Submitted by तुष्कीनागपुरी on 3 September, 2026 - 07:50
शब्द तुझ्यावर जे जे लिहितो
समजून शेवटचे ते लिहितो
.
जिद्द असू दे सावरण्याची
काळ कुठेही फे फे लिहितो
.
आवडतो तो कारण एकच
शब्द खूप हवे से लिहितो
.
मायभूमिला एक पुरेना
जन्म कितीही ते दे लिहितो
.
सुख ताळ्यावर चार पाच तो
दुःख नेहमी शे शे लिहितो
.
पेन नेहमी तपासताना
नाव तुझे मी वेडे लिहितो
.
भेटून ये रे पत्रांमध्ये
मित्र कितीदा ये रे लिहितो
.
दुःख वाटते मदिरा त्याला
तुष्की रिचवुन पेले लिहितो
.
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, ३ सप्टेंबर २०२६, १७ः००
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा