सूर्योदय म्हणजे एक नवी पाहाट, जीवनात आलेल्या अंधःकारावर मात करून नवीन वाट काढणे म्हणजे सुर्योदय, तसा मी उसर्रा या खेड्या गावातील जन्म मात्र नागपुरात झाला, पण लहानच मोठं, प्राथमिक शिक्षण, हे गावातच झालं, जन्म नागपूरला होण्याचं कारण म्हणज आई हि नाशिक ची, बाबा नागपुरातले आई बाबा हे दोघेही नोकरीकवर बाबा हे बस डेपो मध्ये इन्चार्गे होते आणि आई हि आरोग्य विभागात नर्स होती, मी २ वर्गात असताना बाबांचा अपघाती मृत्यू झाला.
काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं.
या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर? गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच.
आज एक मिटिंग होती ऑफिसमध्ये आणि मध्यभागी एक डिरेक्टर बसलेला होता. मी पोचले तोवर बाकी बऱ्याच खुर्च्यांवर लोक बसले होते पण त्याच्या शेजारची एक खुर्ची रिकामी होती आणि दुसऱ्या बाजूला एक पुरुष बसलेला होता. मी जाऊन त्याच्याशेजारच्या खुर्चीत बसले. हे सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मी असं काहीतरी पाहण्याची. अर्थात शाळेत असताना, कॉलेजमध्ये दंगा करण्यासाठी पुढच्या खुर्च्या सोडून मागे बसून मजा केली आहे. पण त्याला वेगळं कारण असायचं. पुढे पुढे ऑफिसमध्येही हे पाहिलंय आणि वाटलं, का?
"पप्पा!"
"बोल!"
"अंह असा रिप्लाय नाही द्यायचा, वन वर्ड मध्ये."
पप्पा खळखळून हसला. क्वचित पप्पा असा हसायचा.
"बोल माझी माऊ."
"पप्पा वीस वर्षाची आहे मी, माऊ काय म्हणतोय?"
"तू माझी खाऊ माऊ आहेस. बोल ना काय झालंय?"
बातमीचा सारांश आणि नंतर लिंक देत आहे,
आयुष्याचे पुस्तक
आयुष्याच्या पुस्तकाचे
पुढले पान कोरे आहे,
अंतरीच्या लेखणीने रंगण्याची
वाट पाहते आहे !
सुंदर काव्य-कथा, निसर्ग चित्रणे,
स्वप्नीची नक्षत्र-नक्षी रेखणे आहे,
अंतरीच्या रसिकतेने नटण्याची
वाट पाहते आहे !
पिंपळ पान, गुलाब पाकळ्या,
मोरपीस, पराग जपणे आहे,
अंतरीच्या मायेने गोंजारण्याची
वाट पाहते आहे !
ज्या गत पानांवर अश्रू ठिबकले,
तिथली शाई मिटली आहे.
त्या पानांस का व्यर्थ वाचणे?
विरण्याची वाट पाहते आहे !
कविता - माणूस नावाच एक झाड असत !
झाड
माणूस नावाचं एक झाड असतं !
रंग, रूप, आकार विविध तरी
सर्वांचं मूळ - मन एकच असतं
त्या मनाच्या गाभ्यातून बीज अंकुरतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
प्रत्येक दिवसाचं पान उगवतं
नवं खुलतं, जुनं गळतं !
कधी आठवणींच्या फांदीवरती
हिरवा फुलोरा बनून टिकून राहतं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
प्रत्येक ऋतूचा अनोखा रंग, गंध
पिवळा रुक्ष, ओला हिरवा वृक्ष
लाल गुलाबी शेंदरी, पानांत खुलतं
जुनी कात टाकून ऋतुरंगात न्हातं,
माणूस नावाचं एक झाड असतं !
हुरहूर, किती खास शब्द आहे ना? इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषेत ती भावना व्यक्त करणारा असा शब्द असेल तरी का नाही अशी शंका वाटते. इतका योग्य शब्द आहे एका ठराविक मनस्थितीसाठी तो. तो नुसता लिहून चालत नाही, अनुभवायलाच हवा. आणि माझ्यासारखा सर्वांनाच त्याचा अनुभव येतंही असेल.
आरती घरी आली तरी डोक्यातून विचार जातंच नव्हते.
आल्या आल्या अमितने विचारलंच,"काय गं इतका उशीर झाला आज?".
"अरे ते क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू चालू आहे ना म्हणून. अमु कुठेय?" तिने स्वतःला सावरत विचारलं.
"झोपली ती मघाशी. "
"काय अरे शी. इतका उशीर झाला. सॉरी."
"इट्स ओके. झालंय तिचं नीट जेवण, होमवर्क. चल जेवून घेऊ.", म्हणत त्याने दोघांचं ताट वाढून घेतलं.
तिचं जेवणात लक्षही नव्हतंच. कसंबसं जेवण उरकून तिने पुन्हा लॅपटॉप सुरु केला.
अमितच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पडल्याच.
"इतक्या उशिरा येऊनही अजून काम आहेच?", त्याने विचारलं.