खूप काही अनाउन्समेंट कानावर पडतायत...
त्यात फेरीवाल्यांचे आवाज वेगळेच...
ट्रेनचा डबा तसा फारसा भरला नाहीये पण नजरेला कोणी भावत नाहीये ...खिडकीतून पाऊस दिसतोय .. ofcourse मला विंडो सिट यासाठी तर आवडते ...खूप दिवसांनी गावाला जातेय ..एक्साईटमेंट होती ..पण आता कमी होत चालली आहे कारण ट्रेन अर्धा तास झाला आहे तिथेच आहे ....
स्टेशन फारसं ओळखीचं नाहीये म्हणून खिडकीतून जमेल तेवढा जमेल तसा पाऊस जमा करतेय मग तो ओंजळीतून निसटताना चा असो की डोळ्यात भरून घेतानाचा ....
घडी बघून बघून डोळे थकले होते .. त्याचे काटे पुढे सरकत होते पण माझी ट्रेन नाही...
तेवढ्यात....
मी आपला त्याच एका प्रश्नात अडकलेला - "लग्न करायचं की नाही"?
मग आयुष्यात तू आलीस.
तरीही पूर्वग्रहदूषित ह्या मनाचा प्रश्न कायमच ! पुढे जावं की नाही, जावं तर का जावं? नाही जावं तरी का नाही?
प्रचंड विचार, वाचन आणि चर्चा झाल्यावर निर्णय झाला.
आपलं लग्न झालं.
तूसुद्धा केलाच असशीलच की असा विचार. तुलाही पडले असतील असले प्रश्न.
मला आठवतचं नाही कधी आपण ह्याबद्दल चर्चा केली असेन.
लग्न झाल्यावर सुरुवातीला सगळे किती कौतुक करायचे आपलं. पण सोबत टोमणेही मारायचे. "नवीन लग्न आहे, सुरुवातीला कौतुक होणारच. नंतर आहेच आपलं, सर्वां सारखंच !"
तुझे ते नयन भोळे
त्यात साठवले सागर निराळे।
त्या सागराच्या उसळणाऱ्या
अथांग लाटा ।
त्यात शोधीत होतो
मी प्रेमाच्या वाटा।
वाट शोधीत असताना
भिजलो मी मनोमनी।
तुझ्या नजरेच्या
एका कटाक्षानी,
वाटलं मला सोडिले तु
प्रेमाचे बाण त्या छणी।
बाणांनी भेदताच मनाला
झालो मी घायाळ राणी।
या घायाळ मनाला
औषध एकच असावं।
आयुष्यात नाही जरी,
स्वप्नात तुझं रूप दिसावं।
त्या स्वप्नांना..
काय करु? समजत नाही..
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या
स्वप्नांना
मी आता जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
मन वढाय वढाय...
nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न... 
पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?
ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?
ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?
हळूवार वेच ती
प्राजक्ताची फुले
रानपाखरे वेलीवरती
घेती तेथे झुले
मधुर गोजिरी होते किलबिल.
तुझ येण्याची देती चाहूल.
प्राजक्त ही मग बहरून येतो
शुभ्र फुलांची रास घालीतो
केस मोकळे शुर्भ वसने
पायावर ते अलगत बसणे
फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून
चोरुन घेई गंध नेटका
अंगणी वाहे वारा अवखळ
प्राजक्ताचा गंध सुगंधी
की आसे तो तुझाच दरवळ
अस्तित्व ते तुझे..
धुक्यासम अस्तित्व ते तुझे
अलवार मिठीत तुझिया मी येई
त्या मिठीत मी विरताना
तुझे अस्तित्व विरुन जाई
मृदुगंध अस्तित्व ते तुझे
नव्याने फुलणारे
दरवळ दाटला आसमंतात
जीवन सुगंधी करणारे
तुला श्वासात भरु पाहता
मजला भुल देणारे
अस्तित्व ते तुझे
धुसर दर्पणाप्रमाणे
ओळख नजरेत असुन
मज सदैव अनोळखी भासणारे
अस्तित्व ते तुझे
ओल्या रेतीत उमटणाऱ्या
पाऊलखुणेप्रमाणे
नोंद मनात होताच
सागराने पुसून टाकलेले
प्रेम थांबते
********
युगो युगी
प्रेम थांबते
वाट पाहाता
वाटच होते ॥
विना अपेक्षा
कधी कुठल्या
जळणारी ती
ज्योत होते ॥
गीता मधले
शब्द हरवती
सूर सुने ते
करून जाती ॥
तरीही कंपण
देहा मधले
अनुभूतीचे
स्पंदन होती ॥
शोध सुखाचा
खुळा नसतो
अंतरातील
हुंकार असतो ॥
आनंदाच्या
सरीते आवतन
आनंदाचा
सागर करतो ॥
क्षण अपूर्ण
जगण्यातला
पूर्णत्वाचे
क्षेम मागतो ॥
अन् जीवाच्या
जगण्यातला
दिप संजीवक
प्रदिप्त होतो॥
आकाश आज खूपच अस्वस्थ होता. आज बरोबर एक महिना झाला होता , त्याला श्वेताला भेटून . तरीसुद्धा तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून दूर होत नव्हता. तो रात्रंदिवस फक्त तिचाच विचार करत असे.
आकाश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारीतेचं शिक्षण घेतोय. त्याचा स्वभाव कमालीचा शांत आहे , याउलट श्वेता ही मनमिळावू आणि बोलघेवड्या स्वभावाची मुलगी आहे. श्वेता ची आठवण येताच त्याच्या चेहर्यावर हलकेच स्मित हास्य उमटले. तिच्या आठवणीने तो बेफाम झाला त्याचे भान हरपले. त्यांची पहिली भेट त्याला आठवली .
ते दोघं रेल्वे स्टेशनवर गेले.तिकीट खिडकीत जाऊन अनिकेतने पहिल्यांदा पुण्याला जाणारी गाडी आहे का गेली याची चौकशी केली. त्याला समजले की पुण्याला जाणारी गाडी पाचच मिनिटात प्लॅट फॉर्म नंबर एक वर येणार आहे. अनिकेत प्लॅट फॉर्मवर धावतच सुटला .त्याची नजर अन्विकाला शोधत होती .त्याला एका बाकावर अन्विका बसलेली दिसली .तीच लक्ष अनिकेतकडे नव्हतं .अनिकेत तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि तिच्या एक कानाखाली लावली .अन्विका जोरात बसलेल्या तडाख्याने एकदम भानावर आली तर समोर अनिकेत आणि मागे रुकसार धापा टाकत असलेली तिला दिसली .अनिकेत कडे न पाहता ती रुकसार कडे पाहत रागाने म्हणाली,