..आणि एक दिवस रफीचा आवाज कानावर आला...! - श्री. इर्शाद बागवान
'आंदोलन' मासिकाच्या गणतंत्र विशेषांकाच्या 'किस से चाहिये आझादी' या विशेष विभागाचं संपादन श्री. श्रीरंजन आवटे यांनी केलं. त्या विभागात त्यांनी समाविष्ट केलेलं श्री. इर्शाद बागवान यांचं हे अनुभवकथन.
बंधनं अडवणूक करतात. वाढीचा मार्ग रोखून संकुचित विश्वात बंदिस्त करतात. मग हळूहळू आपल्यालाही त्या बंधनांची सवय होऊन जाते. इतकी की, आपण त्या भिंतींपलीकडे असणाऱ्या अमर्याद जगाची कवाडं स्वतःच्या हातांनी कुलुपबंद करतो आणि मग एका क्षणी असं होतं की, नजर उचलून त्या भिंतींपलीकडे पाहण्याएवढंही धैर्य आपल्यांत उरलेलं नसतं.