महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?
उन्हाळा सुरु होतो. शाळेच्या सुट्ट्यांचे वेध लागतात.
परीक्षा संपल्या कि एकच हुर्यो होतो आणि मे येतो.
सोबत येतो तो.
आंबा.
फळांचा राजा.
आंब्याच्या आठवणी सांगणं कठीण आहे कारण प्रत्येक चांगल्या आठवणीत आंबा आहेच. लहान होतो तेंव्हापासून सगळ्या उन्हाळ्याच्या आठवणी गावाशी जोडलेल्या. माझं गाव छोटंसं खेडंच खरंतर. डोंगरांच्या मधोमध वसलेलं. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे गावी चांगले दीड महिनाभर सुट्टीला जायचो. वीस बावीस जणांचं कुटुंब. सगळे काका काकू, चुलतभावंडं, आतेभावंडं जमायचो. फुल्ल दंगा चालायचा.
तुझ्या घराला सये दारे अनेक
किती मोजशील ते तारे अनेक
रास शिंपल्यांची पडली रेतीवर
सांजेस मोत्यांचे किनारे अनेक
ऐकशील का ओठांवरली गाणी
तोंडावर खर बोलणारे अनेक
उगा नाही सये येशू रडतो
त्याला कृसास ठोकणारे अनेक
उलटूनही डाव तसा मांडला
नव्याने परत खेळणारे अनेक
©प्रतिक सोमवंशी
insta @shabdalay
जेंव्हा हातात काही उरत नाही माणूस घर शोधायला लागतो. ते चार भिंतीच असावाच, त्याला कौलारू छप्पर असावाच, त्यात एखाद्या बाथटब मध्ये गरम पाण्यात शांत निजाव वा शॉवर मधून पडणाऱ्या पाण्याच्या सरीला पाऊस मानून त्यात मोकळ व्हाव अस काही नसत. त्याला फक्त घर हव असत, जे त्याला जवळ करेल, मायेने विचारपूस करेल, कितीही कटकट केली तरी शेवटी त्याची सांत्वना करेल. त्याला नेहमी समजून घेऊन फक्त न फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहील. कुणा परक्याला दारातून आत घेऊन त्याला इनसेक्यूअर फील नाही होऊ देणार. त्याच्या होणाऱ्या सगळ्या मूड स्विंगस ला आपलस करेल पण त्याला कधीच तो बेघर असल्याच जाणवू देणार नाही.
जाता जाता पुन्हा तुला डोळेभरून पाहू दे
आठवणींचा तो एक कप्पा मनामध्ये राहू दे
नाही कुंदन नाही मोती नाही कसले हिरे
काळ्या निशेचे खोटे तारे तरी तुला वाहू दे
जातीखाली चिरडले असतील कितीतरी किडे
लाटांनी तरी किनाऱ्याला खरं प्रेम दाऊ दे
पाहिजे होेत कुणी गाणार आलापात गोडवे
राग माहीत नाही तरी देठापासून गाऊ दे
पायवाटा चुकल्या साऱ्या, काटे पायात टोचले
जखडलेल्या पायांनी मला तुझ्याकडे धावू दे
मुंबई पुणे मुंबई हा माझा अत्यन्त आवडता चित्रपट आहे. फ्रेश, विनोदी, एव्हरग्रीन असा मूव्ही आणि त्यात स्वप्नील मुक्ताची केमिस्ट्री! याचा दुसरा भाग आला होता तोही छानच होता.
पहिल्या भागात फक्त गौतम आणि गौरी होते, दुसऱ्या भागात त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, गौरीचा प्रियकर अर्णव हे भेटले.
मराठी मुव्हीची फ्रॅंचायजी होणे आणि त्याच कथेचा पुढचा टप्पा तिसऱ्या भागात येणे हे फारच अभिनंदनीय यश म्हणावे लागेल.
नुकताच मुंबई पुणे मुंबई भाग 3 बघितला. सर्वप्रथम, चित्रपट चांगलाच आहे. विशेषतः सध्या जितके वाईट चित्रपट बनतात त्या मानाने हा एकदा नक्कीच बघू शकतो.
आपल्याकडे मराठी बोलताना मध्ये हिंदी शब्द वापरले की ते कानांना खड्यासारखे टोचतात. काय तर आपल्याला त्याची सवय नसते. पण तेच ईंग्रजी या परकीय भाषेतील शब्द वापरले तर ते कानांना गोड वाटतात. काय तर सर्वांनाच आता त्या भाषेची सवय झाली आहे.
पण पिढी दर पिढी आपल्या मराठीतील ईंग्रजी शब्दांची टक्केवारी वाढू लागली आहे. येत्या पिढीत जी मुलेही ईंग्रजी माध्यमात शिकली आहेत आणि ज्यांच्या गेल्या तीन पिढ्याही ईंग्रजी माध्यमातच शिकल्या आहेत अश्यांच्या मराठी शब्दकोषावर ईंग्रजीचे अतिक्रमण वाढतच जाणार.
क्षण
घड्याळाची टिकटिक वाजते आहे न माझ्या हातातून निसटणार्या वेळेची मला आठवण करून देत आहे. टिक टिक म्हणता म्हणता मुठीत घट्ट धरून ठेवलेला तो क्षण टिकता टिकत नाही, न आयुष्य पुढे सरकत राहतं.अश्याच छोट्या छोट्या क्षणांनी ते घडत राहतं, आकार घेत राहतं.
किती छोट्या छोट्या तुकड्यानी बनलेलं हे आपलं जगणं, क्षणांच्या कुपितून दरवळणाऱ्या आठवणींवर तर तग धरून असतं.
महाराष्ट्रदेशा
भाषा मराठीचा डौल
विलक्षण गहिरासा
ओवी अभंग ओठात
अंतरात भक्तिठसा
डफ पोवाड्यांनी गर्जे
इतिहास मराठ्यांचा
तलवारीसंगे साजे
दिमाख तो भगव्याचा
शब्द रांगडे कोमल
दिले माय मराठीने
भान जगण्याचे उरी
महाराष्ट्राच्या मातीने
भाषा मराठी वसते
नित्य मुखी अंतरात
नाही लाभणार माय
शोधू जाता दुनियेत
किती जन्म झाले इथे
पांग फिटेना कधीच
लेकराची ताटातूट
माय करीना मुळीच...
जय महाराष्ट्र
जय मराठी
काही बोलायाचे आहे
गीतकार - कुसुमाग्रज
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही