सुखदाचा फोन आला आणि रत्नाचा जीव कासावीस झाला.
"नीट जा, जपून जा, काळजी घ्या...पोहचल्यावर फोन करा, अंतराची काळजी घ्या......." रत्ना वारंवार दोघांना फोनवर सांगत होती.
"आई पण न....खूप काळजी करते" सुखदा
"का ग काय झालं?" जयेश
"काही नाही रे परवा शाळेतून परस्पर जाऊनच आईला सांगणार होते. जाणं झालं नाही रे. अपण दिवेआगरला जातोय हे फोनवर सांगितले तर इतक्या इंस्ट्र्कशन्स देत होती की काय सांगू." सुखदा
"साहजिकच आहे" जयेश
"हो रे, एक तर अंतराची पण भेट झाली नाही म्हणून चिडली असावी बहुधा." सुखदा
"कित्ती सुचना.....मी लहान नाही ... चक्क आई आहे एका मुलीची" सुखदा
ती , हो आवडते मला, का प्रेम करतो म्हणून?
नाही हो
आधी आवडली म्हणून तर प्रेम झाला ना
का आवडते ती मला, कारण अनेक आहेत, actually रोज ती नवे कारण देते मला तिच्या प्रेमात नव्याने पडायला
ती आवडते मला सुंदर दिसते म्हणूनच नाही पण मनाने खूपच सुंदर आहे म्हणूनही
ती आवडते मला माझ्यावर प्रेम करते म्हणूनच नाही पण माझी खूपच काळजी करते म्हणूनही
ती आवडते मला लहान मुलीसारखी वागते म्हणूनच नाही पण खूपच maturity दाखवते कधी कधी म्हणूनही
ती आवडते मला लेखणीशी संवाद करते म्हणूनच नाही पण माझ्यावर कविता करते म्हणूनही
आभाळमाया..।
सात पावलं सोबत चालून
ती तुमची होते
तुमच्या संसार वेलीवर
फुलं फुलवीत रहांते..
एव्हढं सर्व तुम्ही
सोईस्करपणें विसरतां
सदा सर्वकाळी तिच्यावर
विनोद करत रहतां
रोज गरमागरम जेवण
तिनेच खावू घालावे
दिवसभर राबूनही पुन्हां
हसून स्वागत करावे
मोलकरीण सारखं तिने
दिवसभर खपावं
आणि तिच्या विनोदांवर
तुम्ही हसत बसांव..?
प्रेम
तू असा दीड शहाणा
नाही म्हटल्यावर निघून गेलास
एकदा तरी मागे वळून
पाहायचेही विसरून गेलास
हो म्हणजे नाही म्हणायची
चारचौघात किंमत असते
उघड उघड जगासमोर
प्रेम करायची हिंमत नसते
प्रेमाच्या वाटेवर पहारे किती
घरी मायबाप आणि
दारी सगळ्यांचीच भिती
थोड्याही शंकेने धडधडते छाती
बोलण्याची अबोल भाषा असते
नजरेला नजरेतून आस दिसते
हृदयाला हृदयाची साथ असते
बिनतारी संदेशाची बात असते
हीच प्रेमाची सुरूवात असते
एक दीर्घ कथा मनात आकार घेत आहे .. तीच इथे प्रकाशित करत आहे ...कशी वाटली ते नक्की सांगावे..
नवे कितीही नाते जुळले तरी जुने तुटत नाही
संपले जरी साथ आपले मात्र प्रीत सुटत नाही
असतात सार्या दिशा साक्षी साक्ष देण्या प्रिया
ते सोबतीस आहे म्हणून तुझी उणीव आटत नाही
दूर दूर आपण, मध्ये इतके खोल पण रिते अंतर
मीलनाचे स्वप्न नयनी, सत्यात काही घटत नाही
मिळाली सौख्याची पर्वणी पण तुजवाचून अपुरे
मी श्वास रोखून धरले असता दुरावे मिटत नाही
तू लहर जणू प्रेमाची मी तप्त आतुर किनारा
विरहाची ही प्रतीक्षा इथेच काही संपत नाही
काव्य शांत व्हावे तर बोलतील ही हे मौन
शब्द रुजलेल्या पानात वादळ उठत नाही
मन माझे हळवेसे गीत आहे,
आनंदाचे सुरेल संगीत आहे,
हळुवार भावनांची नाजुकशी प्रीत आहे,
जीवन जगण्याची सुंदरशी रीत आहे,
स्वप्नांच्या झऱ्याचा निरंतर सा स्रोत आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...
मन माझे कोकिळेची तान आहे,
सुरांचे संमिश्र मधुरसे गान आहे,
बेधुंद वाऱ्याचा वेग बेभान आहे,
जपून ठेवावे असे पिंपळाचे पान आहे,
मन माझे हळवेसे गीत आहे...
बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
“तो’ पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि “ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही…’ ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या “हॅपी मूड’मुळे सुखावली.
आहे अजूनही मी
पाहित वाट राधे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
बोल मज "हे मुरारी
राधा तुझीच सारी"
भेटावयास ये मज
तोडू नकोस वादे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
मी शाम-रंग माझा
तू पुष्पगुच्छ साजा
बिलगून गंध दे मज
इतकेच शब्द साधे
डोळ्यात बोचते मज
माझेच रूप आधे
वाटे तुला ना काही
श्रीकृष्ण वाट पाही
गोपी असूच दे मग
रुसवा कशास मागे
डोळ्यात बोचुदे मज
माझेच रूप आधे
©-जोतिराम
प्रेम फुल
सोडताना हात तुझा मनी काहूर दाटे
नजरेआड करताना आयुष्य क्षणभंगुर वाटे
हवालदिल मी तुझ्या कडे एकटक पाही
पाहता पाहता तुला, तुझाच होऊन राही
अगं वेड लावलास मला वेडा मी झालो
तू नेशील त्या वाटेवर पाठीमागे आलो
दुरावलो सगळ्यांपासून हरवलं मी मला
आता परत जा म्हणतेस पटत का तुला
पाऊलखुणा ही पुसल्या मी, प्रेमवेडे चाळे
मनो मनी बांधले स्वप्नांचे एकावर एक माळे
रमलो ग मी तुझ्यात मंत्रमुग्ध झालो
क्षणो क्षणी हृदयात तुला साठवत आलो