समाज माध्यमात आयुष्याचा मोलाचा काळ व्यतीत केल्यावर तो वाया गेला नाही. काही न काही शिकवण मिळाली.
जर कुणी कुणाचाही अंधभक्त असेल तर त्याच्याशी वाद घालू नये. ही शिकवण तर इथल्या लोकांना बालपणापासूनच आहे. माझ्यासारख्या मंद व्यक्तीस ती अलिकडेच प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता वादात कुणी म्हणाले कि बोवा हत्ती उडतो.
तर त्यास ओलांडे प्रश्न ( Cross questioning) करू नये.
नमस्कार माबोकर,
जसे मी म्हटले होते की आम्ही प्रायव्हेट एफ एम सुरु करत आहोत. जी माणसे संघर्ष करुन एका लेवलला पोहोचली आहेत, त्यांचा प्रवास मांडणार आहोत. आम्हांला फार प्रसिध्द व्यक्ती नको आहेत, तर आपल्यासारखेच व्यक्तिमत्व हवे आहेत. दर महिन्याला आम्ही अशी एक मुलाखत प्रसारित करणार आहोत. तुमच्या माहीतीत अशा व्यक्ति असतील तर नक्की आमच्यापर्यत त्यांची माहीती पोहचवा.
2 जूनला संध्याकाळी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधल्या बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी आणि दोन प्रवासी रेल्वेगाड्यांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. त्या अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1,100 च्या वर प्रवासी जखमी झालेले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात भीषण रेल्वे अपघात ठरला असून विविध देशांकडून भारताला शोकसंदेशही पाठवण्यात आले आहेत.
सध्या मायाजालात अनेक जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती अडकल्याचे वारंवार दिसून येते आहे. पुरूषांच्या जोडीला महिला सुद्धा या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे विषकन्याच नाही तर विषकुमारांचा सुद्धा वापर केला जातो हे उघड झाले आहे.
पण सध्या मायाजाल (हनीट्रॅप) या शब्दाच्या वापरावरून वादंग उठले आहे. मायाजाल या शब्दाचा वापर करून काही देशद्रोह्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी करून त्यांना बळी / पीडीत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे असे काही जणांचे म्हणणे आहे.
त्यांच्या जागी विशिष्ट लोक असते तर मीडिया ने आग लावून त्यात तेल ओतत राहण्याचे काम केले असते असे त्यांचे म्हणणे आहे.
आज दुपारी "चित्रलेखा" कार्यालयातून मला फोन आला की तुमच्या उरलेल्या वर्गणीचे पैसे आम्ही परत करत आहोत कारण आम्ही चित्रलेखा साप्ताहिक बंद करतो आहे.
आजकाल छापील ऐवजी ईबुक वाचनात रस असल्याने क्षणभर असे वाटले की, फक्त छापील चित्रलेखा बंद झाले. पण नाही! डिजिटल चित्रलेखा पण बंद झाले आहे. म्हणजे काय की थोडक्यात चित्रलेखा मासिकाचे प्रकाशन पूर्ण बंद झाले आहे.
चित्रलेखा स्वतःची अशी एक वेगळी ओळख टिकवून होते. रंजक पद्धतीने आणि वेगळ्या धाटणीचे लेखन करून वाचकांना किचकट माहिती सोपी करून सांगणे हे चित्रलेखाचे वैशिष्ट्य होते, असे माझे मत आहे.
पाककृती विभागात “कोरियन” शब्दखुणेवर मिटलं असतं खरं तर…. एवढा एफर्टच मारायचा तर दोन आर्टिस्टचा रॅप हवा. (मायबोली यूट्यूब पुरता प्रताधिकार मुक्त. है कोई माई का लाल जो इसको म्हण सके…).
“कोणास ठाऊक कशी” रॅप
बिट्स- हवे ते.
कार्टा (इंट्रो):
घुबडाचे घेऊन डोळे, घबाडाचे बांधून इमले,
नातू-पणतू पोरांपायी, आजी तुझे पाय दमले,
कशिदा करशी कशीबशी, रॅपला का पडलीस फशी,
Hustle मध्ये अशी तशी, आजी तू गेलीस कशी?
हूक:
कोणास ठाऊक कशी, Hustle मध्ये गेली आजी
ऐकू आली कानाफुशी, Hustle मध्ये गेली आजी
किरण माने प्रकरणाबद्द मला जे थोडेफार कानावर आहे ते असे की स्टार प्रवाह चॅनलवरच्या मुलगी झाली हो या मालिकेच्या शूटींगदरम्यान सेटवर काहीतरी घडले. त्यात महिला कलाकारांतर्फे प्रामुख्याने प्रामुख्याने श्रावणी पिल्ले , कविता म्हापसेकर आणि मूणाल देव यांच्या तक्रारींमुळे किरण माने यांना वाहीनीने काढून टाकले आहे. तर माने म्हणतात की त्यांनी सोशल मीडीयावर राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना काढून टाकले.
वरील माहीतीत काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा.
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो. मग तेव्हापासून मी या केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकण्यास आणि त्याच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा क्रमही सुरू झाला, अगदी 2014 मध्ये हे प्रसारण केंद्र बंद होईपर्यंत.
खूप लहान असताना गावी गेलो होतो. चुलते वगैरे गावी असायचे. एकदा काकाच्या ग्रुपबरोबर तालुक्याच्या गावी सायकलवर गेलो होतो. या ग्रुपला तालुक्याचे जुने थिएटर पाहून सिनेमा बघायची हुक्की आली. तेव्हां गावी मनोरंजनाचे एकच साधन होते. ग्रामपंचायतीच्या आवारातला टीव्ही. त्तालुक्याला भारतभर भ्रमण करून शिळे झालेले सिनेमे यायचे. सिनेमाचं नाव अमानुष होतं. हिरो कोण हे कुणालाच माहिती नव्हतं. पण पिक्चर बघायचा ही हौस दांडगी असल्याने हिय्या करून सगळे एकदाचे घुसले.
डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रहण ही वेबमालिका प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालेली आहे.
जरी ही मालिका एका कादंबरीवर आधारीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंग्यांची पार्श्वभूमी या मालिकेला आहे. १९८४ मधे दिल्ली, कानपूर आणि बोकारो इथे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत लहान मुले, बायका, वृद् आणि तरूण पुरूष या सर्वांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.