गेल्याच आठवड्यात गावी गेले . (चिपळूण , गुहागर ) काहीही कारण नाही .... अगदी सहज ....
सहज नाही म्हणता येणार ... मनातील काही जख्मना फुकर घालायला ... जखम बरी नाही होणार पण थोडीशी राहत ?????
डोक्यात भुणभुणाऱ्या प्रश्न्याचा भुग्याला मुठीत धरून थोड्यावेळासाठी का होईना त्याची भुणभुण बंद करायला ...
तुम्ही लेखाचं शीर्षक पुन्हा वाचून पाहिलंत ना? अहो, वाक्य चुकलेलं नाहीए. तुम्ही बरोबरच वाचलंय. OK च्या अगोदर मी NOT टाकलाय. NOT म्हणजे नाही, नको! झालंय काय कि 'HORN OK PLEASE 'ह्या वाक्याची लोकांना एवढी सवय झालीय कि सर्वांना वाटायला लागलंय कि HORN वाजवणं OK आहे. हॉर्न वाजवायला सर्वांचीच संमती आहे. कुठेही कधीही आपल्याला हॉर्न वाजवायचा परवानाच मिळालाय. त्यावर पुन्हा पुढे PLEASE चं आर्जव लावलंय. म्हणजे अगदी हातापाया पडून "हॉर्न वाजवा हो वाजवा" असं म्हटल्याचा फिल येतोय.
बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.
मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.
आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
पुण्यात यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव संपन्न होत आहे ...
त्या निमित्ताने : सवाईला अनेक वर्षे गाण्याचा आनंद घेतानाच केलेले एक निरीक्षण
सवाईला दोन प्रकारचे लोक येतात
पहिल्या प्रकारचे लोक ....
हे बरेचदा ऑफिस मधून डायरेक्ट येतात. जमाल तर योग्य करणे देऊन राजाही मिळवतात .
गेल्या अर्धशतकात शहरीकरण अफाट वाढले. महानगरांचा तर चेहराच हरवून गेला. तिथल्या गतिमान जीवनात माणसे पिचून निघाली. पैशापाठी धावता धावता आयुंष्यात भावनांना फारसे स्थान उरले नाही. निस्वार्थी विचारपूस तर दुर्मिळच झाली. ‘’मी माझा’’ हा माणसांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. माणसे अनेक शारीरिक व मानसिक रोगांनी ग्रस्त झाली. याच्या जोडीला काही ‘सामाजिक रोग’ ही आपल्याला चिकटले आणि त्यांचा प्रसारही झपाट्याने झाला. त्यापैकी एक रोग म्हणजे ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’. या रोगाचा विचार आपण या लेखात करूयात.
ज्या घरात किमान १ महिना वास्तव्य झाले ते माझे घर, अशी सुटसुटीत व्याख्या केली तर मी
आज माझ्या १९ व्या घरात राहतोय. यापैकी फक्त ३ अपवाद सोडले तर हि सर्व घरे मी, स्वतः
मॅनेज केलीत. मॅनेज केलीत म्हणजे घराची साफसफाई, सामान भरणे, वीज पाणी, आला गेला,
पै पाहुणा... पण तरीही मी घरांना संभाळले, असे मी म्हणणार नाही. त्यांनीच मला संभाळले.
त्यातल्या वास्तव्य काळातच नव्हे तर नंतरही माझे मन त्यात गुंतून राहिले. घर, सभोवताल, शेजारी
यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. जेव्हा जेव्हा शक्य झाले, तेव्हा तेव्हा मी या घरांना परत भेटी दिल्याच,
साधारण पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. सोमवारची सकाळ. रविवारचा हॅंगओवर उतरायला तयार नव्हता. ऑफिसला जायचे की नाही या विचारांत बिछान्यातच लोळत पडलो होतो. जसा दिवस चढत होता तसे ऑफिसला जायचा उत्साह अजून मावळत होता. ऑफिसमध्ये फारसे महत्वाचे काम नव्हते. गेलेच पाहिजे असे गरजेचे नव्हते. सुट्ट्या देखील बर्याच शिल्लक होत्या. थोडक्यात चादर झटकून उठण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज होती. ईतक्यात अलार्म वाजल्यासारखा फोन खणखणला. रात्री अवेळी वाजलेल्या फोनपेक्षा भल्या सकाळी वाजलेला फोन मला जास्त धडकी भरवतो. कारण तो फोन ऑफिसचा असण्याची शक्यता असते. काहीतरी अर्जंट काम निघाले असणार.
एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली.
उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं.
कथा एका दिवसाची
वेळ -, सकाळी 9.30
आज सकाळी जरा लवकर आवरले सगळे... विचार केला खुप दिवस बँकेची कामे अपूर्ण आहेत.. आज वेळ आहे तर पुर्ण करावीत ... ब्रांच नवीन घरापासून लांब होती. ती पण बदलायची, पीन घ्यायचा वै वै. घरातून निघाले.. बसला तुफान गर्दी.. एक तास फिरुन स्टॉप आला माझा. पटकन बँकेत शिरले, सहज मनात आले ATM कार्ड हातात ठेऊ, फारच सुधारली असेल बँक तर बरं हाताशी असलेले. सगळी बॅग उलथीपालथी केली पण पर्स सापडली नाही. मग माझी खात्री पटली आज आपली पर्स खरचं हरवली आहे (जवळपास मला रोजच असे वाटते की गेली वाटते पण डब्याखाली, डायरीमागे, फोल्डरच्या फ्लॅपमध्ये अडकलेली परत सापडते)