हरवलेली माणुसकी
नको नको देवा पुन्हा, मनुष्यजन्म या पृथ्वीवर,
माणुसकीचा गंध आणि प्रेम, उरले नाही या जगण्यावर।
स्वार्थासाठी ओरबाडून, निसर्ग हा संपत चालला,
“आपलाच हक्क असावा”, असा अट्टाहास का मांडला?
माणूस आता माणूस नाही, अपेक्षांचा तो गुलाम झाला,
जाती-धर्माच्या कुंपणांनी, तुकड्यांत तो विभागला।
डोंगर-दऱ्या अन अथांग सागर, ओसंडून वाहती नदी,
एवढ्या सुंदर पृथ्वीची, कोणालाच का कळेना महती?
सुंदर या वसुंधरेवर, सीमारेषा अनेक आखल्या,
शेजारी असूनही माणसांच्या, कुरापती मात्र वाढल्या।