सध्याच्या दिवसांत Epidemic Diseases Act, 1897. याचा उल्लेख वारंवार होतो आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभू मीवर सरकारने हा कायदा पुन्हा एकदा लागू केला आहे.
हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता.
या प्लेगच्या पाऊलखुणा मराठी इतिहास-साहित्य-कलाविश्वात उमटलेल्या दिसतात. सर्वांत आधी आठवतो तो २२ जून १८९७ हा चित्रपट.
सोनू अणि मराठी
सोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय
मराठीचे बोल कसे खणखणीत खडे
शाहिरांचे वीरश्रीचे एक त्यात पोवाडे
ऐक शिवाजीची कथा आणि मावळ्यांची कमाल/
बघ मराठीची कशी पेटते मशाल//1//
सोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय/
तुकोबांची वाच गाथा आणि वाच ज्ञाने श्वरी/
अमृता हु नी गोड आहे माय मराठी खरी/
जात्या वर बहिणाई सा र आयुष्याचे सांगते,/
मराठीची शब्दवेल कथे- गाथे तून फुलते//2//
हे पुणेरी भाषेचं प्रकरण काय आहे? मला माहिती असलेल्या पुण्यात फक्त पुण्यापुरतीही प्रमाण भाषा नाही. महाराष्ट्राचे राहूच द्या.
विंटबणा मराठीची
( कविवर्य कुसुमाग्रज यांची एक कविता वाचनात आली तीच्या सुरुवातीच्या ओळी अशा होत्या
होय, तुमची खानदानी प्रवचन
छानच आहेत, त्यावरून मायबोलीवर गेले काही महिने चालू असलेल्या गलिच्छ प्रकारांबद्दल लिहावेसे वाटले. जोवर असे प्रकार होत राहतील तो वर हा धागा वर काढेल . )
भाषेशी खेळू नका
************
भाषेशी खेळू नका कुणी
माझ्या मुशीला जाळू नका कुणी
चार टुकार डोक्यांची
हुशारी पाजळू नका कुणी
कैलासाची लेणे माझे
त्यावरी सिमेंट फासू नका कुणी
इंग्रजळल्या कार्ट्यांसाठी
आईस बाटवू नका कुणी
भाषा तुका ज्ञानेशाची
चांदण्याची वस्त्र ल्याली
चिखलात मूर्खपणाने रे
तिला लोळवू नका कुणी
एकेक अक्षराचा असे
उंच उंच बुरूज इथे
हलवून पाया तिचा
उगा बुजवू नका कुणी
आकड्यांची जोडाक्षरे
फार काही अवघड नाही
पेलण्यास भाषाप्रेम
काय तुमच्यात धाडस नाही
मायबोली
माय मराठी, आई मराठी
वाढलो आम्ही बोलत मराठी
नाव मराठी, गाव मराठी
अनं हावभाव आमचे ते बी मराठी.
संतांची वाणी मराठी,
सहयाद्रीची गाणी मराठी
शिवशंभूंचे राज्य मराठी
अनं भगवे आमुचे रक्त ते बी मराठीचं
शिरकाव झाला परभाषेचा
कोनीच न उरला वाली
पेचात पडली आमुची मायबोली
धुंद झाली आमुची मती
आमचीचं आम्ही केली माती
सांगावे लागेल जगाला
आमची मराठी काय होती
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
उन्हाळा सुरु होतो. शाळेच्या सुट्ट्यांचे वेध लागतात.
परीक्षा संपल्या कि एकच हुर्यो होतो आणि मे येतो.
सोबत येतो तो.
आंबा.
फळांचा राजा.
आंब्याच्या आठवणी सांगणं कठीण आहे कारण प्रत्येक चांगल्या आठवणीत आंबा आहेच. लहान होतो तेंव्हापासून सगळ्या उन्हाळ्याच्या आठवणी गावाशी जोडलेल्या. माझं गाव छोटंसं खेडंच खरंतर. डोंगरांच्या मधोमध वसलेलं. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे गावी चांगले दीड महिनाभर सुट्टीला जायचो. वीस बावीस जणांचं कुटुंब. सगळे काका काकू, चुलतभावंडं, आतेभावंडं जमायचो. फुल्ल दंगा चालायचा.
तुझ्या घराला सये दारे अनेक
किती मोजशील ते तारे अनेक
रास शिंपल्यांची पडली रेतीवर
सांजेस मोत्यांचे किनारे अनेक
ऐकशील का ओठांवरली गाणी
तोंडावर खर बोलणारे अनेक
उगा नाही सये येशू रडतो
त्याला कृसास ठोकणारे अनेक
उलटूनही डाव तसा मांडला
नव्याने परत खेळणारे अनेक
©प्रतिक सोमवंशी
insta @shabdalay
जेंव्हा हातात काही उरत नाही माणूस घर शोधायला लागतो. ते चार भिंतीच असावाच, त्याला कौलारू छप्पर असावाच, त्यात एखाद्या बाथटब मध्ये गरम पाण्यात शांत निजाव वा शॉवर मधून पडणाऱ्या पाण्याच्या सरीला पाऊस मानून त्यात मोकळ व्हाव अस काही नसत. त्याला फक्त घर हव असत, जे त्याला जवळ करेल, मायेने विचारपूस करेल, कितीही कटकट केली तरी शेवटी त्याची सांत्वना करेल. त्याला नेहमी समजून घेऊन फक्त न फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहील. कुणा परक्याला दारातून आत घेऊन त्याला इनसेक्यूअर फील नाही होऊ देणार. त्याच्या होणाऱ्या सगळ्या मूड स्विंगस ला आपलस करेल पण त्याला कधीच तो बेघर असल्याच जाणवू देणार नाही.