शेती

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

Submitted by अभय आर्वीकर on 28 March, 2017 - 06:14

आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा अभिमान अहंकार नसतो.

चांगले आंबे विक्रेते हवे आहेत

Submitted by झंपी on 25 March, 2017 - 21:46

कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?

ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.

मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.

हुरडा - फोटोफिचर

Submitted by अंजली on 21 March, 2017 - 00:18

जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्‍या तिसर्‍या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.

३ रे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत

Submitted by अभय आर्वीकर on 9 March, 2017 - 13:32

दिनांक : २५-०२-२०१७

विहिरींचे रिचार्जिंग

Submitted by सेन्साय on 20 February, 2017 - 03:00

मोठ्या शहरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण व बिकट होत चालला आहे. औद्योगिक क्षेत्रे एकसारखी वाढत चालली असून त्यामुळे शहरे अयोग्य प्रकारे वाढत आहेत. शहरी लोकसंख्या सर्व बाजूंनी वाढत असून ही वाढ रोखणे अथवा टाळणे अवघड आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे अंदाजही पुष्कळदा चुकतात. यामुळे शहरांना होणारा पाण्याचा पुरवठा हा नेहमी कमीच पडत राहतो. पुढील तीस वर्षांचा हिशोब करून दिलेले पाणी पाच-दहा वर्षांत कमी पडु लागते.

निसर्गात मिळणार्या पाण्याचे मुख्यतः दोन वर्ग करण्यात येतात : (१) भूमिगत पाणी व (२) पृष्ठभागावरील पाणी.

आयात - निर्यात व्यवसाय : सक्षम एंटरप्रायजेस

Submitted by चंपक on 14 February, 2017 - 01:17

नमस्कार!

"सक्षम एंटरप्रायजेस" या नावाने आयात-निर्यात परवाना प्राप्त करुन, अपेडा ची नोंदणी करुन आता व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहे!

पहिला प्रयत्न हा फळे व भाजीपाला निर्यातीचा आहे. आखाती देश - प्रामुख्याने दुबई ला ताज्या फळांची (डाळींब व द्राक्ष) निर्यात करण्याचे ठरवले आहे.

मायबोलीकरांकडुन, विशेषतः दुबई व आखाती देशात राहणार्यांकडुन तेथील मार्केट चे ट्रेंड, बाजारभाव (होलसेल व रिटेल ),व मार्केट मधील ठळक व्यावसायीक यांची महिती, संपर्क मिळविण्या च्या दृष्टीने मदतीची अपेक्षा आहे.

सक्षम एंटरप्राएजेस,

तडका - कांद्याचा भाव

Submitted by vishal maske on 17 December, 2016 - 08:55

कांद्याचा भाव

लोकांना कांदा चारणाराही
आज कांद्यानेच खचला आहे
राब-राब राबुनही शेतकर्याला
कष्टाचा घास ना पचला आहे

विक्रमी ऊत्पादन करूनही
मार्केटींगमध्ये तो हरू लागला
कारण घसरता कांद्याचा भाव
डोळ्यात पाणी भरू लागला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

Submitted by अभय आर्वीकर on 4 December, 2016 - 12:06

शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने

विषय: 

शिवार स्वप्न

Submitted by vishal maske on 20 November, 2016 - 09:54

----------( शिवार स्वप्न )----------

बीज पेरल्या मातीमधी
अंकुर लागलं फूटायला
हिरवा शालु नेसुन जणू
धरणी लागली नटायला

देऊन मायेचं खात आज
नजरेनं ठोंबांना गोंजारलं
खुशी-खुशीने डोले पीक
पाहून जीवाचं मन भरलं

मना-मनातील आशेमधलं
शिवार लागलं फूलायला
उदार मनातील हेरलेलं हे
सपान लागलं जुळायला

या स्वप्नाचे माणिक मोती
शेता-शेतात चमकतील
पाहूनी यांना नजरेचे झोत
मनाच्या मनात ठुमकतील

शिवार पाहून खुलु लागले
सारे धरणी आईचे लेकरं
नशिबातल्या दारिद्र्याची
म्हणे चुकेल आता ठोकरं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

Pages

Subscribe to RSS - शेती