सांजवेळी अवचित छेडिल्या कुणी सतारीच्या तारा ।
मन माझे धुंद करुन गेला तो मंद स्मृतीगंध वारा ।।
अजुनही तूझा स्पर्श आठवुन उन्मादीते अंग ।
रोमांच दाटते,अंगातून उठतो एक शहारा।।
तु एक शीतल नदी अन् मी तुझा किनारा।
एक दिस सुटणार साथ, मिळणार तू सागरा ।।
चालू चल काही काळ गुंफून हातात हात।
मावळतीस आला ग पहा तो शुक तारा ।।
मनातल्या प्रश्नांची तू आज उत्तरं शोध सखे ।
साचल्या गढुळतेचा स्वच्छ होऊदे पसारा ।।
अंगणात मंद मंद झुलतो शांत गार वारा।
मोरपंखी भावनांचा मनी फुलला पिसारा ।।
मला सांगा आयुष जे म्हणतात नक्की काय असतं ।
भुत-स्मरणं वर्तमान रमणं आणि भविष्य रंजनं असतं।।
प्रत्येकाला जे हवं हवंस वाटतं ते सुख मिळवणं म्हणजे तरी काय असतं।
आम्रवृक्ष छायेत नदी काठी शितल वाऱ्यावर नातवंडांना खेळवणे असतं।।
पटलं तर पहा हे दुःख-दुःख जे म्हणतात ते काय असतं।
सर्व असुन ही ज्यांत समाधान नसतं ते आणि काय असतं।।
जागा मध्ये जे प्रेम प्रेम म्हणतात ते तरी काय असतं।
दुसरं काही नाही अहंकार टाकुन तिथे समर्पण असतं।।
मला सांगा निवृत्ती म्हणजे तरी नक्की काय असतं।
मिळवले जे ते टिकणार नाही हे स्वीकारणं असतं।।
जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे।
प्राची ला पहा तो नवसुर्य उगवतो आहे।।
तिमीर रात्र ती दुखांची सरली आता।
क्षितिजावर सुखाची लाली पसरत आहे।।
दिशा समृद्धी च्या तिष्ठत बघती वाट।
ध्रुवीय वारा मज हे आमंत्रण देत वाहे।।
मन घेई गरुड भरारी उंच आकाशात।
पंखात माझ्या निश्चयाचे बळ आहे।।
आकाशांत उडतो मी झुंज देत मेघांशी।
दृष्टीत तरी माझे ते इवले घरटे आहे।।
सोमवार, ११/०३/२०२४ , १२:२४ AM
अजय सरदेसाई (मेघ )
प्राची = पूर्व दशा
तिमीर =अंधार
ध्रुवीय वारा = पूर्वेकडून वाहणारे वारे
आता कुठे मी शब्दांचे बोट पकडून चालायला शिकतो आहे
शब्दांची नी माझी अजुन तेवढी ओळख कुठे झाली आहे
शब्द इतक्या सहजी नवख्यांशी मैत्री करत नाहीत
वाऱ्याला सुद्धा नवकवींच्या शब्द उभे राहत नाहीत
अलीकडेच कुठे शब्द माला हात पकडू देत आहेत
आता कुठे ते मला त्यांच्या सर्कल मध्ये घेत आहेत
अजुन ही मला बरीच मोठी मजल मारायची आहे
शब्दांच्या विआयपी सर्कल मध्ये मला पण एन्ट्री घ्यायची आहे
जिथे बसले प्रसिद्ध कवी मला त्या पंगतीत एकदा बसायचे आहे
कवितेच्या आकाशांत चमचमणारे मोठ-मोठे तारे आहेत
गदी ,बाकी, पाडगावकरां सारखे किती मोठे सारे आहेत
आता कुठे मी शब्दांचे बोट पकडून चालायला शिकतो आहे
शब्दांची नी माझी अजुन तेवढी ओळख कुठे झाली आहे
शब्द इतक्या सहजी नवख्यांशी मैत्री करत नाहीत
वाऱ्याला सुद्धा नवकवींच्या शब्द उभे राहत नाहीत
अलीकडेच कुठे शब्द माला हात पकडू देत आहेत
आता कुठे ते मला त्यांच्या सर्कल मध्ये घेत आहेत
अजुन ही मला बरीच मोठी मजल मारायची आहे
शब्दांच्या विआयपी सर्कल मध्ये मला पण एन्ट्री घ्यायची आहे
जिथे बसले प्रसिद्ध कवी मला त्या पंगतीत एकदा बसायचे आहे
कवितेच्या आकाशांत चमचमणारे मोठ-मोठे तारे आहेत
गदी ,बाकी, पाडगावकरां सारखे किती मोठे सारे आहेत
प्राजक्त तुझ्या आठवांचा ओघळला मनात।
मंद मंद सुगंध त्याचा दरवळतो मनात ।।
अवचित ह्या सांजवेळी झाली तुझी आठवण ।
त्या सांज छटा पाहुन गहीवरले माझं मन।।
ओंजळीत घेऊन त्या स्मृतिफूलांचा मी सुगंध घेतो।
गोंजारून त्या नाजूक आठवणी हृदयांत जपतो।।
असाच अचानक कोसळला पाऊस नी भिजलिस तू पार चिंब।
डोळ्यांत आजुन साठून आहेत ते केसातुन मोत्यांचे ओघळते थेंब।।
तुझ्या गजऱ्याचा सुगंध अजून माझ्या श्वासांत भरला आहे।
निश्वास अजुनी त्या क्षणा नंतर मी कुठे सोडला आहे।।
खळ्खळ्णाऱ्या हास्याची नी निरागस डोळ्यांची तुझ्या अजून भूल आहे।
वाटते मना एकदा तरी स्वच्छंद मी जगावे ।
वाहणाऱ्या वाऱ्या समे सर्व दिशांना फिरावे ।।
कवी झालोच कधी तर वाटते बाकीबाब व्हावे ।
विश्वमनाच्या गुढ गर्भातून काव्य मोती मी वेचावे ।।
मृदु कुसुम कळी सम त्या जिवन माझे ही फुलावे ।
जैसे सुरवंटाचे फुलपाखरु होऊन रानी वनी उडावे।।
सळसळत्या नदी किनारी थरथरती पर्णपाती।
हा देखवा पाहुनी डोळा वाटे पुन्हा प्रेम करावे ।।
आकाश पटलावर चित्रकार कोण विविध रंग भरतो।
मी ही आयुष्यात कुणाच्या ऐसे सुंदर रंग भरावे ।।
तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र ।
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।
गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ ।
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।
चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस ।
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।
दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास ।
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।
स्वत:पासून दू ऽऽ र पळून जाण्याचा
फसावा दुबळा प्रयत्न
अन् अडकून पडावे आयुष्यभर
घाटमाथा; आडवळणी दऱ्याखोऱ्यात
तसा तुझा सर्वव्यापी वावर
सरंजामशाही तोऱ्यात
औसे-पुनवेला येतो तुझ्या भेटीला
हिंदकळत... डुचमळत...
अनवट वळणे; खाचखळगे तुडवत
म्हणशील तर हवापालट
चेंज ऑफ टेस्ट
पूर्वजन्माची कार्मिक लेणदेण,
नसते कशाचीच खात्री -
पण पडलेच पदरात पुण्यबिण्य
तर नॉट अ बॅड बार्गेन..!
तुझ्या प्रिती च्या बकुळ फुलांनी गुंफलेल्या आठवणी ।
त्या जिवलग हळुवार क्षणांनी विणलेल्या आठवणी ।।
हिंदोळ्यावर तु उंच झुलावे, माझे मन ही हिंदोळा व्हावे।
आकाशी तू अलगत झेपतांना टिपलेल्या आठवणी।।
जणू हिरवी पैठणी जेव्हा रानांत मोर नाचे श्रावणी।
ती पैठणी तू नेसतांना हृदयांत साठल्या आठवणी।।
तू यमन आळवावा मी सुरांत तुझ्या सूर मिसळावा।
मावळतीच्या यमन रंगांत मिसळलेल्या आठवणी।।
रात्र सारी जागून सरली पहा उगवला शुक्र तारा ।
मादक स्पर्शांनी तुझ्या गंधाळलेल्या आठवणी।।