सरकार

शेतकर्‍यांचा संप

Submitted by मार्मिक गोडसे on 1 June, 2017 - 08:55

आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी

काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ?

१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.

२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.

३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.

४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.

५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.

६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.

७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.

नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

नवे सरकार - नवे मंत्रीमंडळ

Submitted by हायझेनबर्ग on 16 May, 2014 - 10:00

निवडणुकांचा निकाल काय लागला हे काही आता वेगळे सांगायची गरज नाही. कुणाचा निकाल लागला तेही कळाले आहेच. तर ते सोडा!!

तुमच्या मते नवे मंत्रीमंडळ कसे असेल. कोण कुठली पदे भुषवेल. कुठले नवे चहरे दिसतील? जेटली, ईराणीं सारख्या मातब्बर पण शहीद झालेल्यांना मंत्रीमंडळात कसे सामावून घेणार?

घटक पक्षांच्या दगाबाजीचा आता काही धोका नाही पण अंतर्गत बंडाळीची शक्यता(सध्यातरी अतिशय कमी) आणि काही नाराजांचे ऊपद्रव मुल्य बघता भाजप पक्ष म्हणून काय ऊपाययोजना करणार?

लोकसभा स्पीकर, पक्ष प्रवक्ते, संघटक वगैरे अश्या बिनखात्याच्या पण महत्वाच्या भुमिका कोणाच्या वाट्याला येणार?

विषय: 

संयुक्ता मुलाखत : अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान, नाशिक

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 March, 2013 - 09:54

आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.

त्याला लागते जातीचे, येरे गबाळ्याचे काम नव्हे

Submitted by रणजित चितळे on 28 September, 2012 - 12:53

गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर मधल्या पंचायती निवडणुका इस्लाम विरोधी ठरवून लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहदीन आणि जैशे मोहमद सारख्या दहशतवादी संघटनांनी एका पत्रका द्वारे फतवा काढून खोऱ्यातील गावांतल्या सरपंचांनी राजीनामे देण्यात यावेत असे आवाहन केले. या आवाहनाला जेव्हा कोणी बळी पडत नाही असे जाणवले तसे धाक घालण्यासाठी दहशदवाद्यांनी सरपंचांना गोळ्या घालून मारण्यास सुरवात केली आहे. पंच मुहंमद शफी तेली ह्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली. आता पर्यंत चार सरपंचांना गोळ्या घालून मारण्यात आले आहे. हे सर्व उत्तर काश्मीर बारामूल्ला भागात घडले. मुहंमद शफी तेली क्रिरी भागातला होता.

जीव घेतंय... सरकार

Submitted by vinny on 11 August, 2011 - 10:09

गिरन चालू व्हती तरी
अंगावर कापड मिळालं न्हाय
गिरन जाउन जिंदगी गेली
पण घर काय मिळालं न्हाय

धरण बांधून वरसं लोटली
प्यायला पाणी मिळालं न्हाय
कालवा अंगण मोडून वाहिला
पण शेतापातुर पोचलाच न्हाय

नवीन प्रकल्प आला म्हनून
पुन्हा सरकार जिमीन घेतंय
वाचवायला गेला घर म्हणून
पोराचा माझ्या जीव घेतंय...

विनायक बेलोसे
http://vinayakbelose.blogspot.com/

गुलमोहर: 

अण्णांचा लढा आणि लोकशाही

Submitted by फारएण्ड on 16 April, 2011 - 14:51

अण्णांच्या या महिन्यात झालेल्या लढ्यावर खालील धाग्यांवर चर्चा झालेली आहे.
जन लोकपाल बिल आणि अण्णा हजारेंचे आंदोलन
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
दुसरे गांधी
अण्णा, सेवाग्रामला या...

ते उपोषण झाले. पण या लढ्यातील पुढच्या आव्हानांबद्दल इतर ठिकाणी बरेच वाचले. यात आता दोन गोष्टी आहेत:
१. या विधेयकातील त्रुटी काय आहेत आणि त्याला पर्याय काय आहेत

सरकारी योजना

Submitted by पाषाणभेद on 14 October, 2010 - 14:43

सरकारी योजना

माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो
उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो
घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

शाळा! म्हनं झेडपीची शाळा !!
मोफात शिक्षान, मोफात शाळा
मास्तर खिचडी शिजवीत शिकवीतो
तिच्यात टाकायला तेलतूप राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

सरकारी दवाखान्याची काय पन तर्‍हा
खाजगी दवाखानाच वाटं त्याच्यापुढं बरा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सरकार