।
मन माझे धुंद करुन गेला तो मंद स्मृतीगंध वारा ।।
अजुनही तूझा स्पर्श आठवुन उन्मादीते अंग ।
रोमांच दाटते,अंगातून उठतो एक शहारा।।
तु एक शीतल नदी अन् मी तुझा किनारा।
एक दिस सुटणार साथ, मिळणार तू सागरा ।।
चालू चल काही काळ गुंफून हातात हात।
मावळतीस आला ग पहा तो शुक तारा ।।
मनातल्या प्रश्नांची तू आज उत्तरं शोध सखे ।
साचल्या गढुळतेचा स्वच्छ होऊदे पसारा ।।
अंगणात मंद मंद झुलतो शांत गार वारा।
मोरपंखी भावनांचा मनी फुलला पिसारा ।।
मला सांगा आयुष जे म्हणतात नक्की काय असतं ।
भुत-स्मरणं वर्तमान रमणं आणि भविष्य रंजनं असतं।।
प्रत्येकाला जे हवं हवंस वाटतं ते सुख मिळवणं म्हणजे तरी काय असतं।
आम्रवृक्ष छायेत नदी काठी शितल वाऱ्यावर नातवंडांना खेळवणे असतं।।
पटलं तर पहा हे दुःख-दुःख जे म्हणतात ते काय असतं।
सर्व असुन ही ज्यांत समाधान नसतं ते आणि काय असतं।।
जागा मध्ये जे प्रेम प्रेम म्हणतात ते तरी काय असतं।
दुसरं काही नाही अहंकार टाकुन तिथे समर्पण असतं।।
मला सांगा निवृत्ती म्हणजे तरी नक्की काय असतं।
मिळवले जे ते टिकणार नाही हे स्वीकारणं असतं।।
जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे।
प्राची ला पहा तो नवसुर्य उगवतो आहे।।
तिमीर रात्र ती दुखांची सरली आता।
क्षितिजावर सुखाची लाली पसरत आहे।।
दिशा समृद्धी च्या तिष्ठत बघती वाट।
ध्रुवीय वारा मज हे आमंत्रण देत वाहे।।
मन घेई गरुड भरारी उंच आकाशात।
पंखात माझ्या निश्चयाचे बळ आहे।।
आकाशांत उडतो मी झुंज देत मेघांशी।
दृष्टीत तरी माझे ते इवले घरटे आहे।।
सोमवार, ११/०३/२०२४ , १२:२४ AM
अजय सरदेसाई (मेघ )
प्राची = पूर्व दशा
तिमीर =अंधार
ध्रुवीय वारा = पूर्वेकडून वाहणारे वारे