एकनाथजी रानडे यांचे कार्य:
शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:
अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता,
त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.
११ ऑक्टोबर २०१६
"पप्पा तू ईथे झोप, उठू नकोस", काल रात्री जेवल्यावर तिने मला सोफ्यावर आडवे केले. मग आतल्या खोलीतून मोबाईलचा चार्जर घेऊन आली. स्वत:च्या गळ्याभोवती लटकावला. माझी बनियान वर सरकवली. आणि त्या चार्जरच्या वायरचे टोक माझ्या उघड्या पोटावर टेकवून म्हणाली, "मी तुला तापवते"
मी हडबडलो.. तापवते !! चार्जरने??
पण तिच्या गळ्यात लटकावलेल्या चार्जर कम स्टेथोस्कोपवरून काय ते समजलो..
मी तुला तपासते
मग मला बाऊ झालाय हे डिक्लेअर करून रीतसर औषध दिले गेले. पण सोबत आईसक्रीम सुद्धा दिले. हे कशाला विचारले, तर उत्तर आले, याने तुझा बाऊ बरा होऊन तू मोठा होशील.
व्हेंटिलेटर
सिनेमाच्या निमित्ताने परत एकदा या शब्दाची भेट झाली. दोन वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा भेटलेला हाच तो व्हेंटिलेटर. लाईफ सपोर्ट सिस्टिम एवढाच काय तो त्यावेळी समजलेला अर्थ .. पण नंतर वाटलं , आजच मरण उद्यावर ढकलणार एक साधनच ते. अगदी जवळच्या माणसाला व्हेंटिलेटर वर पाहणं , यासारखं दुर्दैव नाही.
काय गंमत आहे पहा, एकीकडे या हॉस्पिटलमध्ये आपली व्हेंटिलेटर शी नव्याने ओळख होते आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या माणसांची परत नव्याने भेट घडते.. होत राहते ... रोजच.
मैफिल
सारं जग उजळून गेल आणि मनातले काही अंधारे कोपरे, आज जरा जास्तच सलू लागले. आयुष्यातली ती रिकामी जागा अन् मनांत न मावणाऱ्या असंख्य आठवणी. एखादी मैफिल संपूच नये असं वाटत असताना संपते अन मनाला चूटपूट लावून जाते. पण काही स्वर आणि शब्द मात्र मनातच रेंगाळतात तसच काहीस...
तिन्हीसांजा झगमगणारे आकाश दिवे, दिपमाळा, रांगोळ्या, मातीचे किल्ले, त्यावरची चित्रे, फटाक्यांची आतिशबाजी.... एकीकडे रंगांच्या आणि दिव्यांच्या प्रकाशात सारा आसमंत न्हाऊन गेला होता तर दुसरीकडे सारा काळोख, इथे दाटला होता, माझ्या मनांत.
"नमस्कर"
मी समोर बघितल एक ३०-४० चे गृहस्थ माझ्या समोर उभे होते.
त्यांच्या बरोबर एक लहान मुलगी साधारण ५ वि ६ वि त असावी
थोडीशी नाराजी त्या मुलीच्या चेहरया वर दिसत होती. "या ना !" , मी म्हणालो.
ते गृहस्थ आत आले गोंधळ लेले होते कुठून सुरुवात करावी ह्या सम्भ्रमात ते असावेत
त्यानी बोलायला सुरुवात केली .
"मी अनिकेत लेले कांट्रेक्टर आहे, ही माझी मुलगी वर्षा" आता ७ वि ला आहे, सेंट जेव्हियर मध्ये
एक दोन दिवस पूर्वी मैत्रिणीं बरोबर पिक्चर ला गेली होती ,
आणि सगळ बदलल कुठे तरी दृष्टी लाऊन बसते रात्र रात्र जागीच असते कधी कधी स्वत: शी च
बडबडत असते जेवत नाही, अंघोळ नाही,
नमस्कार!
२०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' आपल्या मायबोलीने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.
त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय. सर्वांना समजेल अशी आशा आहे..
प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय.
.....
ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते.
मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं.
तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली.
(सूचना: लिखाण केवळ विनोदनिर्मिती करिता केले गेले आहे. गंभीरपणे घेतल्यास व त्रास झाल्यास लेखक जबाबदार नाही. तसेच यातील घटना व पात्रे काल्पनिक असून <...वगैरे वगैरे नेहमीचेच. आणि शेवटी...>तो केवळ योगायोग समजावा)
"हेल्लो"
"हेलो. नमस्ते सर. गुड मॉर्निंग"
"झालं का तुझं?"
"सर डिजाईन झालंय. पण थोड़े इश्श्युज आहेत. आणि ट्रायल सुद्धा..."
"यार करून टाक ना पट्कन. अजून चार माणसं देऊ का तुला मदतीला? कुठं अडून राहिला आहेस तू अजून? भावा, दोन दिवसात करायचंय आपल्याला. मोठ्या सायबांना दिवसातून चार वेळा फोन येतोय पीएमओ मधून. ते परत मग मलाच विचारतात. काय उत्तर देऊ त्यांना रोज रोज तूच सांग?"
प्रिय पप्पा,
मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती.
दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो."