मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
शेती
दगडोबाच्या मुलीचे स्वप्न..
मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..
चारोळी: धरतीची आरोळी
हा पाऊस तरी कधी येईल?
धरा कधी एकदा पुन्हा तृप्त होईल?
धरतीने अनेक आ वासले आहेत..
शुष्क तडे आता तहानले आहेत!
पाऊस आणि पाणी
हा विषय राजकारणाशी संबंधित नाही.
हे आपल्यामुळे घडत आहे.
आपण कधी हयाचा गंभीरपणे विचार केला नाही, त्यामुळे पाणी आणि पावसाचा प्रश्न आज एवढा मोठा झाला आहे.
पाण्याच दुर्भिक्ष आज सगळीकडे पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हया भागातही हे चित्र आता पहायला मिळत आहे , तीव्रता थोडी कमी आहे हाच एक दिलासा आहे, पण हे सगळं वाढत चाललय एवढ मात्र नक्की.
हा पाणी प्रश्न कसा सोडवावा, काय उपाययोजना कराव्या म्हणून हा धागा.
माबोकरांनी त्यांचे विचार मांडावेत.
सोलापूर शिवारफेरी : 27 व 28 एप्रिल: सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती
Spnf पद्धतीने जी शेती केली जाते त्या शेतांवर जवळ जवळ दर महिन्याला शिवारफेऱ्या आयोजित केल्या जातात. शेती करू इच्छिणाऱ्या नव्या शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो.
एप्रिल 27-28 ला सोलापूर भागात एक शिवारफेरी आयोजित केली आहे. शनिवारी 2 शेतांना भेटी द्यायच्या आहेत, रविवार पूर्ण दिवस एक शेत पहायचे आहे. बहुतेक शिवारफेऱ्यांना गुरुजी स्वतःही हजर राहून मार्गदर्शन करतात. यामुळे ज्याचे शेत आहे त्याला तो जे करतोय ते गुरुजींच्या नजरेखालून घालून घ्यायची संधी मिळते व इच्छुकांना spnf शेती कशी होते, कशी दिसते याचे जिवंत प्रात्यक्षिक घडते.
धोक्याची घंटा
आकांत
दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला
का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी
रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,
धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला
सुरु झालिया पेरन..!
माटी कहे दुनिया को..!
लेख - “वेळा अमावास्या” सण
सण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. भारतीय शेतकऱ्याची शेतीशी नाळ जोडलेली आहे. शेतकरी विविध सण साजरे करून निसर्गाशी आपले नाते दृढ करत असतो. या सणाला रब्बीची पार्श्वभूमी आहे. या दिवसात रब्बीचा हंगाम जोरात असतो. मराठवाडाच्या भूमीत अनेक सण, परंपरा, चाली रीती साजऱ्या केल्या जातात. सणाची नावे जरी वेगवेगळी असली तरी त्यात कुटुंबा सोबत साजरा करण्याची वेगळीच मज्जा आहे.