मी जेव्हा नवा नवा कार्पोरेट जगात रूजू झालो त्यावेळी एक मौलिक अनुभव आला. तो म्हणजे वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभराच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती प्रक्रिया अशी होती:
.
१) आपल्या कामगिरीचे अवलोकन करून स्वतःच्या कामगिरीचे आढावा आणि मुल्यमापन कंपनीच्या अंकीय नोंदवहीत नोंदवायचे
२) मॅनेजर त्यांचा अभिप्रायाची नोंद करायचे
३) तुमच्या वर्षकार्याचा आढावा आणि मुल्यांकनाचे एक गुणोत्तर तयार होऊन त्यानुसार गुणांकनाची नोंद तुमच्या नावाने कायमच्या दस्तावेजांमधे जोडली जायची.
.
मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.
सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? ही कल्पना खरी का? जंगलात खरोखरच कोणी राजा असतो का?
.
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? परंपरेने एखादे गृहितक चालत आलेले असेल तर ते तसेच स्वीकारायचे की त्यावर स्वतंत्रपणे विचार करायचा. आपण असे समजू शकतो की जे मागच्या पिढ्यांनी सांगितले ते सगळे बरोबरच आहे आणि त्यामुळे त्याला तसेच ग्रहण करायचे आणि अवलंबत जायचे.
.