शेती

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-२

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:26

प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘पहाट झाली, भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडी’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.

विषय: 

आंबा बागायतदार आणि बाजारसमित्यांची मक्तेदारी

Submitted by उडन खटोला on 3 October, 2020 - 10:45

आमची कोकणात देवगड हापूसची बाग आहे. परंपरागत कोकणातील बागायतदार वाशी मार्केटला आंबे विक्री करतात. ही सगळी साखळीत आंबा बागायतदार हा उतरंडीत सगळ्यात खाली आहे. हापूस आंबा हे अगदी नाजूक पीक. सो कॉल्ड कृषी विद्यापीठात अजूनही चांगले संशोधन होऊन हापूसची उत्तम जात निर्माण झालेली नाही. त्याला कित्येक रोग लागतात,त्यातून जे आंबे वाचतील ते विकत घ्यायला कोकणात डिसेंबर च्या सुमारास मुंबईतले दलाल फिरू लागतात. मोहोर पाहून, कणी किती आहे ते पाहून बागा कंत्राटाने घेतल्या जातात. जे लोक स्वतः आंबा वाशी मार्केटला पाठवतात त्यांचे हाल कुत्रे खात नाहीत.

विषय: 

पांडुबाबाची लावणी

Submitted by सुमेधा आदवडे on 30 September, 2020 - 13:15

पांडुबाबाची लावणी

भिलजी गावच्या पांडुबाबाच्या दोन बायका. पहिली दम्यानं लगीन होऊन चार वर्षातच गेली त्याच्या पदरी तीन पोरी टाकून. मग पोरींची नि घराची देखभाल करणार कोण म्हणून दुसरी केली. तिला मुलंच होईना. झालं तरी जगंना. मंग पोरासाठी वाटल त्या नि दिसल त्या देवास नवस बोललं गेलं. अन पाच वर्षांनी एकदाची कुठल्यातरी देवाला त्याची दया आली आणि दारी छोटा किसना खेळू लागला. त्याचं नाव किसनच ठेवलं पांडुबाबानी. किसन शाळेत जाऊ लागला. हळूहळू मोठा होऊ लागला. आभ्यासात लय हुशार! दर वर्षी पहिल्या पाचात यायचा. काहीच नाही तर पहिल्या दहात तर नक्कीच!
पांडुबाबाला त्याचं कोण कवतिक!

नवे शेती विषयक कायदे शाप की वरदान?

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2020 - 10:13

नव्या ने मंजूर करवुन घेतलेल्या शेती विषयक कायद्यां बद्दल चर्चे साठी धागा.

कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द केल्या गेल्या आहेत. कायदा लागू झाला की त्यांचे काम थांबेल. तिथे काम करणार्‍या मजुरांचे रोजगार जातील व तिथे माल विकायला आणणार्‍या अल्प भूधारक शेतकर्‍यांचे सेफ्टी नेट निघून जाईल. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ह्या बाबतीत आमूलाग्र बदल घडवणा रे व नव्या पद्धती लागू करणारे हे कायदे आहेत. पण ह्यात नक्की भले कोणाचे होणार आहे हे उमजत नाही आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

जीवनज्योती कृषी उद्योग

Submitted by अनया on 26 August, 2020 - 09:26

जीवनज्योती कृषी उद्योग

IMG_20200622_103856936[1].jpg

पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.

हिरवे शिवार

Submitted by Santosh zond on 11 August, 2020 - 02:34

हिरवे शिवार

नभ दाटता आभाळी
पावसाची आली सर
काळ्या आईस पेराया
हाती घेतले पांभर

ओढ थेंबाची तृणांशी
जशी मखमली शाल
बाप राबतो शेतात
हाती जगाची मशाल

पायी नसतो आधार
चिखलाची त्याची वाट
झोपे चांदण्या रात्रीत
जगा वेगळाच थाट

पोंर आपली हुशार
बाप मायशी भांडतो
जिव ठेवून गहान
दिस उपाशी काढतो

शब्दखुणा: 

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

Submitted by अनिथ on 23 July, 2020 - 01:22

शेतकरी आमचा बाप
कधी राहिल टिपटाप ?

आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||

असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?

रखमा...

Submitted by 'सिद्धि' on 23 March, 2020 - 08:17

' साथीच्या रोगाने विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती.

शब्दखुणा: 

दगडोबाच्या मुलीचे स्वप्न..

Submitted by Happyanand on 9 November, 2019 - 10:23

मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..

Pages

Subscribe to RSS - शेती