दक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान

ना तो कारवाँ की तलाश है….. “इश्क़ : स्वतःला हरवून सापडण्याचा प्रवास”

Posted
1 आठवडा ago
शेवटचा प्रतिसाद
1 आठवडा ago

काही गाणी अशी असतात की ती मनात निवांतपणे घर करून राहतात; पण त्यांचे खरे अर्थ मात्र काळाच्या ओघात, अनुभवांच्या साठ्याने आणि वयाच्या परिपक्वतेने हळूहळू उलगडत जातात. “बरसात की रात” मधली ही कव्वाली त्यातलीच एक.

लहानपणी बाबा जेव्हा हे गाणं लावायचे, तेव्हा मनात फक्त एकच विचार यायचा तो म्हणजे “कायच्या काय मोठ्ठं गाणं आहे!” ते ऐकण्याचाही कंटाळा यायचा. त्या वेळेस त्यातलं गूढ, त्याची खोली किंवा त्याचा आत्मा काहीच स्पर्शून जात नव्हता. मनात उमटणारा एकच शब्द “रटाळ!”

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

'वन-विदिशा' : संरक्षण, नाश, पुनरुज्जीवन - Full Film Experiment by Rahi Anil Barve

Posted
3 आठवडे ago
शेवटचा प्रतिसाद
3 आठवडे ago

काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.

विषय: 
प्रकार: 

भोंदू बाबा लोकांच्या निमित्ते ..…

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

सगळ्यांचे दुःख निवारण करण्याच्या निमित्ताने आपल्या समाजात सतत नवनवीन “बाबा” जन्माला येत असतात. लग्न होत नाही, मुलगा नीट वागत नाही, जमिनीचा वाद मिटत नाही… अशी अनेक कारणं असतात. लोक इतके हतबल होतात की, स्वतःला जन्मापासून ओळखत असूनही स्वतःची बुद्धी आणि आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या हाती सोपवतात या आशेने की तो त्यांच्या दुःखाचं निवारण करेल.

प्रकार: 

मन – पिशाच्च

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.

सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.

विषय: 
प्रकार: 

पुण्यसंचय / पूर्वसंचित

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

मला तर पूर्वसंचित किंवा पुण्यसंचय ही गोष्ट भविष्यात आपण कधी काही करण्यास कमी पडलो तर माफी मिळावी किंवा सवलत मिळावी, या अपेक्षेने आधीच करून ठेवलेली चांगल्या कामांची तजवीज वाटते.

दहा वेळा आपण कोणासाठी तरी जीव ओतून काहीतरी करतो; आणि अकराव्या वेळेला जर थोडी कुचराई झाली, तर निदान हा माणूस मुद्दाम असे करणार नाही इतकी खातरी समोरच्याच्या मनात निर्माण होते ती फक्त आधी दहा वेळा जीव ओतून केलेल्या गोष्टींमुळे.

प्रकार: 

"Sleepless In Seattle"

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

सॅम बाल्डविन (टॉम हँक्स) हा एक मध्यमवयीन पुरुष आपल्या पत्नीला गमावल्यानंतर आपल्या ७–८ वर्षांचा मुलगा जोनाहसोबत सिएटलला स्थलांतर करतो. पत्नीच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असतानाही सॅम अजूनही तिच्या आठवणीत हरवलेला असतो. आपल्या वडिलांसाठी नवी पत्नी आणि स्वतःसाठी नवी आई शोधण्याच्या उद्देशाने जोनाह एका रेडिओ शोला फोन करतो. त्या शोचं नाव असतं “Sleepless in Seattle”.

विषय: 
प्रकार: 

“चांगुलपणाच्या आड…”

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

"काहीही असू दे हं, पण तो माणूस/बाई म्हणून खूप चांगला/ली आहे."

निव्वळ या एका वाक्याखाली अनेक लोकांचे दुर्गुण, त्यांचे उपद्रवमूल्य आणि जबाबदाऱ्यांपासून पळ काढण्याची वृत्ती बेमालूमपणे झाकली जाते.
त्या चांगुलपणाचं नेमकं काय करायचं? लोणचं घालायचं का?

प्रकार: 

घर - दिशा की निर्णय?

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

घर घेताना तुम्ही जास्त महत्त्व कशाला देता ?
दिशा? वास्तु? अंकशास्त्र? की बजेट, लोकेशन आणि योग्य वेळ?

परवा एका फेसबुक ग्रुपवर घराबद्दलची एक पोस्ट पाहिली. घर त्यांना आवडलं होतं. पण पोस्टमध्ये सविस्तर माहिती होती. दरवाजा कोणत्या दिशेला, स्वयंपाकघर कोणत्या दिशेला, कोणता मजला, कोणती बाजू… आणि शेवटी प्रश्न होता, हे घर घ्यावं की नको?

मला प्रश्न पडला , आपण घर घेतो ते राहण्यासाठी की गणित जुळवण्यासाठी?

विषय: 
प्रकार: 

"घडणं की बिघडणं?"

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांच्या आयुष्यावर काही ना काही परिणाम होत असतो. कधी कमी, कधी जास्त; कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. या प्रभावामुळे माणसाच्या विचारांमध्ये आणि वर्तनात बदल होतात. काही बदल अतिशय सूक्ष्म असतात, तर काही इतके ठळक की ते सहज जाणवतात. असे बदल बहुतांशी घरच्यांना जाचक वाटू लागतात.

प्रकार: 

मनातली मूगडाळ

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

धरून चालूया की तुम्ही ३५ किंवा ४० वर्षांचं आयुष्य जगलेले आहात. या प्रवासात असे असंख्य प्रसंग आले असतील, जिथे तुम्ही “जाऊ दे”, “आपलीच माणसं आहेत”, “दुर्लक्ष करू” अशा विविध कारणांच्या आड अनेक अप्रिय अनुभव गिळून टाकले असतील जणू कित्येक किलो मूग गिळल्यासारखे.
पण हे सगळं कसं पचवायचं? कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने?
की आयुष्यभर पोटात साठवत राहायचं…??
आणि वरून शांत असल्याचं नाटक करत राहायचं?

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - दक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान