शनिवारचा दिवस.
संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं. थोडक्यात- पुर्ण दोन दिवस भाईंदरमध्ये फक्त आपलंच राज्य, बिनधास्त!
खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते.
सकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता.
(एका फ़ेसबुकावर भेटलेल्या काव्यरसिकाच्या घरी गेलो होतो. त्याला माझ्या कविता ऐकायच्यात...असे कोणेकाळी म्हणाला होता तो....)
नमस्कार,
हा माझा माबोवर लिहायचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे चुभुद्याघ्या !
जसा अनुभव आला तसा लिहायचा प्रयत्न केलाय. अर्थात आता पुलाखालुन बरंच पाणी वाहुन गेलं आहे कारण या गोष्टीला आता जवळपास ३ वर्षं झाली आहेत !
***********************************************************************************************************
"हॅलो, कम्युनिटीमधे जेवण आहे आत्ता. येतोस का?" - मित्र
"कधी आत्ता? कोणी सांगितलं?" - मी
"अरे बोर्ड लावला आहे एट्रंस गेटच्या बाहेर. मी ऑलरेडी रांगेपाशी पोचलो आहे. तू येणार असशील तर लवकर पोहोच" - मित्र
"तिथे कुठे बसून खाणार रे? काहीतरी वाटतं ते!" - मी
ऑडीटोरीयम:
"आपण उत्पादने नाही, अनुभूती विकणार आहोत ग्राहकाला.यापुढे मनाशी निश्चय करा.सुंदर ताज महाल आपले प्रतीस्पर्धी विकतात. आपण गिर्हाईकाला ताज महाल नाही विकायचा, त्याला 'मी ताज महाल, लिबर्टीबाईचा पुतळा, माचू पिचू, पिरॅमिड,बुर्ज खलिफा बनवू शकतो' हा आत्मविश्वास, ही अनुभूती विकायची आहे.गिर्हाईकाचा खिसा कोणीही टॉम डिक हॅरी जिंकतो. आपल्याला त्या खिश्याच्या खालचे त्याचे हृदय जिंकायचे आहे."
"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.
घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
नोव्हेंबरच्या दुसर्या - तिसर्या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं.