तुम्ही म्हणा बंद संपूर्ण अयशस्वी झाला,
आम्ही ठासून सांगू तो यशस्वी झाला,
काहीही म्हणा… गोंधळ निर्माण झाला पाहिजे हे पक्के!
सब घोडे बारा टक्के….
तुम्ही म्हणा सरकार मधे कोणाचाच कोणाला मेळ नाही
आम्ही परस्पर विरोधी विधने करून सावरून घेऊ ह्यात शंका नाही
काहिही असो…. गोंधळ निर्माण झाला पाहिजे हे पक्के!
सब घोडे बारा टक्के….
तुम्ही आमचे धोटाळे रोज शोधून काढा
आम्ही तुमच्या मंत्र्याना अराजक भाषणे केली म्हणून अडकवू
कामकाज हेवो न होवो…गोंधळ निर्माण झाला पाहिजे हे पक्के!
सब घोडे बारा टक्के….
मी जवळपास गेली 40 वर्षे पुस्तके वाचतोय. आवड निवड, विषय, लेखक सगळे बदलत गेले.
सध्या नांदेडच्या श्री श्रीकांत देशमुखांचे पिढीजात नावाचे पुस्तक वाचतोय. मराठवाडा विभागात शासकीय नोकरीत डीडीआर म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार (जिल्हा उप निबंधक - सहकार विभाग) असलेल्या अधिकार्याच्या आसपास चालू असलेल्या सामाजिक व राजकीय घडामोडी, वर्ग संघर्ष, सत्तेची साठमारी, राजकीय वर्चस्वाची लढाई आणि भ्रष्टाचार यावर भाष्य आहे. भाषा अगदी रोजच्या वापरातील आहे. पुस्तक बरेच मोठे अन काहीसे विस्कळीत वाटते. पण नक्की वाचनीय आहे.
एक काळ असा होता कि एखाद्या महत्वाच्या समस्येवर फक्त बोलून चालत नाही तर आपण सक्रीय योगदान द्यायला हवे अशा अर्थाच्या सुभाषितांनी प्रभावित होऊन वाहतूक क्षेत्रात काही काळ स्वयंसेवकाचे काम केले. कचरा, स्वच्छता अशा ठिकाणीही वेळ घालवला. त्या अनुभवातून काही निष्कर्ष काढले.
शहरी समस्या का आहेत ? त्याची कारणे काय याबद्दल खोलात आपण जात नाही.
वाहतुकीची समस्या कशामुळे उद्भवते या प्रश्नाचे उत्तर आपण देतो. अरूंद रस्ते. मग एक स्पर्धा सुरू होते. एकाचा दोन पदरी रस्ता, दोनाचे चार, चाराचे आठ पदरी रस्ते.
पुण्यतील एका मुलाने एम पी एस सी ची लेखी परिक्षा पास होऊनही दोन वर्षे मुलाखतीचा कॉल न आल्याने निराश होउन आत्महत्या केली. त्या घटनेचे बरेच पडसादही उमटले. एमपीएससी च्या रिकाम्या जागा ३१ जुलै पर्यंत भरणार ! अशी गर्जना मंत्रीमहोदयांनी केली. पण एक लबाडी होतीच, या जागा म्हणजे एमपीएससी चे पाच सभासद असतात व एकावरच गाडा हाकला जात होता, त्या उरलेल्या चार होत्या, उमेदवाराच्या नव्हेत. अर्थात हेही आश्वासन ३१ जुलै पर्यंत पाळता आले नाही. या एकूण दु:खद घटनेमुळे मनात आलेले काही विचार सैर भैर लिहित आहे.
उदविग्न मनाचा उद्रेक...
होईल आता उदविग्न मनाच्या संतापाचा उद्रेक...
घडले नाही कधी असा घडवेल एल्गार अनेक...
मिटलेल्या मुठीमध्ये, तुटलेली स्वप्ने घेऊन अनेक...
न्याय निवाडा उरला नाही, शोधी संघर्षाची मार्गे अनेक...
अनेक मिटले, मिटतील अनेक मृगजळ समान न्यायातून...
उरलेले मरतील भूक, द्वद्व, अन कोल्हेकुई समाज विवंचनेतून...
त्याच अंधारातून पुन्हा प्रकाश निघेल एक...
न्यायामागच्या अन्यायाला फाडतील किरणे अनेक...
मागून मिळत नसेल तर तो मिळवावाच लागतो...
संघर्षासाठी एक वेळ शस्त्र हातात घ्यावाच लागतो...
Reflecting on the recent break-in at the US Capitol by Trump supporters consumed by the false narrative of the last election wrote my first ever gazal with context/meaning in english. _/\_
[1]
मायावी भ्रमांचे गुंतती जाळे
शुभ्रते सत्यही रंगती काळे
[2]
अज्ञानी झिंगुनी घरी स्वतःच्या
म्हणवुनि वीर खंडती ताळे
[3]
काजळी दिव्याते झाकली अशी
उजेडी अंधार वंदती कुळे
[4]
असत्ये झाकले पूर्णते असे
मध्यांन्नी पौर्णिमा सांगती खुळे
[5]
अंधार पाजळे दिव्याशी इथे
सूर्यास काजवे संतती मिळे