विरह..
चंद्र-तारकांनी भरलेले आभाळ हे आज
रिते आहे
मनातल्या विचारांचे
मळभ हे आज
आभाळातही दाटले आहे
तुझ्यासवे जगायचे होते
आयुष्य हे सारे
आणाभाका- वचनंही
दिलेली एकमेकांस
ते सारे धुक्यात
आज विरले आहे
आषाढघन होऊन
तु बरसुन गेलास
मनात नव्या जाणिवा
पेरुन गेलास
त्याच जाणिवांआधारे
जगते आहे
पण आता मी एकटी
कमी पडते आहे
दिले वचन मोडते आहे
तुला पाहिले
आणि कळले
प्रेम इतुके
सुंदर असते
ओठांना या
अन् उमजले
स्पर्श कोंवळे
मधूर कसे ते
चांदण्यातले
स्पर्श रेशमी
डोळ्यांमधले
रंग उसळते
तुला पाहता
ह्रदय थबकते
पाऊल अडते
खरे हे असते
आपण व्हावे
कधी कुणाचे
याहून मधुर
काहीच नसते
या क्षणावर
जीवन सारे
ओवाळावे
असेच वाटते
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
येथे मार्च ०७, २०१९ कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
लुटूपुटूचा डाव मांडूया
तुझा नि माझा खेळ रंगवूया
सारथी तू अन सोबती मी
स्वप्नातील वारू उधळूया
हरवून जाऊ धुक्यामध्ये
तुझ्या नि माझ्या स्वप्नांमध्ये
जे साकारले फक्त भासांमध्ये
ते अनुभवू आज श्वासांमध्ये
घडीभरच्या भातूकलीतील
खेळभांडीही मांडूया
तुझ्या नि माझ्या भासांमधले
घर-संसारही आज थाटुया
पुसटशा होतील मग मर्यादा
ओझरत्या स्पर्शावरच थांबूया
भान हरवता एकाचे
दुसर्याने अलगद सावरुया
लुटुपुटूच्या डावामधल्या
आठवणी हृदयात साठवूया
न उमटलेली डोळ्यांतील प्रीती
उरी जपुनी ठेवूया
प्रेम उष्टावले ओले
**************
प्रेम उष्टावले ओले
निळे आभाळ हे झाले
देही धरित्रीच्या पुन्हा
कोंब नवे अंकुरले ॥
आस डोळ्यात दाटली
कुण्या रूपात खिळली
किती सांगावे जीवाला
होडी धावते वादळी ॥
युगे उलटली तरी
रोज उगवतो तारा
लखलखते अंतर
पुन्हा कवळे अंधारा ॥
जादू स्पर्शात दाटली
कुण्या पुसट क्षणाला
मन हरवते तरी
त्याच स्मरून क्षणाला ॥
ओझे मनावर मोठे
मन प्रतिष्ठा गोठले
आत चुकार जीवाचे
पंख मुक्त भरारले ॥
फुल्लारी
भाग-५
चिन्मय
अभिचा फोन आला. त्याने जे सांगितले ते ऐकण्यासाठी किती वर्षांपासून आतूर होतो. एक वेडी आस होती. बहिण-भावाचे प्रेम होते ते. असच कधी कोणी सोडून जातं का? सारख मनात यायचे. आज आकाश मोकळे झाल्यासारखे वाटत होते. आनंद शब्दात मांडता येत नाहीया सिद्धी. जिच्या सोबत बालपण घालवले, हरवलेल्या त्या बहिणीची माया आज गवसली.
"सिद्धी....आपली गंधाली सुखरुप आहे."
फुल्लारी
४
स्वप्ना
गंधाली सापडण्याचा आनंद झाला होता. मन मात्र खजील झाले होते. मी तिला त्या दिवशी एकटे सोडायला नको होते. नेमकी मोहनच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि मला तिला एकटीला सोडावे लागले. काही अंशी का असेना, तिच्या आजच्या परिस्थितीला मी कारणीभूत होते. आजही भेदरलेली ती गंधाली आठवली की अंगावर काटे येतात.
प्रेम..
प्रेम म्हणजे
अथांग सागर
प्रेम म्हणजे
वाळवंटातील मृगजळ
ज्याने तहानलेल्याची
तहान काहीकेल्या
भागत नाही
प्रेम म्हणजे
विश्वास
प्रेम म्हणजे
आपुलकी
जो वेळप्रसंगी
माणुसकीला जागलेच
असे नाही
प्रेम म्हणजे
अटी
प्रेम म्हणजे
बंधन
जे माणसाला
एक माणुस म्हणुन
वागवत नाहीत
मुक्तपणे जगु देत नाही
फुल्लारी
२.
अभिराम
गंधाली इमोशनली माझ्यावर किती अवलंबून होती हे मला माहित होते. मी तिच्याकडे फक्त एक केस म्हणून बघत होतो. तिच्या आजच्या या परिस्थितीला, दु:खाला, किती ठाऊक नसले तरी मीच जवाबदार होतो.
आता पुढे काय? काय झाले असेल? अवि कुठे असेल? त्याला गंधालीबद्दल माहिती असेल? राधाक्का कशी असेल? प्रश्न आणि प्रश्न, प्रश्नांच्या गुंत्यात मी पुरता अडकलो होतो.
"ऋतु, प्रश्नांचा हा गुंता सोडवायलाच हवा."
"हो अभि, आताशा काही धागेदोरे सापडलेत." ऋतु
गंधालीतील माझी इनव्हॉलवमेंट ऋतुजा शोधायचा प्रयत्न करत होती. तिला आता सर्व सांगायलाच हवे.