शेती

दगडोबाच्या मुलीचे स्वप्न..

Submitted by Happyanand on 9 November, 2019 - 10:23

मेघांचे कमंडलू लवंडले आणि कोरडी ठीक्कुर पडलेली काळी माती जराशी ओलवली.
पावसाचे ते काही थेंब अंगणात खाट टाकून झोपलेल्या दगडोबा च्या ही अंगावर पडले आणि त्याला जाग आली. तो तडक उठला नी झपाझप पावले टाकीत तांब्याच्या माळाकडे जाऊ लागला. पहाटे चे तीन वाजले होते. मागून त्याच्या कारभारणी ने आवाज दिला," आव धनी अाव कुठं निघालास इतक्या रातीचं?".
मागे वळुन दगडोबा यावढच बोलला की.." आलोच तांब्याच्या माळावरून"..

चारोळी: धरतीची आरोळी

Submitted by निमिष_सोनार on 16 May, 2019 - 09:57

हा पाऊस तरी कधी येईल?
धरा कधी एकदा पुन्हा तृप्त होईल?

धरतीने अनेक आ वासले आहेत..
शुष्क तडे आता तहानले आहेत!

विषय: 

पाऊस आणि पाणी

Submitted by टग्या on 4 May, 2019 - 16:43

हा विषय राजकारणाशी संबंधित नाही.
हे आपल्यामुळे घडत आहे.
आपण कधी हयाचा गंभीरपणे विचार केला नाही, त्यामुळे पाणी आणि पावसाचा प्रश्न आज एवढा मोठा झाला आहे.
पाण्याच दुर्भिक्ष आज सगळीकडे पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हया भागातही हे चित्र आता पहायला मिळत आहे , तीव्रता थोडी कमी आहे हाच एक दिलासा आहे, पण हे सगळं वाढत चाललय एवढ मात्र नक्की.
हा पाणी प्रश्न कसा सोडवावा, काय उपाययोजना कराव्या म्हणून हा धागा.
माबोकरांनी त्यांचे विचार मांडावेत.

विषय: 
शब्दखुणा: 

सोलापूर शिवारफेरी : 27 व 28 एप्रिल: सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती

Submitted by साधना on 29 March, 2019 - 21:20

Spnf पद्धतीने जी शेती केली जाते त्या शेतांवर जवळ जवळ दर महिन्याला शिवारफेऱ्या आयोजित केल्या जातात. शेती करू इच्छिणाऱ्या नव्या शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो.

एप्रिल 27-28 ला सोलापूर भागात एक शिवारफेरी आयोजित केली आहे. शनिवारी 2 शेतांना भेटी द्यायच्या आहेत, रविवार पूर्ण दिवस एक शेत पहायचे आहे. बहुतेक शिवारफेऱ्यांना गुरुजी स्वतःही हजर राहून मार्गदर्शन करतात. यामुळे ज्याचे शेत आहे त्याला तो जे करतोय ते गुरुजींच्या नजरेखालून घालून घ्यायची संधी मिळते व इच्छुकांना spnf शेती कशी होते, कशी दिसते याचे जिवंत प्रात्यक्षिक घडते.

धोक्याची घंटा

Submitted by चिंतामण पाटील on 4 January, 2019 - 22:38

धोक्याची घंटा..
sorry
तसं काही खास नाही...
चुंचाळे येथे मधमाशा दिसत नाहीत.

पण तरी हे वाचा...

विषय: 
शब्दखुणा: 

आकांत

Submitted by स्वप्नील रसाळ on 22 December, 2018 - 01:10

दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला

का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी

रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,

धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला

लेख - “वेळा अमावास्या” सण

Submitted by भागवत on 17 December, 2017 - 21:46

सण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. भारतीय शेतकऱ्याची शेतीशी नाळ जोडलेली आहे. शेतकरी विविध सण साजरे करून निसर्गाशी आपले नाते दृढ करत असतो. या सणाला रब्बीची पार्श्वभूमी आहे. या दिवसात रब्बीचा हंगाम जोरात असतो. मराठवाडाच्या भूमीत अनेक सण, परंपरा, चाली रीती साजऱ्या केल्या जातात. सणाची नावे जरी वेगवेगळी असली तरी त्यात कुटुंबा सोबत साजरा करण्याची वेगळीच मज्जा आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - शेती