"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता.
एका शिक्षकाचा बदला
“कुणी केली ही खोडी? हा खोडसाळपणा कुणाचा?”
शिक्षकांनी दरडावून विचारले. त्यांच्या आवाजात करारीपणा होता. नजरेत जरब होती. वर्गातील सर्व मुलं जागेवरच उभी राहिली. काही तर थरथरत होती. सर्वांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. आज पुन्हा कुणीतरी मधल्या सुट्टीत फळ्यावर किचाडून ठेवले होते. त्यावेळेत बहुतेक मुलं लघवीसाठी आणि पाणी पिण्यासाठी जात असत. मीसुद्धा त्यापैकीच एक होतो. त्यामुळे वर्गखोलीत काय घडले किंवा कुणी केले याची मला सुतराम कल्पना नव्हती.
विनिता :- काय रे महेश? काय झाल!? असा उदास का झालास? आज तर आपला रीझल्ट आहे ना, मंग असा काॅलेज च्या बाहेर का बसलायस? घेतला का रीझल्ट?
महेश :-..................
विनिता :- अरे बोल ना काहीतरी... काय झाल? एखादा विषय राहिला का? राहिला असेल तर काय होईल... पुढच्या सेम ला परत एक्झाम दे, निघेल पुढच्या वेळी.
महेश :- तुला काय गं.... तु आहेस आॅल क्लियर......
मराठीचा तास असेल--- म्याडम पोर्शन कम्पलिट झाल्याने न शिकवता बसून होत्या ९वीच्या वर्गात!!! तसही त्यांना शिकवायचा फार कंटाळा---पण आज त्या बोलू लागल्या!!! चक्क आम्हां मुलींशी हसून (जे महागडे असे) संवाद थाटत असल्याच्या आविर्भावात प्रश्र्न विचारत्या झाल्या----"शिवाजी महाराजांची किती लग्न झाली होती व त्यांच्या पत्नींची नावे ठाऊक आहेत का?"
वर्गांतील मुली उत्साहाने सांगून गेल्या,"दोन!!!संभाजी महाराजांच्या आई सईबाई अन् राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई"
म्याडमचे पुन्हा ते महागडं हास्य चेहय्रावर झळकल!!!
"चूक!!!!",त्या मान (स्पेशल स्टाईलने) हलवत म्हणताच; 'मुली अवाक!!!!'
रोज जाता येता शाळा पाहतो. तीन मजली इमारत. विटांच्या खोल्या नाहीत तर साक्षात विद्येचे मंदिर. त्या मंदिरात घंटा देखील आणि रोज प्रार्थना देखील होते. सहज त्या दिवशी बाहेरच्या खिडकीतून आंत डोकावले. एक साथ नमस्ते गलका ऐकू आला.... नव्हे माझा मलाच भास झाला. सभोवताली भिंतीचे कुंपण आणि सुगंधी फुलांच्या बगीच्यात ताठ मानेने उभी असलेली माझी शाळा.ज्ञानाचं बीजारोपण करणारा फळा थकला होता. आवाज करणारी खिळखिळी बाकं शांतपणे भिरभिरत माझ्याकडे पाहत विचारती झाली, ओळखलं का आम्हाला....! भूतकाळातले ते क्षण आठवले. निरागस, अल्लड, अबोल बालपण... आयुष्यातील स्वप्नवत काळ.
वळूनी मागे मी बघता
शल्य बोचते मनाला
एक वेडा वाट चालला
एक वेडा वाहात चालला
वेळ दिसे काट्यावरी
कधी ना परतणारी
वाट पाहून कोमेजून गेली
वाटेवर फुललेली फुले सारी
शिंकण्यात पण झाला गुलाम तू
धरे नित्य हाती रुमाल तू
आठवतेय का ती शाळकरी शिंक तुला ?
खळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा
ताप खोकला सर्दी पडसे
सर्वाचीच काढली होती तू पिसे
ठेच लागता लावे माती
हसता हसता जोडे नाती
त्या नात्यांचे भान विसरला
जसा जसा कमावता झाला
धुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने
त्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.