मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
पत्र
मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - कुमार१
प्रति
( दुर्मिळ झालेल्या) प्रिय टपालपेटीस
स न वि वि.
अग, किती वर्ष झालीत तुझ्याशी संपर्क संपून ! खरंच आता आठवत नाही. संपर्क तर जाऊदेच, गेल्या कित्येक वर्षांत माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यांवरून तुझं दर्शन सुद्धा झालेले नाही. आता तुझ्या आठवणी काढायच्या तर भूतकाळात जावे लागणार.
अदूचा आठवा वाढदिवस: आनंदयात्रेची आठ वर्षं!
अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं
पत्र १
प्रिय आई व बाबा,
खरं तर आजकाल पत्र कोणी लिहित नाही, पण मला त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, म्हणुन लिहितोय. तुम्ही दोघही कृपया गैरसमज करुन घेउ नका.
तसं पाहिलं तर मी मागच्याच आठवड्यात लग्नाला आलो होतो, पण कुठुन दुर्बुद्धी झाली अन लग्नाला आलो असं वाटु लागलय. नाही नाही... प्रियाच्या लग्नात माझ्या लग्नाबद्दल गोष्टी चालु होत्या, त्याबद्दल मी अजिबात नाराज नाही. पण...
वडिलांचे उत्तर
माझ्या प्रिय पिल्ला,
आम्ही काही दिवसांपूर्वी फेसबुक वरचे तुझे पत्र वाचले. अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याचा तुझा निर्णय कसा योग्य आणि सर्व पिढीतील पालक घेतात त्याप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आहे हे वाचले आणि वाचून आनंद वाटला. तुला अनेक दिवस लिहायचे मनामध्ये होते पण लिहिणे होत नव्हते. आज थोडी सर्दी आणि कसकस होती त्यामुळे घरकामातून मोकळीक होती.. विश्रांती घेताना मन मागच्या आठवणींमध्ये जात होते हीच योग्य वेळ साधून लिहीत आहे.
मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!
मी लिहिलेली पत्रे -१
प्रिय मनू,
रागावली आहेस का गं खरंच? माझ्या मागच्याही पत्राला तू उत्तर नाही दिलेस...मी लाडाने जाडे म्हणालो होतो गं तुला...प्लीज न...अशी रागावू नकोस माझ्यावर..इतका कसला राग आला तुला की तीन महिन्यात एकदाही पत्र लिहावे वाटले नाही मला..
सद्ध्या पुन्हा चौकी लागलीय मला...चीन बॉर्डरवर आहोत आम्ही...इथल्या कडाक्याच्या थंडीत खुप आठवण येतेय गं मनू...तुझा आवाज ऐकण्यासाठी,तुझे शब्द वाचण्यासाठी जीव अगदी व्याकूळ होतोय... तापही आला होता थोडा...सगळे मित्र हसत होते मला...आपला एकनाथ आवारे माझ्याच बटालियनमधे आहे...त्याने मेडिसिन आणुन दिले होते...काळजी करु नकोस वेडुबाई....मी ठीक आहे आता...
करशील का माझ्याशी लग्न ?
नेहा,
कुठून आणि कशी सुरवात करू हे कळत नाही. पण विखुरलेला एक एक मोती जसा उचलून हातातल्या धाग्यात अलगदपणे गुंफून माळ तयार करावी तस-काहीस करणार आहे. काही वर्षांपूर्वी (२००५-६ असावे बहुधा) मी तुला खगोल मंडळाच्या कार्यक्रमात प्रथम पहिले तेंव्हाच तुझी हुशारी आणि निरागस हास्य मला आवडले होते. तशी आहेसच तू सुंदर ! कोणालाही आवडशील अशी. पण स्वतःच्या मनाची चलबिचल थांबवण्यसाठी एखद्या निस्तब्ध पाण्यात खडा टाकून ते पाणी ढवळून काढावे असे मला कधीच वाटले नाही. याउलट तिन्ही ऋतूत बहरणाऱ्या रंगीबेरंगी गुलमोहराप्रमाणे तू सदैव बहरत रहावेस अगदी तसाच आदर तुझ्याविषयी नेहमी वाटत राहीला.
Pages
