प्रिय पप्पा,
मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती.
दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो."
"आमच्या खेळाचे नाव आहे "विकल्प". विकल्प म्हणजे पर्याय, या खेळात तुमच्या समोर तीन पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आम्ही आधीच निवडलेला आहे, तो पर्याय तुम्ही ओळखायचा, बाकीचे पर्याय फक्त भुरळ घालतील पण हा एकच पर्याय तुम्हाला यशस्वी करू शकतो"
"मी परत एकदा या खेळाचे नियम सांगतो, सोपे आहेत"
१) या खेळात, तुमच्या समोर तीन माणसे आहेत, त्यांची नावे आहेत "ए", "बी" आणि "सी"
२) त्यातला एक खरे बोलतोय आणि बाकीचे दोघे खोटे बोलत आहेत.
३) जो खरे बोलतोय त्याला पैशाची सर्वात जास्त गरज आहे.
आधुनिक शब्दकोशातून:
ट्र्म्पणे!
क्रियापद.
अर्थ:
१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.
२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.
३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)
ह्या ऑक्टोबर महिन्यात लंडनला गेले होते. उन्हाळा संपुन फॉल सुरु झाला होता. दिवस आक्रसले होते . झाडांची पान गळण्याच्या तयारीला लागली होती. तपमापकातला पारा ही हळु हळु खाली खाली यायला लागला होता. संध्याकाळी बाहेर खेळणारी मुलं ही आता दिसेनाशी झाली होती. भर दुपारीच सावल्या लांबल्या होत्या. थंडी दिसामासानी वाढायला लागली होती. उन्हाळ्यात कधी तरी निळं भोर दिसणाऱ्या लंडनच्या आकाशाने आता त्याचा करडा रंग परत घेतला होता. आकाशात बहुदा ढगांचीच गर्दी असे आणि त्या बरोबर कधी ही पडणारा तो पाऊस ही असेच .
असं दिसत असे कायम मळभटलेलं
फेसबूकवर देखील सामाईक चर्चेसाठी ग्रूप बनवू शकतो मात्र तिथे स्वत:ची पर्सनल वॉल असा प्रकार असतो, तोच जास्त वापरला जातो. बरेच जण फेसबूकवर फिरणारे फॉर्वर्ड शेअर करतात, स्वत:चे फोटो शेअर करतात, तर क्वचित काही जण आपले स्वत:चे विचारही उधळतात. त्याखाली काय कशी प्रतिक्रिया द्यावी याचे बरेच जणांना भान नसते असे मला आढळून आले आहे. तसेच शेअर करणारयांनाही बरेचदा काय शेअर करावे याचे भान नसते. फेसबूकवर आपले शाळा कॉलेज ऑफिसपासून फॅमिली मेंबर्स आणि शेजारीपाजारीही लिस्टमध्ये असतात आणि ते वाचत असतात हे समजायला हवे.
फेसबूक पासून तसे मी दूरच राहतो पण तरी हे काही अनुभवलेले किस्से.
किस्सा 1 -
मोठ्याच अंतराळानंतर घरी आलो आहोत. आईला आनंद होतो. ती काहीबाही बोलत राहते. एवढ्यात काय काय होऊन गेलंय ते सांगते. दरवेळी एखाद-दुसरा नातेवाईक ह्या ना त्या कारणाने गेलेला असल्याचे समजते. दरसाल माणसे पडत जातात. आईचं हे सांगणं बरेचदा 'माझे फारसे दिवस राहिलेले नाहीत' हे सांगणंच असतं. आपण ओळखून विषय टाळतो. ती आपल्यासमोर वैद्यकीय तपासण्यांची अख्खी फाईल मांडते. जणू आपल्याला हे सगळं समजतं आहे अशा उत्साहात आपण ते सगळं बघतो. आईला धीर देतो. ह्यावेळी तिचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे म्हणून डॉक्टरांनी तिला काही नवी औषधं सुरू केलीयत. बाटलीतलं ते लालभडक औषध बघून आपण उगाचच 'अरे वा' म्हणतो. 'भारीच औषध दिसतंय.
सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता.
डिसेंबर / जानेवारी महिना आला की आपल्याकडे थंडीचा मोसम सुरू होतो. सध्या मुंबईत जरी थोडीशी थंडी जाणवत असली तरी ती नाशिक, नागपूरच्या मानाने ती नाममात्र आहे. अर्थात उत्तर भारतातल्या थंडीशी आपण या थंडीशी तुलनाच करू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की जंगलात थंडीचे प्रमाण शहरातल्या थंडीपेक्षा जास्त असते. या काळात धुक्यामुळे आणि थंडीमुळे पक्षी, प्राणी अगदी कमी दिसतात. जंगलात फुलपाखरे आणि इतर किटकही अगदी कमी प्रमाणात दिसतात. यामुळे सकाळी जंगलात कुठलीच हालचाल जाणवत नाही.
"घरात कोणीतरी असल्याचा भास होतो" बाबा माझ्या मागच्या भिंतीकडे बघत म्हणाले.
"कसला भास?" मी विचारले.
"घरात कोणीतरी रात्रीच्या वेळेस येते" बाबांची नजर अजूनही भिंतीवर स्थिर होती.
"मला कळाले नाही" मी बाबांकडे रोखून बघत म्हणालो.
"भाऊबीज"
"अक्षु हे बघ सुमीतने घेतले मला हे कानातले , मस्त आहेत ना?"
कावेरी अक्षताला ते कानातले झुमके दाखवत विचारत होती.
कावेरीने विचारलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर अक्षताने "हमम" या एकाच शब्दात दिले.
अख्या ऑफिसला अक्षुचा हा शांत पणा माहीत होता.
अक्षता जॉइन झाल्यावर आधी सतत बडबड करायची पण गेल्या एक वर्षात ती खूप चेंज झाली होती.
आणि सर्वांना ते माहीत झालेल.
आज ऑफिसमधुन घरी यायला अक्षताला उशीर झाला.
दिवाळीच्या पहिल्या पहाटे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्व ऑफिसला आलेले.
"झालं आजपासून दिवाळी..
कॉलनी मध्ये प्रत्येकाच्या घरातून फराळाचा खमंग वास येतो..