शेती

ये रे म्हणू की जा रे पावसा

Submitted by अभय आर्वीकर on 11 September, 2026 - 15:57

ये रे म्हणू की जा रे पावसा

मी रक्त शिंपले, घाम ओतला, बैलोबावाणी,
शेत कोरले, बीज पेरले, वसाडल्या रानी;
ये रे पावसा, जरा तरी ये, ठुमकल्यावाणी,
कोंब बीजाचे व्याकुळ झाले, तहानल्यावाणी!

कोंब बीजाचे कुशीत दडले, ‘आई आई’ करुनी,
मायभूमीने पदर झाकला, ‘गाई गाई’ म्हणुनी;
ये रे पावसा, थेंब थेंब तरी, तुषारल्यावाणी,
माय बीजाची हतबल झाली, उदासल्यावाणी!

ढग येती बघ, ढग जाती बघ, नमस्कार करुनी,
धस्स जीवाला, फस्स करुनी, हृदय पाणी-पाणी;
ये रे पावसा, एक सरी तरी, रिमझिमल्यावाणी,
बाप बीजाचा मलूल झाला, हिरमुसल्यावाणी!

शब्दखुणा: 

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ९ : आंब्यांचे दिवस

Submitted by अनया on 10 July, 2026 - 07:11

काही चित्रपटात किंवा नाटकात एखाद्या सामान्य माणसाला एक दिवसासाठी राजा किंवा मुख्यमंत्री करतात. हे गोष्टीत ठीक आहे. प्रत्यक्षात असं कधी होणार नाही. तरी पण कल्पना करायची झाली तर एक जानेवारीला आपण मुख्यमंत्री व्हायचं, असं मी कधीचंच ठरवलं आहे. एक जानेवारीच का? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक जानेवारीला हापूस आंब्याची पहिली पेटी कोकणातून भेट म्हणून येते, (असं ऐकलं आहे) म्हणून!! खरं खोटं वर्षा बंगल्याच्या रहिवाशांना ठाऊक. अश्या ह्या भाग्यवान माननीयांना वगळलं, तर बाकी जनतेचे आंब्याचे दिवस एप्रिल-मे महिन्यात सुरू होतात. वर्तमानपत्रात ‘फळांच्या राजाचे पुण्यात आगमन’ वगैरे बातम्या झळकतात.

विषय: 

पानी फाऊंडेशन - एक परिस - भाग २

Submitted by साधना on 6 June, 2026 - 11:25

१९६५ मध्ये सलग दोन वर्षे देशात पडलेल्या भयंकर दुष्काळाने भारतातील जनतेवर उपासमारीची वेळ आणली. अन्नधान्य आयात करुन लोकांचा जीव जगवणे सरकारला भाग पडले.

परत अशी वेळ देशावर येऊ नये म्हणुन हरित क्रांती जन्माला आली. त्याखाली जास्त उत्पन्न देणारी संकरीत बियाणे भारतात झपाट्याने विकसित झाली व प्रसारीत झाली. त्याआधीची प्रचलीत पारंपारिक बियाणे मर्यादित उत्पन्न देत होती.

शब्दखुणा: 

पानी फाऊंडेशन - एक परिस - भाग १

Submitted by साधना on 5 June, 2026 - 04:26

सत्यमेव जयते ही सिरिज साधारण २०१२ मध्ये प्रसारीत व्हायला सुरवात झाली. त्यात काही भाग शेतीसंबंधी होते. त्यात एक होता महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यातली पाणीटंचाई आणि एक होता पिकांवरील किटकनाशकांमुळे शेतकर्‍यांमध्ये वाढलेले कर्करोगाचे प्रमाण.

कार्यक्रमाचा निर्माता आमिर खान याची या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांशी ओळख झाली.

विषय: 
शब्दखुणा: 

भारतातील शेती - समस्या, उपाय आणि अनुभव

Submitted by उपाशी बोका on 22 April, 2026 - 14:19

साधना यांचे शेती याविषयी लिहिलेले अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाड्यावरून वाहून जातात. म्हणून एक स्वतंत्र धागा सुरू करत आहे. इथे शेती संदर्भात साधना यांचे प्रतिसाद एकाच ठिकाणी मिळू शकतील आणि शेतीविषयी समस्या, उपाय आणि अनुभव यांची सर्वांना चर्चा करता येईल.

शब्दखुणा: 

मधमाश्यांचे अद्भुत जग - ४

Submitted by साधना on 9 March, 2026 - 04:05

राणमाशीनंतर आपण आता कामकरी माशीबद्दल माहिती घेऊ. (Worker Bee).

पोळ्यात सगळे काम कामकरी माश्या करतात हे ऐकुन होते. पण नेमके काय काम करतात आणि त्यांचा जीवनक्रम कसा असतो हे कळल्यावर माझा जबडा द मास्कमधल्या जिम कॅरेसारखा जमिनीवर पडुन गडाबडा लोळायला लागला. Happy मुळात मधमाशी हे प्रकरणच थक्क करणारे आहे आणि त्यातल्या कामकरी माश्या तर एकदम जबडापाडू आहेत.

आपण या प्रचंड कामसु माशीचा जन्म कसा होतो ते आधी पाहुया.

शब्दखुणा: 

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ८ 'ना कुछ मेरा, ना कुछ तेरा'

Submitted by अनया on 6 November, 2025 - 08:26

मध्यंतरी काही कारणामुळे दोन आठवडे शेतावर जाता आलं नाही. आपापले काम-धंदे सोडून शेती करायला लागलो, त्याला आता पाच वर्ष झाली. पाच वर्षात शेताचा इतका लळा लागला आहे, की बाहेरगावी गेल्यामुळे किंवा काही वैयक्तिक अडचणींमुळे जर काही दिवसांची गॅप झाली, तर माझ्या डोळ्यासमोर शेताचा रस्ता, तिथली झाडं येऊ लागतात! त्यामुळे शाळेत असताना ट्रीपला जायच्या दिवशी ज्या उत्साहाने उठायचो, तशाच उत्साहाने उठून, आवरून डबा, पाणी, शेताचे कपडे अशा ठरलेल्या गोष्टी घेऊन निघालो. दर वेळी जाताना साधारणपणे त्याच वेळी, त्याच रस्त्याने, त्याच गाडीत बसून आणि आम्हीच दोघं जातो. परिणामी आमचं सगळं सेम टू सेम असतं.

विषय: 

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

Submitted by मार्गी on 29 April, 2025 - 11:14

नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ५

Submitted by साधना on 10 June, 2024 - 12:14

Pages

Subscribe to RSS - शेती