विनित ने कंप्लेंट केल्यानंतर त्याची केस मी वरिष्ठांना सांगून माझ्याकडेच घेतली. आता मला त्या आय पी ॲड्रेस चा शोध लावायचा होता. ते आय पी ॲड्रेस आत्ता तरी ॲक्टीव्ह दाखवत नव्हते. मी सिस्टीम वरून सर्च केलं तर त्यांचं लोकेशन मुंबईपासून खूप लांब एका घनदाट जंगलात दाखवत होतं. असेलही त्यांची एखादी गुप्त जागा किंवा एखादं घर. न जाणो ते आय पी ॲड्रेस आता अस्तित्वात असतील की नाही. या केसचं सारं काम मी घरूनच करत होतो. विनितला मी स्वतः सांगितलं होतं. केस सोडविली की मी स्वतःहून भेटेन तोपर्यंत लॅपटॉप वापरू नको असंही सांगितलं.
आज कथा पूर्ण झाली. एक महिना या कथेवर काम करत होतो. तसं पाहिलं तर मी पुर्ण वेळ लेखक नाही. पण मला कथा लिहायला आवडतात. लघुकथा. सुचेल तशी लिहितो आणि शनिवारी रविवार त्या व्यवस्थित संकलित करून ठेवतो लॅपटॉपवर. माझं नाव विनित सदानंद राऊत. मी पुर्ण वेळ अकाऊंटंट आहे. आज मी या कथांबद्दलच एक कथा सांगणार आहे. कथा सुचली की मी मोबाईलमध्ये टाईप करून नंतर लॅपटॉपवर कॉपी करत होतो. अशा वीस पंचवीस कथा लिहिल्या होत्या मी. पण त्या फक्त माझ्या लॅपटॉपवर होत्या.
सुखदाचा फोन आला आणि रत्नाचा जीव कासावीस झाला.
"नीट जा, जपून जा, काळजी घ्या...पोहचल्यावर फोन करा, अंतराची काळजी घ्या......." रत्ना वारंवार दोघांना फोनवर सांगत होती.
"आई पण न....खूप काळजी करते" सुखदा
"का ग काय झालं?" जयेश
"काही नाही रे परवा शाळेतून परस्पर जाऊनच आईला सांगणार होते. जाणं झालं नाही रे. अपण दिवेआगरला जातोय हे फोनवर सांगितले तर इतक्या इंस्ट्र्कशन्स देत होती की काय सांगू." सुखदा
"साहजिकच आहे" जयेश
"हो रे, एक तर अंतराची पण भेट झाली नाही म्हणून चिडली असावी बहुधा." सुखदा
"कित्ती सुचना.....मी लहान नाही ... चक्क आई आहे एका मुलीची" सुखदा
कामाचा प्रचंड लोड उपसत व ऑफिसच्या बदलत्या वेळा सांभाळत आकाश दमून जायचा. कधी रात्रपाळी, तर कधी अर्धा दिवस अर्धी रात्र अशी वेळ गाठावी लागे. उशिरा घरी येणे नेहमीचेच झाले होते. जनसामान्यांची संध्याकाळ म्हणजे त्याची ऑफिसला जायची वेळ असे. शेजाऱ्यापाजाऱ्यांना तो क्वचितच दिसे. त्यामुळे त्याची आजूबाजूच्या लोकांशी फक्त तोंडओळख होती. पण कामाच्या अनियमीत वेळा ही एक गोष्ट सोडली तर काम, पगार आणि कंपनी चान्गली असल्यामुळे ही कंपनी सोडण्याचा सध्या तरी त्याचा काही विचार नव्हता. एकंदरीत त्याचं बरं चाललं होतं. लग्नबिग्न झालेले नसल्यामुळे कधीही आलं गेलं तरी वाट पाहणारं आणि कारण विचारणारं कोणी नव्हतं.
ह्या गूढकथेचा एक भाग मी आधी नेकलेस या नावाने आधी प्रकाशित केला होता. पण आता डायरी या नावाने संपूर्ण कथा टाकतोय
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरदहस्त
(खालील प्रसंग माझ्या मित्राच्या बाबतीत खरोखर घडलाय त्यात थोडा बदल करून माझ्या तोकड्या कल्पना शक्ती प्रमाणे मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय).
मी त्या वेळेस 15-16 वर्षाचा असेल तेव्हाची ही घटना
दिनांक २१ फेब्रुवारी २०५७: एक अंत्ययात्रा चाललेली आहे, शहरातले सर्व आणि देशातले काही दिग्गज पोलिस अधिकारी, राजकारणी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक जमलेले होते. स्वतः श्रीमती तेजस्विनी विष्णू कुलकर्णी पुढे चालल्या होत्या, अर्थातच, अंत्ययात्रा त्यांच्या पतीची डॉ. विष्णू कुलकर्णी यांची होती. तेजस्विनीला माहित होते कि येथे जमलेला एकूण एक व्यक्ती हा फक्त उद्या येणाऱ्या वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोत दिसण्यासाठी इथे जमलेला होता. प्रत्यक्षात जरी विष्णू कुलकर्णी यांनी कुणाशी शत्रुत्व केले नाही तरी त्यांच्या कर्तुत्वाने त्यांना भरपूर शत्रू मिळाले होते.