अरुंधतीचा रागाचा पारा आज फारच चढला होता. कोरोना, कोरोना म्हणत घरातला प्रत्येकजण नुसता बसून होता. मार्च पासून जून पर्यंत मुलांनी सुट्टी म्हणून आणि नवऱ्याने लॉकडाऊन म्हणून एका हातात मोबाइल धरून दिवस नुसता लोळून काढला होता. ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु होऊनही त्यांच्या दिनक्रमात फारसा काही फरक नव्हता. मागच्या वर्षी पर्यंत १० वाजता एकदा मुलं शाळेत आणि नवरा ऑफिसला गेले की दिवसभर ती एकटीच्या राज्यात निवांत असायची. आता मात्र तसं नव्हतं. ऑनलाईन शाळा म्हणजे नुसतं थातुर मातुर होत. थोडा वेळ शाळा झाली की परत दिवसभर मुलांची नुसती कटकट सुरु व्हायची.
`विभक्त कुटुंब पद्धती– परिस्थिती, कारणं आणि उपाय` हे श्री. किरण आचार्य यांचं पुस्तक. याबद्दल थोडंसं!
अशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू
प्रत्येक अडचणींना पार करताना दिसलीस आम्हाला तू
कधी मोठी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी आई होऊन पाठीशी उभी तुझीच सावली
तुझ्या रूपाने जणू काही मिळाली आम्हाला एक नवीन माउली
तुझे ते गुबरे गाल,कधी हसताना कधी फुगताना दिसतातआम्हाला
पण त्यात लपलेली अनामिक चिंता लपवताना भासलीस तू
तुझ्या डोळ्यातला तो तीळ जणू तुला सगळ्यापेक्षा वेगळेकरून गेला
आणि त्याच डोळ्यात लपलेली काळजी तुझ्या अजूनजवळ घेऊन गेला
मुलांसाठी राबताना नेहमीच आम्हाला दिसलीस तू
पण त्यातही तुझ्यातल्या "मी" ला शोधताना भासलीस तू
थंडीच्या पहिल्या लाटेबरोबर सिक्याचा हमरस्ता मिटला. गजबजलेलं गाव एका रात्रीत ओसाड झालं किंवा माझी निघायची वेळ जवळ आल्याने मला तसं वाटायला तरी लागलं. भरल्या बॅगेसमोर सिक्याच्या घरचे सगळे घोटाळायला लागले. यासोनासने स्वतः माझ्या बॅगेत बसून बाहेरून चेन लावायचा प्रयत्न करताना हात चेमटून घेतला. तशीही रडारड व्हायचीच होती; यासोनासला एक निमित्त तरी मिळालं.
कुटुंब
संकटी जे धावत येती
त्यास कुटुंब म्हणती
संकटी जे दूर पळती
त्यांची कशात गणती ?
काटा रुतता एका
वेदना दुसऱ्या होती
एकाचे अश्रू पुसण्या
कुटुंबाचे हात येती
राहून एका सदनी
बोल वेगळे वदनी
ऐशा समूहा जगती
कुटुंब का म्हणती ?
उगाच नाती-गोती
वेंधळीच ही भरती
पक्षीही जगण्यासाठी
वृक्षी बांधती घरटी
जखमा दिल्या ज्यांनी
ते तर परकेच होते
वार झेलण्या परंतु
आपले कुणीच नव्हते
नमस्कार मायबोलीकर,
मागच्या दिवाळीत दै. दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी अंकात माझी 'शापित जग' हि लघुकथा प्रकाशित झाली होती. नंतर मग मी ती admins ची परवानगी घेऊन मायबोलीवरही सादर केली.
त्याची लिंक हि आहे: https://www.maayboli.com/node/64611
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ।। धृ ।।
एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।
उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।
वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।
इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।
मायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला
आई वडिलांची काळजी http://www.maayboli.com/node/2577?page=1
योगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.
एकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.
१) व.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,