प्रथमेश, मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील! गृहपाठाचं सर विसरून गेले होते. कशाला आठवण करून दिलीस माझं नाव घेऊन? यानं गृहपाठ केला नाही म्हणून ओरडायलाच लागलास. दिड तास अंगठे धरून मला दरदरून घाम फुटायलाय. नेमका या गणिताच्या पुरंदरे सरांचा डबल तास आला. काल गाडा घरी आणायला रात्री अकरा वाजले. अवकाळी पावसानं सगळी काळी मैना कुजाय लागली. गृहपाठ करायला कुठनं वेळ मिळणार? सगळेजन माझ्यावर संशय घ्यायलेत. वर्गातली मुलं मला जवळ करीनात. सरस्वतीपूजनात मला हाकलून लावायलेत. माझा डबा उघडून बघायलेत. परवा गिरहाईकाने 'पपईवर थुंकलास काय लांड्या' म्हणून कानफटात हाणले.
अमेरिका पहायला टुरिस्ट म्हणुन येणे आणि इथले वरवर दिसणारे भले-बुरे घेउन जाऊन तिच अमेरीका मानणे याहूनही इथे राहून , जनमानस, चालीरीती, प्रत्येक राज्याचा एसेन्स अनुभवणे वेगळे. आम्ही आलो ते पहील्यांदा लॉस एंजेलिसला, राहीलो चिनो-ऑन्टॅरिओच्या बॉर्डरवर आणि अनुभवले ते कंट्री लाइफ आणि सिटी लाइफ. पुढे नोकरीनिमित्त खूप म्हणजे चिक्कार राज्ये फिरणे झाले. प्रत्येक राज्याच्या 'स्टेट फेअर्स' म्हणजे राज्य-जत्रांमध्ये फिरणे झाले, वेगवेगळ्या पार्क्स पाहायला मिळाल्या आणि होय लोक जोडायला, अनुभवायला मिळाली. संकुचितपणाच्या मर्यादा गळून पडल्या आणि क्षितीजे विस्तारली.
कर्वेनगर नागरिक मंच हा वारजे कर्वेनगर भागातल्या काही नागरिकांनी एकत्र येत स्थापन केलेला संघ आहे.
अनुरूप विवाह चे तन्मय कानिटकर, मी स्वतः आणी अजून एक दोन सदस्य हे वारजे कर्वेनगर भागातील नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सतत काम करतो.
वारजे कर्वेनगर प्रभाग भला मोठा आहे. कर्वे रस्त्यावरील आनंद ज्यूस बार, प्रभात रोड 14 नंबर गल्ली पासून सुरू होऊन तो पार गणपती माथा वारजे परेंत पसरला आहे.
यात कर्वे रस्त्याची डहाणूकर काॅलनी ते कर्वे पुतळा ही बाजू वगळली तर बाकी सर्व भाग आहे.
नवरा आणि मुलगा सध्या भारतात आहेत. नवरा आईला घेऊन अयोध्या-वाराणसीला जाणार होता पण त्यांनी प्रवास झेपणार नाही म्हणून बेत रद्द केला. पण नवरा आणि मुलाने स्वतः जायचे ठरवले. यावर अनेकांनी आडून किंवा उघडपणे तुम्ही मोदी भक्त आहात का असे विचारले. या प्रश्नाची मी अपेक्षा केली नव्हती. पण त्यामुळे या प्रश्नाच्या मानसिकतेवर आणि ते तिथे का जात आहेत यावर जरासे चिंतन झाले.
सत्यवान-सावित्री
शब्दांकन: तुषार खांबल
फोटो साभार - गुगल
जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून
सावित्रीने व्रत-वैकल्य केली
हुंडा मिळाला नाही म्हणून सत्यवानाने
तिलाच यमसदनी दिली
सोने,चांदी, बंगला गाडी
सर्व काही दिलं
स्वतःच पाप झाकण्यासाठी
त्याने तिला चारित्र्यहीन केलं
काय काय सहन केलं
व्यथा सांगायला नव्हता वाव
शेवटी सावित्री लटकली फासावर
सत्यवान मारी मटणावर ताव
बातमी आली, अटक झाली
तरी सत्यवानाचा उतरेना माज
हैवान भरले घरात सारे
कुणालाच कसली वाटेना लाज
अन्यत्र शोधले असता माझा हा एक लेख सापडला. रोचक असल्याने इथे देते आहे. प्रत्येक आधीच्या पिढीला आपण कित्ती कित्ती सद्गुणी आणि पुढची पिढी कशी वाया गेलेली आहे असेच वाटते. पण हा जो लेख आहे तो पुढच्या पिढीच्या दृष्टीकोनातून आहे. आणि म्हणुनच तो वेगळा व रोचक आहे. 'आमच्या वेळी ....' हा शब्दच त्यात नाही. प्रत्येक पिढीचे चॅलेन्जेस असतात आणि कधी कधी पुढच्या पिढीकरता, आधीच्यांनी ते चॅलेन्जेस निर्माण केलेले असतात
-
सकाळच्या चहाला जोडून,
वर्तमानपत्र उघडले.
आशेच्या किरणांची वाट बघत,
नकारात्मकतेचे शिडकावे सापडले.
पानापानावर रक्ताचे डाग,
असत्याच्या फासात अडकलेले.
हिंसा, कट, चिखलफेक,
दिवसाच्या प्रारंभी बघितलेले.
कोण देईल आशेचा किरण?
चांगुलपणाची नवी पहाट?
कधी हे शब्द बदलतील आणि
होईल सकारात्मकतेचा साक्षात्कार?
© निमिष सोनार, पुणे
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.
जागतिक महिला दिन (दरवर्षी ८ मार्च) महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाची ओळख आणि सन्मान करणारा दिवस आहे. महिला दिनाची सुरुवात १९०० च्या सुरुवातीस झाली होती, जेव्हा महिलांना समानतेसाठी आणि त्यांचे अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. जागतिक महिला दिन हा फक्त एक उत्सव नाही, तर हा स्त्री-पुरुष समानतेच्या वाटचालीचा आणि स्त्री चळवळीची गौरवाने आठवण करण्याचा दिवस आहे. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या अधिकारांसाठी आणि समानतेसाठी साजरा केला जातो.