काही सेकंदांच्या अंतराने एकाच आईच्या पोटी एकाच प्रसूतिगृहात एकाच दिवशी जन्माला आलेल्या दोन जुळ्या भावंडांची कुंडली अगदी तंतोतंत एकसारखीच असायला हवी , अशी शंका मला कुंडलीशास्त्राबद्दल वाचत असताना नेहेमी येत असे. अधून मधून त्या विषयातल्या काही तज्ज्ञ मंडळींना मी त्यासंबंधी प्रश्न सुद्धा करत असे आणि माझ्या मनाचं त्यांच्यापैकी कोणाच्याही उत्तराने समाधान होतं नसे. पूर्वजन्मीच्या संचिताचे परिणाम प्रत्येक आत्म्यावर वेगवेगळे होतं असतात, असं साधारण उत्तर प्रत्येकाकडून मला मिळत असे.
" शुभ संध्याकाळ, मन्सूर बोलतोय.उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचंय?" दिवसभराचं काम संपवून घरी निघालेलो असताना गाडीत बसणार तोच मोबाईल खणखणला आणि पलीकडून अपरिचित माणसाचा परवलीचा प्रश्न आला. दर वेळी नवा प्रोजेक्ट हातात आलं, की सुरुवातीची 'किक-ऑफ' मीटिंग होते आणि मग त्या प्रोजेक्टशी जोडलेले कोण कोण कुठून कुठून असेच फोन करत असतात. ' साईट व्हिसिट' च्या वेळी सगळे जण एकत्र आले, की संभाषणातून काही वेळातच त्यातले 'सुपीक मेंदू' आणि 'नुसत्याच कवट्या' कोण आहेत हे सरावाने आता मला ओळखता येत असल्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट ची पहिली मीटिंग 'साईट'वर घेणं पसंत करतो.
काही व्यक्तींना जन्मजात कलाकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची देणगी मिळालेली असते। अशा व्यक्तींना कला शिकवावी लागत नाही. दूध पित्या वयातल्या आणि बोबडे शब्द बोलायला लागलेल्या लहानशा मुलाला गाणं ऐकून तंद्री कशी लागते, याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेणं मला तरी अशक्य वाटतं. कुठल्याशा पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून जन्मजात बरोबर आलेली ही शिदोरी ज्याच्याजवळ असते, ती व्यक्ती माझ्या मते विधात्याने केवळ सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच गंधर्वलोकातून खास या पृथ्वीतलावर पाठवलेली असते.
संगीताची आवड असलेला माणूस बरेच वेळा स्वतःला गाता गळा नसला तरी संगीताचा 'कान' असल्यामुळे सतत चांगल्या गायकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत असतो. माझ्यासारख्या संगीत वेड्याला कुठेही गेलं तरी चांगलं संगीत कानावर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या जागेशी नाळ जुळल्यासारखी वाटते. त्या संगीताला भौगोलिक अथवा व्याकरणात्मक बंधन नसतं. अरबी संगीतकारांच्या रबाबात अथवा मिझमारमध्ये उमटणारे सूर खरे असले, तर त्याची अनुभूती घ्यायला आपल्याला आपण अरबी नसल्याची अडचण भासत नाही. सिंगापूरमध्ये कोलिनटॉन्ग ऐकताना किंवा चीनमध्ये डिझीवर वाजवले जाणारे संथ सूर ऐकताना तंद्री लागतेच लागते.
सौंदर्य,लावण्य, देखणेपणा, रेखीवपणा अशा सगळ्या मोजमापांना मागच्या काही वर्षात 'आंतरराष्ट्रीय' वलय प्राप्त झालं आहे. सौंदर्यस्पर्धा, शरीराची प्रमाणबद्धता मोजण्याचे निकष, गोऱ्या कांतीला सावळ्या अथवा काळ्या कांतीपेक्षा मिळालेली सर्वमान्यता, सौंदर्य प्रसाधनांच्या मोठमोठाल्या कंपन्यांनी आणि 'फॅशन इंडस्ट्री'ने लोकांच्या मानसिकतेवर जाहिरातींचा मारा करून टाकलेला प्रभाव अशा अनेक मार्गांनी सौंदर्याच्या व्याख्या आमूलाग्र बदलल्या गेल्या आहेत.
मी लहान होतो, तेव्हा माझ्या ज्या ज्या नातेवाईकांची लग्न मी पहिली आहेत, त्यांच्या अनेक सुंदर आठवणी आजही माझ्या मनाच्या एका खास कप्प्यात मी जपून ठेवलेल्या आहेत. मुळात तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नात्यातल्या लोकांचं एकमेकांकडचं जाणं-येणं, सुट्टीच्या दिवसात महिना-महिनाभर मुक्कामाला येणं किंवा सणासुदीला आवर्जून घरी जाऊन एकत्र फराळ करणं हा सवयीचा भाग होता. घरात लग्नकार्य असेल तर नातेवाईक दोन-दोन आठवडे लग्नघरात तळ ठोकायचे आणि आपापला हातभार लावून ते कार्य निर्विघ्न पार पाडायला मदत करायचे.
झुमरु साहेब अत्यंत डाएट कॉन्शस. बरेच प्रयत्न करून त्यांनी वजन कमी केले, त्याबद्दल आपण बोललोच. शिवाय अॅमवेमुळे त्यांना विविध प्रकारच्या वायटामिन्स, मिनरल्स बिनरल्सची अगदी खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्यांच्यासोबत कधी खानपानाच्या गोष्टी होतील असं अजिबात वाटलं नव्हतं. पण हळूहळू तो विषय सुद्धा निघालाच.
“दि अॅक्सीडेंटल स्टुडंट”
एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. स्टेज वर स्थानापन्न झाल्यावर माझा परिचय वाचल्या गेला.
आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत - डॉ. राजू कसंबे.
आता मी त्यांच्या डिग्र्या वाचून दाखविते. बि.एससी., बि.ए., एम.ए. (इंग्रजी), एम.एससी. (पर्यावरण), डी.बि.एम., बि.एड., एम.फील., पीएच.डी.
टाळ्या!!
माझा असा परिचय झाला की टाळ्या पडतात.
मी कुठेही भाषण द्यायला गेलो अथवा कुठल्या कार्यक्रमात की गेलो असे घडते. माझा पण ऊर भरून येतो.
हो! खरंच खूपच शिकून टाकले मी.
मे महिना चालू झाला की दरवर्षी देशभरातून नामवंत मैनेजमेंट कॉलेज मधील पदवीधर वेगवेगळ्या वित्त कंपनी जॉइन करत असतात। परवा ऑफिसमधील सहकाऱ्याने हाच धागा पकडून कैंटीनमध्ये मला प्रश्न केला की " What is the Diversity Quotient of your team ?" अशा खोचक आणि तिरकस प्रश्नांना आता मी सरावलेला होतो त्यामुळे लगेचच मी पण उत्तर दिले की "Yes,We have done full justice to Diversity".
विदाशास्त्रज्ञांच्या मतानुसार ( Data Scientist) आपण सर्वसामान्य माणसे साधारणपणे आपल्या जीवनात १०० ते १५० लोकांना ओळखत असतात। त्यांचाशी आपला परिचय असतो। शिष्टाचाराची घडी मोडून त्यातील १५ ते २० लोकांबरोबर आपण गप्पाटप्पा करतो, रस्त्यात कुठे भेटलो की आवर्जून विचारपूस करतो। "कसे काय , बर चालले आहे ना !" अशा स्वरूपाचा संवाद आपल्या परिचयाचा असतो। या सर्व लोकसंग्रहात घट्ट मैत्री , हितगुज करण्यासाठीचा गोतावळा मात्र ५ ते ७ जीवनयात्रींच्या पुढे फारसा जात नाही।