आताच जयपूर शहराचा १९ व्या शतकातील एक जुना व्हीडीयो पाहिला
सर्वत्र मुख्य/उप रस्त्यावर ,गाई म्हशी ,बैल , माकडे हत्ती , चिमण्या ,कबुतरे आणि इतर अनेक पशुपक्षी उन्मुक्तपणे आणि निर्भयतेने बागडताना दिसतात , आणि सोबत माणसांची वर्दळ सुद्धा व्यवस्थित सुरु आहे
थोडा विचार केल्यानंतर लक्षात आले आजची जयपूर आणि इतर शहरांची स्थिती पाहिल्यास एकही प्राणी/ पक्षी औषधाला देखील शोधून सापडत नाही .
विकास ,प्रगती आणि शहरीकरण म्हणजे निसर्गाचा आणि प्राणी/ पक्षी यांचा नायनाट करून करून उभारलेली कॉंक्रीट ची जंगले, रस्ते आणि पॉश एसी गाड्या इतकेच?
जरा विचार करुया……………….
वाढत्या वस्तीला, वाहनांच्या प्रदुषणाला पुरून उरून पुण्याचे हवामान अजूनही बरेच चांगले / टिकून आहे, याचे एक प्रमुख कारण पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या टेकड्या.
ह्या टेकड्या म्हणजे जणू पुण्याला ऑक्सिजन पुरवठा करणारे कारखानेच होत.
जेव्हा केव्हा गडाकिल्ल्यांवर जाता येत नाही तेव्हा तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवायला उपयोगी पडतात या टेकड्या.
कोणा नवख्या माणसाला तो गडाकिल्ल्यांवर जाऊ शकेल की नाही याचा अंदाज बांधायला मदत करतात या टेकड्या.
घरातल्या लहान मुलांना पुण्यातल्या पुण्यात सह्याद्रीची ओळख करून द्यायला उपयोगी पडतात या टेकड्या.
रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट
बहुदा कधीतरी २-३ दिवसांपूर्वी ट्रेक सुरू केलेला असावा...
जीवाभावाच्या मोजक्या ट्रेकमित्रांसोबत दणकट चढ-उतार करत, सह्याद्रीमध्ये कुठेतरी खोलवर दुर्गम भागात पोहोचलेलो..
चेहरा रापलेला-कपडे घामेजलेले-सॅक मळलेली, कुठून आलो-कुठे चाललोय असल्या शुल्लक गोष्टींचं भान असायची गरज नाही..
मध्येच एखाद्या खट्याळ रानपाखराच्या शीळेचा आवाज मोहवून टाकतोय..
आता, जांभूळ-गेळा-हिरडा अश्या दाटीमधून आणि कारवीच्या उंचच उंच झुडुपांमधून वळणं-वळणं घेत वाट जलद धावतीये..
दाट झाडीतून वाट अवचितंच धारेपाशी येते, अन् सामोरा येतो एक स-ण-स-णी-त पॅनोरमा..
१०/८/२०१३
बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....
महानगरांमध्ये आपल्या घरात, बाल्कनीत, परसदारी किंवा टेरेसवर हौसेने बाग फुलविणार्यांची संख्या कमी नाही. ग्लोबल वॉर्मिंग, अन्न सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांच्या वातावरणात मुंबईसारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागांमध्ये अर्बन फार्मिंग (नागरी शेती) सामुदायिक स्वरूपात (कम्युनिटी फार्मिंग) यशस्वीपणे अंमलात आणणार्या प्रीती पाटील यांचा प्रवास स्फूर्तिदायक आहे. शाश्वत शेतीचे धडे देणारे त्यांचे कार्य व त्यांची संस्था अर्बन लीव्हज् (Urban Leaves) यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा योग आला. त्यांची ही मुलाखत खास मायबोलीकरांसाठी!
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
नमस्कार लोकहो !
अमेरिकेतली भटकंती चालू आहे. मागच्या महिन्यात ४ जुलैला माउंट व्हिटनीला जाऊन आलो! फारा वर्षांची 'तमन्ना', 'मनिषा','इच्छा', 'आकांक्षा' इ.इ. पूर्ण झाली!
जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.
धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट
...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
अदृष्य भिंत ......
सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात काम करणा-यांना संसर्गजन्य रोगाच्या साथीचं इन्वेस्टीगेशन करणं म्हणजे काय आव्हान आहे हे माहित असतं. मला माझ्या ३०-३५ वर्षांच्या सर्व्हीस मधे असे प्रसंग अनेकदा आले. पेशंटच्या एखाद्या दुर्मिळ रोगाचं निदान आणि एखाद्या साथीचं निदान यात साम्य एकच आहे आणि ते म्हणजे यातून मिळणारं समाधान. यातल्या एका साथीचा किस्सा सांगण्यासारखा आहे.