दिठी
वांचुन सूर्यासवें । शिणणें होय ॥
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥
१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती!
मराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.
'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.
अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.
श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.
हाँसदा सौभेन्द्र शेखर हा संथाळी आदिवासी तरुण लेखक आणि झारखंडच्या पाकुर इथल्या सरकारी इस्पितळात काम करणारा डॉक्टर. त्याच्या ‘द मिस्टिरियस एलमेन्ट ऑफ् रूपी बास्की’ या पुस्तकाला २०१५ चा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे. हाँसदाच्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातल्या एका कथेमुळे ‘संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण होतं आहे’ अशा आरोपावरून त्याला झारखंड राज्य सरकारनं कोणत्याही खुलाशाविना तात्पुरतं बडतर्फ केलं आहे. त्याच्या पुस्तकावरही अर्थातच बंदी घातली आहे.
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्यांनी केलेलं हे भाषण -
भारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.
रवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.
महानगराबाहेरच्या वास्तव जगाशी नातं न तोडलेल्यांना रस्त्याकाठी फेकून दिलेली गाडाभर कोथिंबीर किंवा वांग्यांचा लगदा नवा नाही. मेहनतीनं पिकवलेल्या भाजीला भाव न मिळाल्यानं ती फेकून देणारा शेतकरी मग अनेकांच्या लेखी माजोरडा ठरतो.
'ग्रामीण जीवनाचे बखरकार' अशी ख्याती असलेल्या प्रा. भास्कर चंदनशिव यांची 'लाल चिखल' ही कथा -
रिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)